शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जलवाहिनी फुटल्यानंतर २७ गावांत कमी दाबाने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

डोंबिवली : पाणी पुरवठा योग्य दाबाने करण्यात यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सोमवारी ...

डोंबिवली : पाणी पुरवठा योग्य दाबाने करण्यात यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सोमवारी एमआयडीसीच्या पाणीपुरवठा उपअभियंत्यांना दिले. २८ मे रोजी कल्याण शीळ महामार्गावर एमआयडीसीची जलवाहिनी फुटली होती, तेव्हापासून पाणी कमी दाबाने येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

जलवाहिनी फुटली, की त्यानंतर बरेच दिवस २७ गावांतील पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेला जबाबदार धरतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भावना तीव्र होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी तातडीने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्याची मागणी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. भोपर, संधप, नांदीवली, सांगावं, सागरली, आजदे यांसह अन्य गावात पाणी पुरवठ्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. भोपर परिसरातील समस्या सोडवण्यात यावी म्हणून समाजसेवक अमर माळी, माजी नगरसेविका रविना माळी आदी महापालिका, एमआयडीसीकडे तक्रारी करत आहेत. त्याची दखल घेऊन महापालिकेने आधीही एमआयडीसीला पत्र दिले होते, त्याचाही उल्लेख नव्या पत्रात केला आहे. समस्या सुटावी आणि नागरिकांना पाणी।मिळावे अशी अपेक्षा महापालिकेने एमआयडीसीकडे व्यक्त केली आहे.