शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

१५ सेकंदांत करा मतदान

By admin | Updated: February 18, 2017 06:46 IST

उल्हासनगर महापालिकेत चार उमेदवारांचे एक पॅनल असल्याने प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना स्वतंत्र मतदान करावे लागेल.

पंकज पाटील /उल्हासनगरउल्हासनगर महापालिकेत चार उमेदवारांचे एक पॅनल असल्याने प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना स्वतंत्र मतदान करावे लागेल. त्यामुळे अवघ्या १५ सेकंदात एकेका मतदाराला प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसे झाले, तरच वेळेत मतदान पूर्ण होऊ शकेल. प्रत्यक्षात मात्र एका मतदाराला दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागेल, असा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. नव्या मतदान प्रक्रियेत मतदाराला विलंब लागणारअसला, तरी निवडणूक आयोगाने वेळेच्या या नियोजनाकडे दुर्लक्ष केले आहे. एका बुथवर सरासरी ७५० मतदारांना मतदान करावे लागणार आहे. परंतु, या ७५० मतदारांसाठी वेळ मात्र ६०० मिनिटे म्हणजे अवघे १० तास आहेत. एका मतदाराला सरासरी किमान २ ते ३ मिनिटे लागणार असल्याने असंख्य मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार आहे. तर, काहींना मतदानाच्या रांगा पाहून मतदान न करताच घरी परतण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत. मतदारांची संख्या आणि मतदानाच्या वेळेतील नियोजनात चूक झाल्याने मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. उल्हासनगर ापालिकेने २० प्रभागांसाठी ५४३ मतदान बुथ उभारण्याची तयारी केली आहे. मतदारांची संख्या आणि बुथची संख्या पाहता प्रत्येक बुथवर मतदानाचा टक्का वाढल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळणार आहे. प्रत्येक मतदाराला ४ मते टाकावी लागणार असल्याने उमेदवार या मतदारांना मतदान केंद्रांवर नेण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहे. त्यातच, निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदारांमध्ये जनजागृतीचा मार्ग अवलंबला आहे. उल्हासनगरमध्ये सरासरी ४५ टक्के मतदान होत असले तरी यंदा मतदार यादीतील नावे कमी झाल्याने तो वाढेल, असा अंदाज आहे. जास्तीतजास्त मतदारांनी मतदान केंद्रांवर येऊन आपला हक्क बजवावा, यासाठी आयोग प्रयत्न करत असला, तरी प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर वेळेचे नियोजन करण्यात कमी पडत आहे. उल्हासनगरमधील ५४३ बुथमध्ये अनेक ठिकाणी ७५० च्या वरच मतदार आहेत. एका बुथवर ७५० मतदार मतदानासाठी येणार, असे आयोगाने गृहीत धरले आहे. मात्र, प्रत्यक्षात या ७५० मतदारांना मतदान करण्यासाठी दिलेली वेळ मात्र कमी आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंतच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी १० तास म्हणजे ६०० मिनिटे दिली आहेत. मात्र, मतदारांचा आकडा ७५० असल्याने प्रत्येक मतदाराला कसेबसे ४५ सेकंदच मिळतील. बुथमधील कार्यपद्धती पाहता एक मतदार बुथमध्ये गेल्यावर त्याचा मतदान क्रमांक शोधणे, त्याच्या ओळखपत्राची चाचपणी करणे, स्वाक्षरी करणे, बोटावर शाई लावणे, चार व्होटिंग मशीन कार्यान्वित करणे आणि त्यानंतर यंत्राजवळ गेल्यावर मतदाराला आपला उमेदवार शोधून त्या ठिकाणचे बटण दाबणे आणि ते वोटिंग पूर्ण झाल्यावर बाहेर पडणे, या सर्वांसाठी सरासरी २ ते ३ मिनिटे लागणार आहे. वोटिंगची कार्यपद्धती जलद गतीने होणार, अशी अपेक्षा जरी केली, तरी प्रत्येक मतदाराला किमान मतदान करण्यासाठी बुथमध्ये २ मिनिटे ही निश्चितच लागणार आहे. त्यामुळे एका बुथवरील ७५० मतदारांना हक्क बजावण्यासाठी १५०० मिनिटे म्हणजे २५ तास लागायला हवेत. प्रत्यक्षात अवघे १० तास दिले आहेत. मतदारांचा आकडा आणि त्यांना लागणाऱ्या मतदानासाठीच्या वेळेचा ताळमेळ घालण्यात न आल्याने अनेक मतदारांनाचा हक्क बजावण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने एका बुथवर केवळ ३०० मतदारांचा समावेश करणे गरजेचे होते. ३०० मतदारांना ६०० मिनिटे ही पुरेशी होण्यासारखी होती. मात्र, ३०० ऐवजी प्रत्येक बुथवर किमान ७५० मतदार टाकल्याने आयोगाने १०० टक्के मतदार मतदानासाठी येणार नाही, हेच गृहीत धरून बुथ तयार केल्याचे दिसत आहे. ज्या निवडणूक आयोगाला १०० टक्के मतदानाची अपेक्षा आहे, त्याच निवडणूक आयोगाने बुथची रचना त्याप्रमाणे केलेली नाही. उल्हासनगरमध्ये जे बुथ उभारण्यात आले आहेत, त्या बुथच्या दुपटीपेक्षा जास्त बुथची गरज मतदारांना होती. मात्र, बुथची संख्या कमी असल्याने मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी रांगेत वेळ घालवावा लागेल. त्यातच, अनेक मतदार रांगा पाहून हक्क न बजावताच निघून जाण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमध्ये ५० टक्के मतदानाचा आकडा गृहीत धरला, तरी या मतदारांच्या रांगा चुकणार नाहीत, असा अंदाज आहे.उल्हासनगरमध्ये मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा त्रास त्या मतदारांनाच होणार आहे. मतदान आणि त्यासाठी दिलेला वेळ याचा ताळमेळ घालण्यात निवडणूक आयोगाला अपयश आल्यानेच उल्हासनगरमध्ये मतदानाची टक्केवारी घसरणार आहे.