शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

लोकमत इम्पॅक्ट - वेहळोली गावातील शेतीला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:49 IST

भाताच्या रोपांना जीवदान : पिके करपून गेल्याने शेतकरी चिंतेत, अधिक पावसामुळे भाताचे नुकसान

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा नदीच्या कालव्याच्या पाण्यावर घेत असलेली भाताची रोपेच पाण्याअभावी करपून गेल्याने वेहळोली येथील शेतकरी अडचणीत सापडले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत अधिक वेगाने पाणी सोडून गुरुवारी शेतीला पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.  तालुक्यातील भातसा नदीच्या उजव्या कालव्याजवळ असणाऱ्या गावातील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. पावसाळ्यात जरी उत्पादन कमी आले, तरी त्याची भरपाई शेतकरी उन्हाळ्यात भरून काढतो. यावर्षी अधिक पावसाने भातपिके हातची गेल्याने आता याची थोडीफार भर कालव्याच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न काही शेतकरी करीत असतानाच भातसा धरणाच्या कालव्याचे पाणी येईल, या आशेवर वेहळोली गावातील शेतकऱ्यांनी भातपिकाच्या लागवडीसाठी रोपांची पेरणी केली.

ही पेरणी केली खरी, मात्र शेतीत पाणीच न आल्याने भाताची रोपे जळून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. कालव्याच्या जवळ असलेल्या वेहळोली गावातील शेतकरी बाळू वेखंडे यांनी पावसाळ्यात हातचे पीक गेल्याने निदान आतातरी कालव्याच्या पाण्यावर थोड्याफार प्रमाणात उपलब्ध पाण्याचा उपयोग करून भाताचे उत्पन्न घेऊ, असा विचार मनाशी बाळगून त्यांनी पेरणी केली. मात्र, ही रोपेच पाण्याअभावी करपून गेल्याने त्यांच्यासह ग्रामस्थांच्या समस्या वाढल्या होत्या. मात्र, बुधवारपासून गावातील चारीला पाणी आल्याने भाताच्या रोपांना जीवदान मिळाले आहे.यासंदर्भात भातसा धरण कार्यालयाशी संपर्क साधला असता भातसा धारणापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जुनली गावाजवळील कालव्याचा बांध फुटल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच बांधाचे काम अधिक वेगाने दुरुस्त करून पाणी सोडण्यात आले.कालव्याचे पाणी गावातील चारीला आल्याने आता शेतात पाणी साठायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे रोपे जगून भातपिके घेण्यास नक्कीच उपयोग होणार आहे.- बाळू वेखंडे, शेतकरी

टॅग्स :thaneठाणे