शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीने बजावली ५० चाळींना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाकडून शून्य कचरा मोहीम राबविली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी चाळीत राहणारे नागरिक कचरा वर्गीकरण करून ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाकडून शून्य कचरा मोहीम राबविली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी चाळीत राहणारे नागरिक कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत देत नाही. ते कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे यापुढे कचरा उघड्यावर टाकल्यास दंड आकारण्यात येईल, अशी नोटीस मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ५० चाळींना बजावली आहे.

मनपाने मे २०२० शून्य कचरा मोहीम सुरू केली तेव्हा शहरातील कचराकुंड्या हटवल्या. ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीतच दिला पाहिजे, असा त्यामागचा उद्देश होता. तर, मोठ्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे प्रकल्प राबवण्यास सांगितले. कचऱ्यात येणारे कपडे वगळे गोळा केले. महिला बचतगटांकडून वापरण्याजोग्या कपड्यापासून कापडी पिशव्या तयार केल्या. तसेच रबर, प्लास्टिक, काचा आदी वेगळे गोळा करण्यासाठी वार ठरविले. प्लास्टिक कचरा गोळा करून तो रिसायकलिंगला दिला. तसेच ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम राबवला. दुसरीकडे आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात मनपाला यश आले.

दरम्यान, चाळीतील रहिवासी कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे मनपाने त्यांना कचरा वर्गीकरण करून तो घंटागाडीत देण्याची सक्ती केली आहे. चाळ परिसरात घंडागाडी दोन वेळा येणार आहे. कचरा उघड्यावर टाकणाऱ्यास सुरुवातीला प्रत्येकी ३०० रुपये दंड आकारला जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे. ही कारवाई करण्यासाठी कल्याण पश्चिमेतील आणि डोंबिवली पश्चिमेतील जवळपास ५० चाळींना नोटिसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे.

ग्रामीण भागात कचरा पडूनच

केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील कचरा उचलला जात नाही. तो ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पडून असतो, अशी माहिती माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शून्य कचरा मोहीम राबविली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.

‘कचऱ्याचे फोटो मनपाच्या वेबसाइटवर पाठवा’

कल्याण पूर्वेत कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे कचऱ्याचे फोटो नागरिकांनी काढून मनपाच्या वेबसाइटवर पाठवावेत, असे आवाहन तेथील भाजपचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना केले आहे. त्यामुळे शून्य कचरा मोहीम ही किती फसवी आहे, हे उघड होईल. कचरा उचलला जात नसेल, तर घनकचरा कर नागरिक का भरतील, असा सवाल मोरे यांनी केला आहे.

---------------