शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

केडीएमसीने बजावली ५० चाळींना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाकडून शून्य कचरा मोहीम राबविली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी चाळीत राहणारे नागरिक कचरा वर्गीकरण करून ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाकडून शून्य कचरा मोहीम राबविली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी चाळीत राहणारे नागरिक कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत देत नाही. ते कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे यापुढे कचरा उघड्यावर टाकल्यास दंड आकारण्यात येईल, अशी नोटीस मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ५० चाळींना बजावली आहे.

मनपाने मे २०२० शून्य कचरा मोहीम सुरू केली तेव्हा शहरातील कचराकुंड्या हटवल्या. ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीतच दिला पाहिजे, असा त्यामागचा उद्देश होता. तर, मोठ्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे प्रकल्प राबवण्यास सांगितले. कचऱ्यात येणारे कपडे वगळे गोळा केले. महिला बचतगटांकडून वापरण्याजोग्या कपड्यापासून कापडी पिशव्या तयार केल्या. तसेच रबर, प्लास्टिक, काचा आदी वेगळे गोळा करण्यासाठी वार ठरविले. प्लास्टिक कचरा गोळा करून तो रिसायकलिंगला दिला. तसेच ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम राबवला. दुसरीकडे आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात मनपाला यश आले.

दरम्यान, चाळीतील रहिवासी कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे मनपाने त्यांना कचरा वर्गीकरण करून तो घंटागाडीत देण्याची सक्ती केली आहे. चाळ परिसरात घंडागाडी दोन वेळा येणार आहे. कचरा उघड्यावर टाकणाऱ्यास सुरुवातीला प्रत्येकी ३०० रुपये दंड आकारला जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे. ही कारवाई करण्यासाठी कल्याण पश्चिमेतील आणि डोंबिवली पश्चिमेतील जवळपास ५० चाळींना नोटिसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे.

ग्रामीण भागात कचरा पडूनच

केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील कचरा उचलला जात नाही. तो ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पडून असतो, अशी माहिती माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शून्य कचरा मोहीम राबविली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.

‘कचऱ्याचे फोटो मनपाच्या वेबसाइटवर पाठवा’

कल्याण पूर्वेत कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे कचऱ्याचे फोटो नागरिकांनी काढून मनपाच्या वेबसाइटवर पाठवावेत, असे आवाहन तेथील भाजपचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना केले आहे. त्यामुळे शून्य कचरा मोहीम ही किती फसवी आहे, हे उघड होईल. कचरा उचलला जात नसेल, तर घनकचरा कर नागरिक का भरतील, असा सवाल मोरे यांनी केला आहे.

---------------