शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

नातू झाला तरी सासरी छळ सुरूच; नातवानेच फोडली आजीच्या छळाला वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: नातू झाला तरी सासरी छळ होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अगदी अलीकडे केवळ पाणी भरण्याच्या वादावरून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: नातू झाला तरी सासरी छळ होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अगदी अलीकडे केवळ पाणी भरण्याच्या वादावरून वयोवृद्ध पत्नीला अमानूषपणे मारहाण करणाऱ्या कथित ह. भ. प. गजाननबुवा चिकणकरला हिललाईन पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे त्याच्या अघोरी कृत्याचा व्हिडिओ नातवानेच काढून तो व्हायरल केल्यामुळे हा प्रकार समोर आला होता. ठाणे शहर आयुक्तालय क्षेत्रात गेल्या दीड वर्षात कौटुंबीक हिंसाचाराच्या ४६९, तर ठाणे ग्रामीणमध्ये ३२ तक्रारी दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कल्याण तालुक्यातील मलंगपट्टयातील द्वारली गावातील चिकणकर या बुवाची पत्नीसह कुटुंबातील सर्वांवर चांगलीच दहशत आहे. तो आपल्या पत्नीला क्षुल्लक कारणावरून नेहमीच मारहाण करायचा. एक आठवडयापूर्वीही त्याने ८३ वर्षीय पत्नीला अशीच बेदम मारहाण केली. त्याचे चित्रण नऊ वर्षांच्या नातवाने मोबाईलमध्ये करून ते व्हायरल केले. या प्रकाराने संताप व्यक्त होताच तो आळंदीला पसार झाला. त्यानंतर हिललाईन पोलिसांनी त्याला आळंदी येथून अटक केली. विशेष म्हणजे त्याला ताब्यात घेतल्यानंतरही आपल्या ८५ वर्षीय पतीविरूद्ध या वृद्धेने तक्रार दिली नव्हती. अशाच प्रकारे अनेक महिला या कौटुंबीक हिंसाचाराला बळी पडतात. त्यांनी तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

* नॅशनल क्राईम रिपोर्टनुसार विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारींचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ टक्के इतके आहे. आपल्या राज्यात हे प्रमाण २१.४ टक्के इतके आहे. ठाणे जिल्ह्यात हे प्रमाण १२ ते १५ टक्के इतके आहे. लग्नानंतर २३ ते ३५ वयोगटातील महिला सासरी हिंसाचाराच्या बळी ठरतात. यामध्ये ग्रामीण १० टक्के, तर शहरी १८ टक्के इतके हे प्रमाण आहे.

........................................

* २०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -

शहरी भागात किती - २७९

ग्रामीण भागात किती - ४५

*२०२१ (मेपर्यंत) जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -

शहरी भागात किती - २२२

ग्रामीण भागात किती - २०

* पन्नाशी ओलांडली तरी छळ सुरूच

कल्याणमध्ये तर वयाचे पाऊण शतक पार केलेल्या महिलेला पतीने मारहाणीचा प्रकार समोर आला. असाच प्रकार अगदी पन्नाशी ओलांडलेल्या महिलांनाही सासरी कधी हुंडयासाठी, तर कधी चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली होती. ठाणे शहर आयुक्तालयात ४९८ - अ (छळामुळे मृत्यू) अंतर्गत २०२० मध्ये दहा, तर २०२१मध्ये एक गुन्हा दाखल झाला. ठाणे ग्रामीणमध्ये दीड वर्षात अशा ५८ तक्रारी दाखल आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या (कलम ४९८ सह ३०६) ठाणे शहरमध्ये २१ आणि ग्रामीणमध्ये पाच तक्रारींची नोंद आहे. केवळ शारीरिक, मानसिक छळवणुकीच्या (४९८) ठाणे शहरमध्ये ४६९, तर ग्रामीणमध्ये दोन तक्रारींची नोंद आहे.

‘‘महिलांनी कोणत्याही प्रकारच्या कौटुंबीक हिंसाचाराला बळी न पडता त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणे आवश्यक आहे. एखादा गुन्हा प्राथमिक अवस्थेत असेल त्याचवेळी त्यावर बैठक घेऊन नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तरीही त्यावर नियंत्रण येत नसेल तर अशा वेळी कायद्याचा बडगा उगारणे आवश्यक आहे.’’

एक सामाजिक कार्यकर्ती, ठाणे.

................................

‘‘महिला आता सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. असे असूनही जर पतीकडून किंवा सासरच्या मंडळींकडून विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास होत असेल किंवा हुंडयासाठी छळ होत असेल तर याबाबत पोलीस ठाण्यात त्याची तक्रार करणे अपेक्षित आहे. सर्वच तक्रारींनी लगेच संसार उद्ध्वस्त होत नाहीत. संसार मोडू नये, यासाठी या तक्रारी केल्या जात नाहीत. परंतु, तक्रार केलीच नाही तर यातून मोठी दुर्घटना होण्याचीही भीती असते.

एक सामाजिक कार्यकर्ती, ठाणे.

.......................