शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

केडीएमसी आयुक्तांचा अखेर ‘यू’ टर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:42 IST

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ. ...

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले होते. परंतु, त्याविरोधात व्यापाऱ्यांनी केलेले आंदोलन पाहता आयुक्तांनी ‘यू’ टर्न घेत गुरुवारी सुधारित आदेश जारी केला. यात फेरीवाले, हातगाडीविक्रेते यांना शनिवार आणि रविवारी विक्री करण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली असताना व्यापाऱ्यांना मात्र या दोन्ही दिवशी दुकाने चालू ठेवण्यास सूट मिळाली आहे. दरम्यान, दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत दुकाने चालू ठेवण्याचा आदेश मात्र कायम ठेवण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवारीही ८९८ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा हा प्रादुर्भाव पाहता सूर्यवंशी यांनी नागरिकांची गर्दी टाळावी, या उद्देशाने अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी डोंबिवलीत ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले होते. यात व्यापाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळाल्याने आयुक्तांना त्यांचा निर्णय माघारी घ्यावा लागल्याची चर्चा सुधारित आदेशावरून सुरू झाली आहे.

आयुक्तांनी शनिवार आणि रविवारी दुकानदारांना व्यवसाय करण्यास मुभा देताना मागील काही निर्णय मात्र जैसे थे ठेवले आहे. शुक्रवारपासून मनपा क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना दररोज सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारचे फेरीवाले, हातगाडी विक्रेते यांना दर शनिवारी व रविवारी बसण्यास व विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. भाजी मंडई शनिवारी व रविवारी ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, पोळी-भाजी केंद्रे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. तथापि, या वेळेत घरपोच सुविधा सुरू राहतील, असे सुधारित आदेशात नमूद केले आहे.

आम्हालाही पोट आहे, मग दुजाभाव का!

आयुक्तांनी काढलेल्या सुधारित आदेशावर फेरीवाल्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांनी आंदोलन केल्याने तसेच त्यांना राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांना शनिवार आणि रविवारी व्यवसाय करण्यास परवानगी दिली गेली आहे. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही पोट आहे. त्यामुळे आता आम्हीदेखील रस्त्यावर उतरून न्यायासाठी आंदोलन करायचे का, असा सवाल डोंबिवली शहरातील फेरीवाल्यांचे नेते बबन कांबळे यांनी केला आहे.

------------