शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कळवा-मुंब्राही स्मार्ट करा

By admin | Updated: December 6, 2015 00:49 IST

स्मार्ट सिटीत ठाणे स्टेशनची निवड करण्याऐवजी जी जागा मोकळी आहे, ग्रामीण भागात आहे, अशा भागाचा समावेश केला असता तर ते अधिक फायदेशीर ठरले असते. परंतु, स्मार्ट

ठाणे : स्मार्ट सिटीत ठाणे स्टेशनची निवड करण्याऐवजी जी जागा मोकळी आहे, ग्रामीण भागात आहे, अशा भागाचा समावेश केला असता तर ते अधिक फायदेशीर ठरले असते. परंतु, स्मार्ट सिटीतून ग्रामीण भागाला वगळल्याचा आरोप करून शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनी सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिला. तर, कळवा-मुुंब्य्रातील नगरसेवकांनी त्यांच्या विभागाला वगळल्याबद्दल टाहो फोडला.ठाणे महापालिकेने तयार केलेल्या स्मार्ट सिटीचा अंतिम आराखडा शनिवारी झालेल्या विशेष महासभेत पटलावर ठेवला होता. परंतु, त्याचे सादरीकरण होण्याआधीच भगत यांनी दिवा, मुंब्रा या भागात आजही काही मोकळे भूखंड आहेत, त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे स्मार्ट सिटीअंतर्गत विकास करता आला असता. आजही या भागातील नागरिकांना एसटीतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागाला वगळल्याने हा त्यांचा अवमानच असल्याचे ते म्हणाले. तर कळवा, मुंब्रा, दिव्यातील नागरिकांना पाणी द्या, मग स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवा, अशी मागणी नगरसेविका रीटा यादव यांनी केली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली आतापर्यंत ठाणेकरांना अनेक दिवास्वप्ने दाखविली जात आहेत. परंतु, यापूर्वी जेएनएनयूआरएमअंतर्गत मिळालेल्या निधीची कामे आजही पूर्ण होऊ शकलेली नसल्याचा आरोप मनाली पाटील यांनी केला. विरोधक एकामागून एक आक्रमक होत असल्याचे पाहून महापौर संजय मोरे यांनी प्रथम पालिकेचे स्मार्ट सिटीचे सादरीकरण पाहा आणि मग आपण यावर चर्चा करावी, अशी सूचना केली. त्यानंतर, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भातील सादरीकरण केले. ते करताना ठाणे स्टेशन परिसरात सॅटीस आणि नवीन रेल्वे स्थानक आदींसह इतर पायाभूत सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु, २४ तास पाणी, एलईडी दिवे आणि क्लस्टर आदींसह इतर महत्त्वाच्या सुविधा या संपूर्ण ठाण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्पष्टीकरणानंतर नगरसेवकांनी या आराखड्याला मंजुरी दिली. स्मार्ट सिटीचा अजेंडा काहींच्या हातीस्मार्ट सिटीसंदर्भात घेतलेल्या विशेष महासभेचा अजेंडा काही सदस्यांच्या हाती रात्री १२ वाजता, तर काहींच्या हाती सकाळी ११ वाजता पडल्याची माहिती प्रभारी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी दिली. त्यामुळे त्याचा अभ्यास कसा करायचा आणि चर्चा कशी करायची, असा सवाल त्यांनी केला.