शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

नातू झाला तरी सासरी छळ सुरूच; नातवानेच फोडली आजीच्या छळाला वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: नातू झाला तरी सासरी छळ होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अगदी अलीकडे केवळ पाणी भरण्याच्या वादावरून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: नातू झाला तरी सासरी छळ होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अगदी अलीकडे केवळ पाणी भरण्याच्या वादावरून वयोवृद्ध पत्नीला अमानूषपणे मारहाण करणाऱ्या कथित ह. भ. प. गजाननबुवा चिकणकरला हिललाईन पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे त्याच्या अघोरी कृत्याचा व्हिडिओ नातवानेच काढून तो व्हायरल केल्यामुळे हा प्रकार समोर आला होता. ठाणे शहर आयुक्तालय क्षेत्रात गेल्या दीड वर्षात कौटुंबीक हिंसाचाराच्या ४६९, तर ठाणे ग्रामीणमध्ये ३२ तक्रारी दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कल्याण तालुक्यातील मलंगपट्टयातील द्वारली गावातील चिकणकर या बुवाची पत्नीसह कुटुंबातील सर्वांवर चांगलीच दहशत आहे. तो आपल्या पत्नीला क्षुल्लक कारणावरून नेहमीच मारहाण करायचा. एक आठवडयापूर्वीही त्याने ८३ वर्षीय पत्नीला अशीच बेदम मारहाण केली. त्याचे चित्रण नऊ वर्षांच्या नातवाने मोबाईलमध्ये करून ते व्हायरल केले. या प्रकाराने संताप व्यक्त होताच तो आळंदीला पसार झाला. त्यानंतर हिललाईन पोलिसांनी त्याला आळंदी येथून अटक केली. विशेष म्हणजे त्याला ताब्यात घेतल्यानंतरही आपल्या ८५ वर्षीय पतीविरूद्ध या वृद्धेने तक्रार दिली नव्हती. अशाच प्रकारे अनेक महिला या कौटुंबीक हिंसाचाराला बळी पडतात. त्यांनी तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

* नॅशनल क्राईम रिपोर्टनुसार विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारींचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ टक्के इतके आहे. आपल्या राज्यात हे प्रमाण २१.४ टक्के इतके आहे. ठाणे जिल्ह्यात हे प्रमाण १२ ते १५ टक्के इतके आहे. लग्नानंतर २३ ते ३५ वयोगटातील महिला सासरी हिंसाचाराच्या बळी ठरतात. यामध्ये ग्रामीण १० टक्के, तर शहरी १८ टक्के इतके हे प्रमाण आहे.

........................................

* २०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -

शहरी भागात किती - २७९

ग्रामीण भागात किती - ४५

*२०२१ (मेपर्यंत) जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -

शहरी भागात किती - २२२

ग्रामीण भागात किती - २०

* पन्नाशी ओलांडली तरी छळ सुरूच

कल्याणमध्ये तर वयाचे पाऊण शतक पार केलेल्या महिलेला पतीने मारहाणीचा प्रकार समोर आला. असाच प्रकार अगदी पन्नाशी ओलांडलेल्या महिलांनाही सासरी कधी हुंडयासाठी, तर कधी चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली होती. ठाणे शहर आयुक्तालयात ४९८ - अ (छळामुळे मृत्यू) अंतर्गत २०२० मध्ये दहा, तर २०२१मध्ये एक गुन्हा दाखल झाला. ठाणे ग्रामीणमध्ये दीड वर्षात अशा ५८ तक्रारी दाखल आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या (कलम ४९८ सह ३०६) ठाणे शहरमध्ये २१ आणि ग्रामीणमध्ये पाच तक्रारींची नोंद आहे. केवळ शारीरिक, मानसिक छळवणुकीच्या (४९८) ठाणे शहरमध्ये ४६९, तर ग्रामीणमध्ये दोन तक्रारींची नोंद आहे.

‘‘महिलांनी कोणत्याही प्रकारच्या कौटुंबीक हिंसाचाराला बळी न पडता त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणे आवश्यक आहे. एखादा गुन्हा प्राथमिक अवस्थेत असेल त्याचवेळी त्यावर बैठक घेऊन नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तरीही त्यावर नियंत्रण येत नसेल तर अशा वेळी कायद्याचा बडगा उगारणे आवश्यक आहे.’’

एक सामाजिक कार्यकर्ती, ठाणे.

................................

‘‘महिला आता सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. असे असूनही जर पतीकडून किंवा सासरच्या मंडळींकडून विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास होत असेल किंवा हुंडयासाठी छळ होत असेल तर याबाबत पोलीस ठाण्यात त्याची तक्रार करणे अपेक्षित आहे. सर्वच तक्रारींनी लगेच संसार उद्ध्वस्त होत नाहीत. संसार मोडू नये, यासाठी या तक्रारी केल्या जात नाहीत. परंतु, तक्रार केलीच नाही तर यातून मोठी दुर्घटना होण्याचीही भीती असते.

एक सामाजिक कार्यकर्ती, ठाणे.

.......................