शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

दृष्टिहिनांच्या कलागुणांचा प्रकाश चमकला!

By admin | Updated: March 22, 2016 02:08 IST

वक्तृत्व, गायन, स्वरचित काव्यवाचन, ब्रेलवाचन, वादविवाद आणि प्रश्नमंजूषा अशा स्पर्धांत दृष्टिहिनांनी आपल्या प्रभावी कलागुणांच्या प्रकाशाने उजेडाची वाट दाखवली.

ठाणे : वक्तृत्व, गायन, स्वरचित काव्यवाचन, ब्रेलवाचन, वादविवाद आणि प्रश्नमंजूषा अशा स्पर्धांत दृष्टिहिनांनी आपल्या प्रभावी कलागुणांच्या प्रकाशाने उजेडाची वाट दाखवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या दृष्टिहिनांनी ज्वलंत विषयावर आपले नेमकेच विचार मांडून श्रोत्यांसह परीक्षकांनाही मंत्रमुग्ध केले. नांदेडहून आलेल्या प्रदीप नरावडे या मुलाने आपल्या सुरेल आवाजातील गाण्याने उपस्थितांची मने जिंकली. त्याचा या सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला. नेत्रदीप संस्थेच्या वतीने अंध विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. हितवर्धिनी सभागृहात दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. महाराष्ट्रभरातून १८० हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. ‘दहशतवाद जगाला लागलेली एक कीड’, ‘भारतीय राजकारणाची दशा आणि दिशा’, ‘पर्जन्यसंवर्धन ही काळाची गरज’, ‘आरक्षणाची व्याख्या बदलण्याची गरज आहे का?’, ‘सावित्रीबाई फुले आणि आधुनिक स्त्रिया’ या विषयांवर स्पर्धकांनी वक्तृत्व स्पर्धेतून आपले परखड मत मांडले. ब्रेलवाचन ही स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधून घेण्यात आली. या स्पर्धेत ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. वादविवाद स्पर्धेचे विषय स्पर्धेच्या वेळी जाहीर करण्यात आले होते. या वेळी स्पर्धकांचा तीन जणांचा गट करून देण्यात आला. ‘भारतातील सध्याचे वातावरण सहिष्णू की असहिष्णू’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअप अशा सोशल मीडियाचा उपयोग ही आजच्या तरु णाईची गरज की चैन’, ‘महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची वेळ आली आहे का?’, ‘बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना आपला स्वाभिमान गमावत चालली आहे का?’ या विषयांवर दृष्टिहिनांची वादविवाद स्पर्धा रंगली होती. स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत ४० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धा शनिवारी पार पडल्या, तर रविवारी प्रश्नमंजूषा स्पर्धा व गायन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)