शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

कळवा-मुंब्राही स्मार्ट करा

By admin | Updated: December 6, 2015 00:49 IST

स्मार्ट सिटीत ठाणे स्टेशनची निवड करण्याऐवजी जी जागा मोकळी आहे, ग्रामीण भागात आहे, अशा भागाचा समावेश केला असता तर ते अधिक फायदेशीर ठरले असते. परंतु, स्मार्ट

ठाणे : स्मार्ट सिटीत ठाणे स्टेशनची निवड करण्याऐवजी जी जागा मोकळी आहे, ग्रामीण भागात आहे, अशा भागाचा समावेश केला असता तर ते अधिक फायदेशीर ठरले असते. परंतु, स्मार्ट सिटीतून ग्रामीण भागाला वगळल्याचा आरोप करून शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनी सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिला. तर, कळवा-मुुंब्य्रातील नगरसेवकांनी त्यांच्या विभागाला वगळल्याबद्दल टाहो फोडला.ठाणे महापालिकेने तयार केलेल्या स्मार्ट सिटीचा अंतिम आराखडा शनिवारी झालेल्या विशेष महासभेत पटलावर ठेवला होता. परंतु, त्याचे सादरीकरण होण्याआधीच भगत यांनी दिवा, मुंब्रा या भागात आजही काही मोकळे भूखंड आहेत, त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे स्मार्ट सिटीअंतर्गत विकास करता आला असता. आजही या भागातील नागरिकांना एसटीतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागाला वगळल्याने हा त्यांचा अवमानच असल्याचे ते म्हणाले. तर कळवा, मुंब्रा, दिव्यातील नागरिकांना पाणी द्या, मग स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवा, अशी मागणी नगरसेविका रीटा यादव यांनी केली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली आतापर्यंत ठाणेकरांना अनेक दिवास्वप्ने दाखविली जात आहेत. परंतु, यापूर्वी जेएनएनयूआरएमअंतर्गत मिळालेल्या निधीची कामे आजही पूर्ण होऊ शकलेली नसल्याचा आरोप मनाली पाटील यांनी केला. विरोधक एकामागून एक आक्रमक होत असल्याचे पाहून महापौर संजय मोरे यांनी प्रथम पालिकेचे स्मार्ट सिटीचे सादरीकरण पाहा आणि मग आपण यावर चर्चा करावी, अशी सूचना केली. त्यानंतर, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भातील सादरीकरण केले. ते करताना ठाणे स्टेशन परिसरात सॅटीस आणि नवीन रेल्वे स्थानक आदींसह इतर पायाभूत सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु, २४ तास पाणी, एलईडी दिवे आणि क्लस्टर आदींसह इतर महत्त्वाच्या सुविधा या संपूर्ण ठाण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्पष्टीकरणानंतर नगरसेवकांनी या आराखड्याला मंजुरी दिली. स्मार्ट सिटीचा अजेंडा काहींच्या हातीस्मार्ट सिटीसंदर्भात घेतलेल्या विशेष महासभेचा अजेंडा काही सदस्यांच्या हाती रात्री १२ वाजता, तर काहींच्या हाती सकाळी ११ वाजता पडल्याची माहिती प्रभारी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी दिली. त्यामुळे त्याचा अभ्यास कसा करायचा आणि चर्चा कशी करायची, असा सवाल त्यांनी केला.