शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

घरपोच गणवेशामुळे मुले खूश!

By admin | Updated: May 23, 2016 02:32 IST

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून घरपोच गणवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ३० जूनपूर्वी मुलांपर्यंत गणवेश पोहोचलेले असतील

सदानंद नाईक, उल्हासनगरमहापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून घरपोच गणवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ३० जूनपूर्वी मुलांपर्यंत गणवेश पोहोचलेले असतील. मुलांमध्ये शाळेत येण्याची ओढ वाढीस लागावी, याकरिता हा निर्णय घेतल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. उल्हासनगर पालिका शिक्षण मंडळ नेहमीच वादात राहिले आहे. शाळांच्या पटसंख्येवर ६ हजार ६०० विद्यार्थी दाखवले आहेत. त्यापैकी ३० टक्के विद्यार्थी बोगस दाखवल्याचा आरोप होत आहे. घरोघर गणवेश पाठवले तर विद्यार्थ्यांची नेमकी संख्या समजेल व आरोपांची शहानिशा करता येईल. तसेच मंडळाची प्रतिमा सुधारण्याकरिता शाळा डिजिटल करणे, मुलांना घरपोच गणवेश देणे, शैक्षणिक साहित्याचे वाटप पहिल्याच आठवड्यात करणे आदी उपक्रम राबवण्याचा संकल्प केल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले. एकीकडे प्रतिमा सुधारण्याकरिता वरील उपक्रम राबवतानाच दुसरीकडे पालिका प्रशासनाने बोगस विद्यार्थ्यांबाबत शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुढील महिन्यात विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणात बोगस विद्यार्थी आढळल्यास संबंधित शिक्षक व मुख्याध्यापक यांना जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.शैक्षणिक साहित्य, गणवेश, चिक्की यांची खरेदी करताना पटसंख्या विचारात घेतली जाते. विद्यार्थ्यांची कमी संख्या असताना जादा खरेदी केल्याने मंडळाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे लेंगरेकर यांनी कबूल केले. शाळांच्या पुनर्बांधणीसह डिजिटल शाळांची संकल्पना उपायुक्त लेंगरेकर यांची आहे. शाळांना २५ लाखांच्या निधीतून संगणकांसह प्रोजेक्टर पुरवले आहे. डिजिटल शाळांची संकल्पना राबवायची आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवीचे वर्ग सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)