शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

लाल बावटा रिक्षा युनियन काळ्या फिती बांधून करणार सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : २०१४ साली भाजपने खोटे बोलून व ईव्हीएम घोटाळा करून केंद्रातील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : २०१४ साली भाजपने खोटे बोलून व ईव्हीएम घोटाळा करून केंद्रातील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून आतापर्यंत या सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करीत, याचा निषेध म्हणून लाल बावटा रिक्षा युनियनतर्फे २६ मे रोजी काळा दिवस साजरा करण्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमासकर यांनी बुधवारी केली. ३० मे रोजी शहरात काळ्या फिती बांधून निषेध करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मोदी सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप करीत, त्याचा पाढाच कोमासकर यांनी यावेळी वाचला.

कोरोना पसरवण्याससुद्धा मोदी सरकार जबाबदार आहे. सुरुवातीला पूर्ण देश लॉकडाऊन करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद केले पाहिजे होते. दिल्लीच्या पाच सीमांवर हजारो शेतकरी सहा महिन्यांपासून न्यायासाठी बसले आहेत. त्यांच्याबाबत सरकार अडेलतट्टू भूमिका घेत आहे. ७ वर्षांत शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, दुकानदार, रिक्षावाले, फेरीवाले इत्यादी कष्टकरी नागरिकांसह कोरोनाग्रस्त रुग्णांनाही न्याय देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कोमासकरर यांनी केला. देशभरातील शेकडो कामगार, शेतकरी संघटनांनी २६ मे हा काळा दिवस घोषित करून सरकारचा निषेध करण्याचे ठरवल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाला डोंबिवलीतील संघटनेचे रिक्षाचालक सदस्य काळे झेंडे व काळ्या फिती बांधून निषेध करणार आहेत.