शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेलार ग्रामपंचायतीचे कोविड सेंटर अडकले लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेलार ग्रामपंचायतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने ते रुग्णांच्या सेवेत ...

भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेलार ग्रामपंचायतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने ते रुग्णांच्या सेवेत येऊ शकत नाही, अशी खंत सरपंच ॲड. किरण चन्ने यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी विनाकारण खोडा घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ५० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर १५ दिवसांत ग्रामनिधी व लोकसहभागातून उभारले. सरपंच चन्ने यांनी ग्रामपंचायत पातळीवर कोविड सेंटर जिल्हा परिषद शाळेत ग्रामनिधीतून उभारण्याचा निर्णय सभेत घेत कार्यवाही सुरू केली. त्यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी सहकार्याचा हात पुढे करीत १५ दिवसांत शाळेचे रूपांतर सुसज्ज कोविड सेंटरमध्ये करण्यात आले. सरकारी सर्व नियमांचे पालन करीत हे सेंटर उभारले आहे. कोविड सेंटर परिसरात सीसीटीव्ही केमॅरे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोयही करण्यात आली आहे. तसेच रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी स्वयंपाकगृहही याठिकाणी उभारण्यात आले आहे.

सरकारी मंजुरीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार केला. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिल्या गेलेल्या आरोग्य विभागाच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी कार्यालयातील आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांनी परवानगी नाकारल्याने हे सेंटर तयार होऊनही सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत येऊ शकले नाही याची खंत चन्ने यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती कुंदन पाटील यांनीही केंद्राबद्दल प्रशंसा केली. परंतु, क्षुल्लक त्रुटी दाखवून परवानगी न देणे म्हणजे सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. या सेंटरसाठी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, अग्नी व विद्युत यंत्रणेचे परीक्षण ग्रामपंचायतीने स्वखर्चाने करून घेत सर्व अटींची पूर्तता केली असतानाही आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण दाखविले जाते हे चुकीचे असल्याचे सांगितले. असंवेदनशील, उदासीन प्रशासन यंत्रणेचे हे अपयश असून, कोविड सेंटर तयार असून ते सुरू होऊन रुग्णांच्या उपयोगी यावे हीच आमची इच्छा आहे. जर रुग्ण दगावल्यास त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही चन्ने यांनी दिला आहे.