शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

केडीएमसी आयुक्तांचा अखेर ‘यू’ टर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:42 IST

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ. ...

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले होते. परंतु, त्याविरोधात व्यापाऱ्यांनी केलेले आंदोलन पाहता आयुक्तांनी ‘यू’ टर्न घेत गुरुवारी सुधारित आदेश जारी केला. यात फेरीवाले, हातगाडीविक्रेते यांना शनिवार आणि रविवारी विक्री करण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली असताना व्यापाऱ्यांना मात्र या दोन्ही दिवशी दुकाने चालू ठेवण्यास सूट मिळाली आहे. दरम्यान, दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत दुकाने चालू ठेवण्याचा आदेश मात्र कायम ठेवण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवारीही ८९८ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा हा प्रादुर्भाव पाहता सूर्यवंशी यांनी नागरिकांची गर्दी टाळावी, या उद्देशाने अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी डोंबिवलीत ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले होते. यात व्यापाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळाल्याने आयुक्तांना त्यांचा निर्णय माघारी घ्यावा लागल्याची चर्चा सुधारित आदेशावरून सुरू झाली आहे.

आयुक्तांनी शनिवार आणि रविवारी दुकानदारांना व्यवसाय करण्यास मुभा देताना मागील काही निर्णय मात्र जैसे थे ठेवले आहे. शुक्रवारपासून मनपा क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना दररोज सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारचे फेरीवाले, हातगाडी विक्रेते यांना दर शनिवारी व रविवारी बसण्यास व विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. भाजी मंडई शनिवारी व रविवारी ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, पोळी-भाजी केंद्रे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. तथापि, या वेळेत घरपोच सुविधा सुरू राहतील, असे सुधारित आदेशात नमूद केले आहे.

आम्हालाही पोट आहे, मग दुजाभाव का!

आयुक्तांनी काढलेल्या सुधारित आदेशावर फेरीवाल्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांनी आंदोलन केल्याने तसेच त्यांना राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांना शनिवार आणि रविवारी व्यवसाय करण्यास परवानगी दिली गेली आहे. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही पोट आहे. त्यामुळे आता आम्हीदेखील रस्त्यावर उतरून न्यायासाठी आंदोलन करायचे का, असा सवाल डोंबिवली शहरातील फेरीवाल्यांचे नेते बबन कांबळे यांनी केला आहे.

------------