शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

केडीएमसीच्या आकृतिबंधात काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:49 IST

कल्याण : केडीएमसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा भरती आणि आकृतिबंधास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. मात्र, त्यात ...

कल्याण : केडीएमसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा भरती आणि आकृतिबंधास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. मात्र, त्यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना झुकते माप दिले आहे. तर काहींवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे या आकृतिबंधात फेरबदल करून त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात चव्हाण यांनी मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. या वेळी भाजपचे पदाधिकारी शशिकांत कांबळे, विकास म्हात्रे, राहुल दामले, मंदार हळबे आदी उपस्थित होते. मनपाच्या सरळ सेवा भरती आणि आकृतिबंध मंजुरीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यासाठी नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची समिती होती. त्यानंतर महासभेने ठराव मंजूर केला. त्यानंतर तो राज्य सरकारने मंजूर केला आहे. मात्र, त्यात काहींना जास्तीचा लाभ दिल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. ज्यांना लाभ मिळणार आहे, त्यांना आमचा विरोध नाही. मात्र, जे लाभापासून वंचित राहणार आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांचा फेरविचार व्हावा, अशी आमची मागणी असल्याचे चव्हाण म्हणाले.

मनपाच्या सचिव आणि उद्यान अधीक्षक पदावर कार्यरत असलेले संजय जाधव यांना चुकीच्या पद्धतीने लाभ दिला गेला आहे. अन्य मनपात उद्यान अधीक्षक हे पद वर्ग दोनचे आहे. तर, केडीएमसीत ते पद वर्ग एकचे केले आहे. त्यामुळे जाधव यांना लाखो रुपये पगार मिळणार असल्याची बाब चव्हाण यांनी नमूद केली आहे. अशी अनेक उदाहरणे या आकृतिबंधात आहेत. आकृतिबंध मंजूर करताना आस्थापना खर्चाची मर्यादा ३५ टक्के इतकी घालून दिली आहे. तर, काहींना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिल्याने आस्थापना खर्च वाढणार आहे. सरकारची ही दुटप्पी भूमिका यातून उघड होत आहे, असे ते म्हणाले.

२७ गावांतील भूमिपुत्रांवर अन्याय

२०१५ मध्ये मनपात २७ गावे समाविष्ट केली गेली. त्या वेळी त्या गावांतील ४९८ कर्मचारी मनपात घेतले. मात्र, या कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधात विचार केलेला नाही. ४९८ पैकी ४०० कामगार हे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

--------------------