शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

लाल बावटा रिक्षा युनियन काळ्या फिती बांधून करणार सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : २०१४ साली भाजपने खोटे बोलून व ईव्हीएम घोटाळा करून केंद्रातील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : २०१४ साली भाजपने खोटे बोलून व ईव्हीएम घोटाळा करून केंद्रातील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून आतापर्यंत या सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करीत, याचा निषेध म्हणून लाल बावटा रिक्षा युनियनतर्फे २६ मे रोजी काळा दिवस साजरा करण्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमासकर यांनी बुधवारी केली. ३० मे रोजी शहरात काळ्या फिती बांधून निषेध करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मोदी सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप करीत, त्याचा पाढाच कोमासकर यांनी यावेळी वाचला.

कोरोना पसरवण्याससुद्धा मोदी सरकार जबाबदार आहे. सुरुवातीला पूर्ण देश लॉकडाऊन करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद केले पाहिजे होते. दिल्लीच्या पाच सीमांवर हजारो शेतकरी सहा महिन्यांपासून न्यायासाठी बसले आहेत. त्यांच्याबाबत सरकार अडेलतट्टू भूमिका घेत आहे. ७ वर्षांत शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, दुकानदार, रिक्षावाले, फेरीवाले इत्यादी कष्टकरी नागरिकांसह कोरोनाग्रस्त रुग्णांनाही न्याय देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कोमासकरर यांनी केला. देशभरातील शेकडो कामगार, शेतकरी संघटनांनी २६ मे हा काळा दिवस घोषित करून सरकारचा निषेध करण्याचे ठरवल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाला डोंबिवलीतील संघटनेचे रिक्षाचालक सदस्य काळे झेंडे व काळ्या फिती बांधून निषेध करणार आहेत.