शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

ठाण्याची मुख्य स्मशानभूमी वैकुंठधाम होणार स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:53 IST

मागील कित्येक वर्षे जुन्या ठाण्याची साक्ष देणाºया ठाण्याची मुख्य स्मशानभूमी (वैकुंठधाम) अनेक वर्षांनंतर कायापालट होणार आहे. ८ पिढ्यांचे साक्षीदार असलेली ही स्मशानभूमी आता एकविसाव्या शतकातले नव्या ठाण्याचे देशातील प्रथम क्र मांकाचे अत्याधुनिक आणि तेवढेच स्मार्ट वैकुंठधाम बनत आहे.

अजित मांडके ठाणे : मागील कित्येक वर्षे जुन्या ठाण्याची साक्ष देणाºया ठाण्याची मुख्य स्मशानभूमी (वैकुंठधाम) अनेक वर्षांनंतर कायापालट होणार आहे. पोर्तुगीज ते पेशवाई आणि ब्रिटिश ते स्वातंत्र्योत्तर काळ अशा ८ पिढ्यांचे साक्षीदार असलेली ही स्मशानभूमी आता एकविसाव्या शतकातले नव्या ठाण्याचे देशातील प्रथम क्र मांकाचे अत्याधुनिक आणि तेवढेच स्मार्ट वैकुंठधाम बनत आहे.इंद्रधनुष्य (सहीयारा) ही सेवाभावी संस्था हा प्रकल्प स्वखर्चाने वर्षभरात पूर्ण करणार असून त्यासाठी वैकुंठधाम बंद राहणार नसल्याचेही सांगण्यात आले. यासाठी ५ कोटींचा खर्च केला जाणार असून यासाठी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले आहे.ठाण्याची लोकसंख्या ५ हजारांहून २५ लाखांपर्यंत पोहोचली असताना ठाण्याची मुख्य स्मशानभूमी म्हणून या वैकुंठधामाला महत्त्व आहे. गेल्या १०० वर्षांत सुमारे डझनभर जीर्णोद्धार आणि नूतनीकरण झाले. विद्युतदाहिनीचा पहिला प्रयोगदेखील १५ वर्षांपूर्वी याच स्मशानात झाला होता.सध्याच्या फायर ब्रिगेड इमारतीपासून वखारीपर्यंत वेगवेगळ्या ६ भागांमध्ये या प्रकल्पाचा आराखडा बनला असून सुमारे ३ हजार चौमी क्षेत्रफळात हे नवीन स्मशान उभे राहणार आहे. अर्थात, आताच्या स्मशानभूमीपेक्षा हे क्षेत्र ४ पट मोठे आहे. त्यासाठी सर्वात जुन्या फायर ब्रिगेडची शेड, त्या पाठीमागचे जुने गोदाम, मंदिर, अडगळीतले रस्त्यावरचे शौचालय, प्रवेशद्वारासमोरची काही निवासी बांधकामे हटवली जाणार आहेत. या संपादनाचा गुंता प्रचंड मोठा होता. तो आयुक्त जयस्वाल यांनी सलग दोन वर्षे पाठपुरावा करून मार्गी लावला आहे. या प्रोजेक्टमध्ये येणाºया ५० वर्षांचा विचार केला आहे.मुलांचे स्मशान : मुलांच्या अंत्यविधीसाठी ठाणे-मुंबईत पुरेशा स्मशानभूमी नाहीत. वैकुंठधाममधील बालस्मशानही फार जुने असून तोकडे आहे. त्यामुळे अगदी तीन फुटांवरच मृतदेहांचे अवशेष बाहेर येतात. याचे भान ठेवून बालस्मशानात मातीचा थर वाढवून येथे मोठी जागा ठेवली आहे.स्मार्ट मांडणी : ३०० माणसे एकाच वेळी बसू शकतील, असे सभागृह ही या प्रकल्पाची खासियत असणार आहे. लाकूड, गॅस आणि इलेक्ट्रिकल अग्नी देणाºया ६ मशीन शिवाय टॉयलेट, कार्यालय, मंदिर अशा सहा टप्प्यांत या अत्याधुनिक स्मार्ट वैकुंठधामचा नवा चेहरा असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रसिकभाई शहा (सावली) यांनी सांगितले.भविष्याचा वेध घेऊन स्मार्ट मशिनरीहिंदू अग्निक्रिया लक्षात घेऊन प्रमुख ६ मशीन लाकडासह अग्नी देणाºया बनवण्यात आल्या आहेत. एक ट्रॉली लाकडावरचे पार्थिव घेऊन मशीनमध्ये जाईल. क्र ब पद्धतीने धूर, उष्णता, विस्तवाचे कण या सर्व गोष्टी शोषून ते आउटलेट चिमणीद्वारे वातावरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे शेजारच्या वसाहतीला होत असलेला उष्णता, वास, धूर आणि प्रदूषणाचा त्रास थांबेल.आज १ मृतदेह जाळायला किमान २०० ते २५० किलो लाकूड जाळावे लागते. त्याचे प्रमाण ३० ते ३५ किलोवर येईल व हिंदू रिवाजाप्रमाणे अग्निविधी कायम राहणार आहे.१५ वर्षांपूर्वी विद्युतदाहिनी बसवतानाही काही कारणाने नाके मुरडली गेली होती. त्याचे भान ठेवून या स्मार्ट मशिनरी भविष्याचा वेध घेऊन बनवण्यात आल्या आहेत. या सर्व मशीनला गॅसमध्ये कन्व्हर्ट केलेले आहे. ज्यांना लाकूड नको, त्यांना हा दुसरा इकोफ्रेण्डली पर्याय पहिल्या दिवसापासून खुला ठेवण्यात आला.