शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

केडीएमसीच्या आकृतिबंधात काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:49 IST

कल्याण : केडीएमसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा भरती आणि आकृतिबंधास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. मात्र, त्यात ...

कल्याण : केडीएमसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा भरती आणि आकृतिबंधास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. मात्र, त्यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना झुकते माप दिले आहे. तर काहींवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे या आकृतिबंधात फेरबदल करून त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात चव्हाण यांनी मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. या वेळी भाजपचे पदाधिकारी शशिकांत कांबळे, विकास म्हात्रे, राहुल दामले, मंदार हळबे आदी उपस्थित होते. मनपाच्या सरळ सेवा भरती आणि आकृतिबंध मंजुरीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यासाठी नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची समिती होती. त्यानंतर महासभेने ठराव मंजूर केला. त्यानंतर तो राज्य सरकारने मंजूर केला आहे. मात्र, त्यात काहींना जास्तीचा लाभ दिल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. ज्यांना लाभ मिळणार आहे, त्यांना आमचा विरोध नाही. मात्र, जे लाभापासून वंचित राहणार आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांचा फेरविचार व्हावा, अशी आमची मागणी असल्याचे चव्हाण म्हणाले.

मनपाच्या सचिव आणि उद्यान अधीक्षक पदावर कार्यरत असलेले संजय जाधव यांना चुकीच्या पद्धतीने लाभ दिला गेला आहे. अन्य मनपात उद्यान अधीक्षक हे पद वर्ग दोनचे आहे. तर, केडीएमसीत ते पद वर्ग एकचे केले आहे. त्यामुळे जाधव यांना लाखो रुपये पगार मिळणार असल्याची बाब चव्हाण यांनी नमूद केली आहे. अशी अनेक उदाहरणे या आकृतिबंधात आहेत. आकृतिबंध मंजूर करताना आस्थापना खर्चाची मर्यादा ३५ टक्के इतकी घालून दिली आहे. तर, काहींना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिल्याने आस्थापना खर्च वाढणार आहे. सरकारची ही दुटप्पी भूमिका यातून उघड होत आहे, असे ते म्हणाले.

२७ गावांतील भूमिपुत्रांवर अन्याय

२०१५ मध्ये मनपात २७ गावे समाविष्ट केली गेली. त्या वेळी त्या गावांतील ४९८ कर्मचारी मनपात घेतले. मात्र, या कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधात विचार केलेला नाही. ४९८ पैकी ४०० कामगार हे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

--------------------