शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
7
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
8
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
9
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
12
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
13
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
14
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
15
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
16
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
17
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
18
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
20
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)

जलवाहिनी फुटल्यानंतर २७ गावांत कमी दाबाने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

डोंबिवली : पाणी पुरवठा योग्य दाबाने करण्यात यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सोमवारी ...

डोंबिवली : पाणी पुरवठा योग्य दाबाने करण्यात यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सोमवारी एमआयडीसीच्या पाणीपुरवठा उपअभियंत्यांना दिले. २८ मे रोजी कल्याण शीळ महामार्गावर एमआयडीसीची जलवाहिनी फुटली होती, तेव्हापासून पाणी कमी दाबाने येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

जलवाहिनी फुटली, की त्यानंतर बरेच दिवस २७ गावांतील पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेला जबाबदार धरतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भावना तीव्र होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी तातडीने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्याची मागणी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. भोपर, संधप, नांदीवली, सांगावं, सागरली, आजदे यांसह अन्य गावात पाणी पुरवठ्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. भोपर परिसरातील समस्या सोडवण्यात यावी म्हणून समाजसेवक अमर माळी, माजी नगरसेविका रविना माळी आदी महापालिका, एमआयडीसीकडे तक्रारी करत आहेत. त्याची दखल घेऊन महापालिकेने आधीही एमआयडीसीला पत्र दिले होते, त्याचाही उल्लेख नव्या पत्रात केला आहे. समस्या सुटावी आणि नागरिकांना पाणी।मिळावे अशी अपेक्षा महापालिकेने एमआयडीसीकडे व्यक्त केली आहे.