शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

तलावातील जीवसृष्टी संकटात

By admin | Updated: September 26, 2015 00:52 IST

शहराची चौपटी म्हणून ओळख असलेल्या मासुंदासह इतर तलावातील जीवसृष्टी कळत नकळत त्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

पंकज रोडेकर , ठाणेशहराची चौपटी म्हणून ओळख असलेल्या मासुंदासह इतर तलावातील जीवसृष्टी कळत नकळत त्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ती वाचवण्यासाठी पर्यावरण संस्थांबरोबर अन्यसामाजिक संस्थांनीही विविध उपाययोजना राबवण्याची गरज असल्याची बाब लोकमतने हाती घेतलेल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या चळवळीच्या माध्यमातून पुढे आली आहे. तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ, असे ठाणेकरांकडून बोलले जात आहे.ठाणे रेल्वे स्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावर हा तलाव आहे. या ऐतिहासिक तलावाला ‘तलावपाळी’ असेही म्हटले जाते. ठाण्याचे गावदैवत असलेल्या कौपिनेश्वर मंदीर, गडकरी रंगायतन, सेंट जॉन हायस्कूल यासारख्या वास्तू त्याच्या आजूबाजूला आहेत. त्यातच शहराची चौपटी म्हणून त्याची ओळख निर्माण झाल्याने शहरातील नागरिकांसह शाळा-महाविद्यालयातील तरुणाईचा येथे नेहमीच ओढा दिसतो. हा परिसर दिवस-रात्र गजबजलेला असतो. मग यामध्ये सकाळी जॉंगिंगपासून प्रेमीयुगुलापर्यंतची गर्दी होते. विशेषता येणाऱ्यांची पोटपूजा व्हावी म्हणून तलावाला खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी वेढल्याचे दिसते. चौपटी सुशोभिकरण करण्यासाठी त्यातील गाळ उपसून नैसर्गिक झऱ्याकडे लक्ष देण्यात आले. याचदरम्यान, तेथील प्रदूषण रोखण्यासाठी बाप्पांचे विसर्जन एका ठराविक ठिकाणी केले जाऊ लागले. मात्र, दुसरीकडे येथे कोणतेही परवाने नसलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या गाड्यांवरील शेवटी उरलेले पदार्थ तलावात टाकले जातात. तसेच खाऊन झालेल्या प्लेट ठेवण्यासाठी त्यांच्याकडे योग्य भांडे (डस्टबीन) नसल्याने त्या पदार्थांबरोबर रस्त्यांवरील घोड्यांची विष्टाही पाण्यामार्फत तलावात जाते. तसेच फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांकडून तलावातील माशांना पाव, बिस्टीक टाकण्याची जणू प्रथा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चायनिज तयार करण्यासाठी लागणारे अजिनोमोटो, व्हिनेगर आणि पावातील यीस्टमुळे जीवसृष्टीला जणू आपण विष देत असल्याने ती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हे दृश्य केवळ तलावपाळीच नव्हे तर शहरातील बहुसंख्य तलावांच्या ठिकाणी थोड्याफार फरकाने सारखीच आहे.प्रदूषण रोखण्याबरोबर ही जीवसृष्टी वाचविण्यासाठी पालिका प्रशासनाबरोबर काही सामाजिक व पर्यावरण संस्थांनी पुढाकार घेऊन येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवाने देण्याबरोबर त्यांच्याकडे उरले-सुरले पदार्थांसाठी त्यांना डस्टबीन द्यावेत. तर दिवसभर साचणारे त्यातील पदार्थ घंटागाडी मार्फत उचलून न्यावेत, अशी मागणी आता ठाणेकारांकडून पुढे येऊ लागली आहे.