शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

वांगणी स्थानकात सोयीसुविधांची कमतरता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 06:16 IST

ठाणे जिल्ह्यातील टोक असलेले वांगणी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढते आहे. या भागात अनेक गृहसंकुले उभी राहत असून तेथे राहण्यासाठी आलेले बहुतांश लोक चाकरमानी असल्याने पर्यायाने रेल्वे प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील टोक असलेले वांगणी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढते आहे. या भागात अनेक गृहसंकुले उभी राहत असून तेथे राहण्यासाठी आलेले बहुतांश लोक चाकरमानी असल्याने पर्यायाने रेल्वे प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी वांगणीकरांची माफक अपेक्षा आहे. मात्र, वांगणी रेल्वे स्थानकामध्ये सुविधा पुरवण्यात रेल्वे प्रशासनाला रस नसल्याचे दिसते आहे.वाढत्या प्रवासी संख्येबरोबरच वांगणीत रेल्वे प्रवाशांच्या समस्याही वाढत आहेत. या स्थानकात मुंबई दिशेला रेल्वेचा पादचारी पूल असला, तरी कर्जत दिशेला मात्र अद्यापही पादचारी पूल नाही. त्यामुळे प्रवाशांना रूळ ओलांडण्याचा धोका पत्करावा लागतो आहे. स्थानिक खा. कपिल पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी लोकसभेत शून्य प्रहरात या रेल्वे पादचारी पुलाचा मुद्दा उपस्थित केला होता. रेल्वेमार्गावर उड्डाणपूल नसल्याने नागरिकांची गैरसोय होते आहे. विशेषत: महिला, मुले आणि वृद्धांचे रेल्वेमार्ग ओलांडताना हाल होतात. तर, रेल्वेखाली सापडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या भागात रेल्वेमार्गावर उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे.रेल्वे पादचारी पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी वांगणीत सनराइज सामाजिक संस्थेने स्वाक्षरी मोहीम राबवली होती. शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी करून या मोहिमेला पाठिंबा दर्शवला. वांगणी रेल्वे स्टेशनवर येजा करण्यासाठी एकही प्रशस्त मार्ग नाही. वांगणी रेल्वे स्टेशनवर केवळ दोनच तिकीट खिडक्या आहेत. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना तिकिटासाठी ताटकळत बसावे लागते. तिकीट खिडक्यांची संख्या वाढवण्याबरोबरच वांगणीत लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या रेल्वेचे आरक्षण केंद्रही सुरू करण्याची स्थानिकांची मागणी आहे. शिवाय, स्थानकावर बसण्यासाठी पुरेसे बाकडे आणि संपूर्ण स्थानकावर शेड नसल्याने पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात प्रवाशांना पायºयांवर बसावे लागते.गाड्यांची संख्या अपुरी : वांगणीला जाण्यासाठी केवळ कर्जत आणि खोपोलीकडे जाणाºया गाड्यांवरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागते. दिवसाला केवळ ३३ गाड्या जाण्यासाठी आणि ३३ गाड्या येण्यासाठी आहेत. मात्र, या गाड्यांमधील अंतरदेखील मोठे असल्याने वांगणीकरांची प्रचंड गैरसोय होत असल्याने या मार्गावर गाड्या वाढवण्याची तसेच वांगणी लोकल सुरू करण्याचीही मागणी आहे. कल्याण-कर्जत शटल सेवा सुरू केल्यास त्याचाही लाभ वांगणीच्या प्रवाशांना होऊ शकतो, असेही ते सांगतात.उड्डाणपुलाअभावी वाहतुकीचा खोळंबा : वांगणीच्या पूर्व-पश्चिम भागात येजा करण्यासाठी उड्डाणपूल नसल्याने वाहनाने पूर्व पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे गेट ओलांडूनच जावे लागते. रेल्वे स्थानकात रेल्वे येताना व जाताना हे गेट बंद असल्यामुळे वाहनचालकांना खोळंबून राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर वांगणीच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडणाºया उड्डाणपुलाची उभारणी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल