शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या आकृतिबंधात काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:49 IST

कल्याण : केडीएमसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा भरती आणि आकृतिबंधास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. मात्र, त्यात ...

कल्याण : केडीएमसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा भरती आणि आकृतिबंधास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. मात्र, त्यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना झुकते माप दिले आहे. तर काहींवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे या आकृतिबंधात फेरबदल करून त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात चव्हाण यांनी मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. या वेळी भाजपचे पदाधिकारी शशिकांत कांबळे, विकास म्हात्रे, राहुल दामले, मंदार हळबे आदी उपस्थित होते. मनपाच्या सरळ सेवा भरती आणि आकृतिबंध मंजुरीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यासाठी नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची समिती होती. त्यानंतर महासभेने ठराव मंजूर केला. त्यानंतर तो राज्य सरकारने मंजूर केला आहे. मात्र, त्यात काहींना जास्तीचा लाभ दिल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. ज्यांना लाभ मिळणार आहे, त्यांना आमचा विरोध नाही. मात्र, जे लाभापासून वंचित राहणार आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांचा फेरविचार व्हावा, अशी आमची मागणी असल्याचे चव्हाण म्हणाले.

मनपाच्या सचिव आणि उद्यान अधीक्षक पदावर कार्यरत असलेले संजय जाधव यांना चुकीच्या पद्धतीने लाभ दिला गेला आहे. अन्य मनपात उद्यान अधीक्षक हे पद वर्ग दोनचे आहे. तर, केडीएमसीत ते पद वर्ग एकचे केले आहे. त्यामुळे जाधव यांना लाखो रुपये पगार मिळणार असल्याची बाब चव्हाण यांनी नमूद केली आहे. अशी अनेक उदाहरणे या आकृतिबंधात आहेत. आकृतिबंध मंजूर करताना आस्थापना खर्चाची मर्यादा ३५ टक्के इतकी घालून दिली आहे. तर, काहींना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिल्याने आस्थापना खर्च वाढणार आहे. सरकारची ही दुटप्पी भूमिका यातून उघड होत आहे, असे ते म्हणाले.

२७ गावांतील भूमिपुत्रांवर अन्याय

२०१५ मध्ये मनपात २७ गावे समाविष्ट केली गेली. त्या वेळी त्या गावांतील ४९८ कर्मचारी मनपात घेतले. मात्र, या कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधात विचार केलेला नाही. ४९८ पैकी ४०० कामगार हे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

--------------------