मुंबई : अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन करून घरी परतणाऱ्यांसाठी रात्रभर लोकल सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पश्चिम रेल्वेकडून आठ विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेनेही मेन लाईन आणि हार्बरवर अशा आठ लोकल फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटी ते कल्याण, ठाणे आणि पनवेल दरम्यान या लोकल धावतील. त्या सर्व स्थानकांवर थांबणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. १६.५२ ते २0.२१ दरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जलद लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेटच्या दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. अप जलद लोकल गाड्यांना धीम्या मार्गांवर संध्याकाळी गर्दीच्या वेळेत कधीच थांबा दिला जात नाही. चर्नी रोड स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर दोनवर होणारी गर्दी लक्षात घेता सायंकाळी १६.0३ ते रात्री २२.0७ दरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व धीम्या लोकलना चर्नी रोड स्थानकात थांब देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)१५च्या मध्यरात्री धावणाऱ्या लोकल मेन लाईनसीएसटी ते कल्याण-१.३0 वासीएसटी ते ठाणे- ३.३0 वाकल्याण ते सीएसटी- १.00 वाठाणे ते सीएसटी- २.00 वाहार्बर लाईनसीएसटी ते पनवेल- १.३0 वासीएसटी ते पनवेल- २.४५ वापनवेल ते सीएसटी- १.00 वापनवेल ते सीएसटी- १.४५ वा
म.रे.कडूनही आज रात्रभर लोकल सेवा
By admin | Updated: September 15, 2016 03:26 IST