शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

भिवंडीतील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

भिवंडी : महापालिका क्षेत्रातील कल्याण नाका ते पट्टीनाक्यावरील जोडणाऱ्या स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना ...

भिवंडी : महापालिका क्षेत्रातील कल्याण नाका ते पट्टीनाक्यावरील जोडणाऱ्या स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. दरवर्षी या पुलाच्या दुरुस्तीवर लाखोंचा निधी खर्च करूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलावरील खड्ड्यांचा त्रास सुरू झाला आहे. आतापर्यंत यावर केलेला कोट्यवधींचा निधीही खड्ड्यात गेल्याची लाखाेली या पुलावरून जाणारे वाहनचालक वाहत आहेत.

भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूककोंडीची समस्या सुटावी म्हणून हा उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. हा पूल सुरुवातीपासूनच कमकुवत आहे. तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. दोन महिन्यांपूर्वी या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवर सात कोटींचा खर्च केला हाेता. अजूनही दिखाव्यापुरते हे दुरुस्ती काम सुरूच आहे, मात्र अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू केलेला नाही. त्याच वेळी या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. हा उड्डाणपूल सुरुवातीपासून नादुरुस्त असल्याने त्याच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष सुरू आहे.

तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाला भगदाड पडल्याने हा पूल अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. तर, या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे सात कोटी मंजूर झाल्यावर येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीस सुरुवात झाली. कल्याण नाक्यावरून धामणकर नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे दुरुस्ती पूर्ण झाली. त्यानंतर, पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित भागातील दुरुस्ती रखडली आहे. आता या उड्डाणपुलावर मोठमोठे खोल खड्डे पडल्याने या पुलावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी व हलके वाहनचालक मेटाकुटीला आले असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत. तर, खड्ड्यात आपटून वाहने नादुरुस्त होत असल्याने चालकांना आर्थिक फटका बसत आहे. पुलावरच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे भिवंडी महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त हाेत आहे. दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून लवकर उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांसह चालकांकडून केली जात आहे.