शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीने बजावली ५० चाळींना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाकडून शून्य कचरा मोहीम राबविली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी चाळीत राहणारे नागरिक कचरा वर्गीकरण करून ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाकडून शून्य कचरा मोहीम राबविली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी चाळीत राहणारे नागरिक कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत देत नाही. ते कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे यापुढे कचरा उघड्यावर टाकल्यास दंड आकारण्यात येईल, अशी नोटीस मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ५० चाळींना बजावली आहे.

मनपाने मे २०२० शून्य कचरा मोहीम सुरू केली तेव्हा शहरातील कचराकुंड्या हटवल्या. ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीतच दिला पाहिजे, असा त्यामागचा उद्देश होता. तर, मोठ्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे प्रकल्प राबवण्यास सांगितले. कचऱ्यात येणारे कपडे वगळे गोळा केले. महिला बचतगटांकडून वापरण्याजोग्या कपड्यापासून कापडी पिशव्या तयार केल्या. तसेच रबर, प्लास्टिक, काचा आदी वेगळे गोळा करण्यासाठी वार ठरविले. प्लास्टिक कचरा गोळा करून तो रिसायकलिंगला दिला. तसेच ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम राबवला. दुसरीकडे आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात मनपाला यश आले.

दरम्यान, चाळीतील रहिवासी कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे मनपाने त्यांना कचरा वर्गीकरण करून तो घंटागाडीत देण्याची सक्ती केली आहे. चाळ परिसरात घंडागाडी दोन वेळा येणार आहे. कचरा उघड्यावर टाकणाऱ्यास सुरुवातीला प्रत्येकी ३०० रुपये दंड आकारला जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे. ही कारवाई करण्यासाठी कल्याण पश्चिमेतील आणि डोंबिवली पश्चिमेतील जवळपास ५० चाळींना नोटिसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे.

ग्रामीण भागात कचरा पडूनच

केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील कचरा उचलला जात नाही. तो ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पडून असतो, अशी माहिती माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शून्य कचरा मोहीम राबविली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.

‘कचऱ्याचे फोटो मनपाच्या वेबसाइटवर पाठवा’

कल्याण पूर्वेत कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे कचऱ्याचे फोटो नागरिकांनी काढून मनपाच्या वेबसाइटवर पाठवावेत, असे आवाहन तेथील भाजपचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना केले आहे. त्यामुळे शून्य कचरा मोहीम ही किती फसवी आहे, हे उघड होईल. कचरा उचलला जात नसेल, तर घनकचरा कर नागरिक का भरतील, असा सवाल मोरे यांनी केला आहे.

---------------