शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याची मुख्य स्मशानभूमी वैकुंठधाम होणार स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:53 IST

मागील कित्येक वर्षे जुन्या ठाण्याची साक्ष देणाºया ठाण्याची मुख्य स्मशानभूमी (वैकुंठधाम) अनेक वर्षांनंतर कायापालट होणार आहे. ८ पिढ्यांचे साक्षीदार असलेली ही स्मशानभूमी आता एकविसाव्या शतकातले नव्या ठाण्याचे देशातील प्रथम क्र मांकाचे अत्याधुनिक आणि तेवढेच स्मार्ट वैकुंठधाम बनत आहे.

अजित मांडके ठाणे : मागील कित्येक वर्षे जुन्या ठाण्याची साक्ष देणाºया ठाण्याची मुख्य स्मशानभूमी (वैकुंठधाम) अनेक वर्षांनंतर कायापालट होणार आहे. पोर्तुगीज ते पेशवाई आणि ब्रिटिश ते स्वातंत्र्योत्तर काळ अशा ८ पिढ्यांचे साक्षीदार असलेली ही स्मशानभूमी आता एकविसाव्या शतकातले नव्या ठाण्याचे देशातील प्रथम क्र मांकाचे अत्याधुनिक आणि तेवढेच स्मार्ट वैकुंठधाम बनत आहे.इंद्रधनुष्य (सहीयारा) ही सेवाभावी संस्था हा प्रकल्प स्वखर्चाने वर्षभरात पूर्ण करणार असून त्यासाठी वैकुंठधाम बंद राहणार नसल्याचेही सांगण्यात आले. यासाठी ५ कोटींचा खर्च केला जाणार असून यासाठी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले आहे.ठाण्याची लोकसंख्या ५ हजारांहून २५ लाखांपर्यंत पोहोचली असताना ठाण्याची मुख्य स्मशानभूमी म्हणून या वैकुंठधामाला महत्त्व आहे. गेल्या १०० वर्षांत सुमारे डझनभर जीर्णोद्धार आणि नूतनीकरण झाले. विद्युतदाहिनीचा पहिला प्रयोगदेखील १५ वर्षांपूर्वी याच स्मशानात झाला होता.सध्याच्या फायर ब्रिगेड इमारतीपासून वखारीपर्यंत वेगवेगळ्या ६ भागांमध्ये या प्रकल्पाचा आराखडा बनला असून सुमारे ३ हजार चौमी क्षेत्रफळात हे नवीन स्मशान उभे राहणार आहे. अर्थात, आताच्या स्मशानभूमीपेक्षा हे क्षेत्र ४ पट मोठे आहे. त्यासाठी सर्वात जुन्या फायर ब्रिगेडची शेड, त्या पाठीमागचे जुने गोदाम, मंदिर, अडगळीतले रस्त्यावरचे शौचालय, प्रवेशद्वारासमोरची काही निवासी बांधकामे हटवली जाणार आहेत. या संपादनाचा गुंता प्रचंड मोठा होता. तो आयुक्त जयस्वाल यांनी सलग दोन वर्षे पाठपुरावा करून मार्गी लावला आहे. या प्रोजेक्टमध्ये येणाºया ५० वर्षांचा विचार केला आहे.मुलांचे स्मशान : मुलांच्या अंत्यविधीसाठी ठाणे-मुंबईत पुरेशा स्मशानभूमी नाहीत. वैकुंठधाममधील बालस्मशानही फार जुने असून तोकडे आहे. त्यामुळे अगदी तीन फुटांवरच मृतदेहांचे अवशेष बाहेर येतात. याचे भान ठेवून बालस्मशानात मातीचा थर वाढवून येथे मोठी जागा ठेवली आहे.स्मार्ट मांडणी : ३०० माणसे एकाच वेळी बसू शकतील, असे सभागृह ही या प्रकल्पाची खासियत असणार आहे. लाकूड, गॅस आणि इलेक्ट्रिकल अग्नी देणाºया ६ मशीन शिवाय टॉयलेट, कार्यालय, मंदिर अशा सहा टप्प्यांत या अत्याधुनिक स्मार्ट वैकुंठधामचा नवा चेहरा असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रसिकभाई शहा (सावली) यांनी सांगितले.भविष्याचा वेध घेऊन स्मार्ट मशिनरीहिंदू अग्निक्रिया लक्षात घेऊन प्रमुख ६ मशीन लाकडासह अग्नी देणाºया बनवण्यात आल्या आहेत. एक ट्रॉली लाकडावरचे पार्थिव घेऊन मशीनमध्ये जाईल. क्र ब पद्धतीने धूर, उष्णता, विस्तवाचे कण या सर्व गोष्टी शोषून ते आउटलेट चिमणीद्वारे वातावरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे शेजारच्या वसाहतीला होत असलेला उष्णता, वास, धूर आणि प्रदूषणाचा त्रास थांबेल.आज १ मृतदेह जाळायला किमान २०० ते २५० किलो लाकूड जाळावे लागते. त्याचे प्रमाण ३० ते ३५ किलोवर येईल व हिंदू रिवाजाप्रमाणे अग्निविधी कायम राहणार आहे.१५ वर्षांपूर्वी विद्युतदाहिनी बसवतानाही काही कारणाने नाके मुरडली गेली होती. त्याचे भान ठेवून या स्मार्ट मशिनरी भविष्याचा वेध घेऊन बनवण्यात आल्या आहेत. या सर्व मशीनला गॅसमध्ये कन्व्हर्ट केलेले आहे. ज्यांना लाकूड नको, त्यांना हा दुसरा इकोफ्रेण्डली पर्याय पहिल्या दिवसापासून खुला ठेवण्यात आला.