शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कपिल पाटील यांच्या मतांमध्ये ४६ हजारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:16 IST

लोकसभा निवडणुकीत पाटील यांना पक्षात प्रतिस्पर्धी निर्माण झाले नसले, तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी निर्माण झाले होते.

भिवंडी : लोकसभा निवडणुकीत पाटील यांना पक्षात प्रतिस्पर्धी निर्माण झाले नसले, तरी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी निर्माण झाले होते. काही विरोधकांनी पाटील यांच्या गावाजवळील काही ठिकाणी विरोधाचे वातावरण निर्माण केले, तर काहींनी बंडाचे निशाण फडकवले. त्यामुळे शहरासह तालुका ढवळून निघाला. हे लोण संपूर्ण मतदारसंघात पसरल्याने या निवडणुकीला खरी रंगत आली होती. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी काँग्रेसमध्येही उमेदवारी मिळवण्यापासून स्पर्धा झाली. या स्पर्धकांनी दिल्ली गाठून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या पक्षातही पालिकेतील काही नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले. मागील निवडणुकीतील उमेदवार विश्वनाथ पाटील यांना काँग्रेस वरिष्ठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली. मात्र, ही वाट धरताना कुणबी समाजासाठी मागण्या करून आश्वासन पदरात पाडून घेतले. परिणामी, काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा एक लाख नऊ हजार मतांनी पराभव करून भाजपचे पाटील निवडून आले होते. आता काँग्रेस उमेदवार टावरे यांचा पराभव करून पाटील हे एक लाख ५५ हजार मतांनी निवडून आले. मागील निवडणुकीत मतदारांची संख्या १६ लाख होती. ती या निवडणुकीत १८ लाख झाली. दोन लाख नवीन मतदार निर्माण झाले. दीड लाखाने मतदान वाढले होते. या दीड लाखापैकी एक लाख १२ हजार मते पाटील यांना वाढलेली दिसून येतात. टावरे यांना ६५ हजार मते वाढली. वास्तविक, हा मतदार या निवडणुकीचा निर्णायक घटक ठरला आहे.भिवंडी हे मुस्लिमबहुल असल्याने या ठिकाणी काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम या दोन मतदारसंघांतून काँग्रेसला अपेक्षित मतदान झाले नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला भिवंडी पूर्वमध्ये ५९ हजार ३९४, तर यावेळी ७० हजार ८२५ मतदान झाले. भिवंडी पश्चिममध्ये ६१ हजार ८९५ मतदान झाले होते. यावेळी ७८ हजार ३७६ मतदान झाले. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने २७०० मते, तर वंचित बहुजन आघाडीला ५१ हजारांची मते मिळाल्याने मतांचे काही प्रमाणात विभाजन झाले.विशेष म्हणजे पाटील यांच्याविरोधात काही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुकारलेल्या बंडाचा फायदा आपल्याला होईल, या अपेक्षेमध्ये असलेल्या टावरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली.>भिवंडी लोकसभा २०१४मतदारसंघ भाजप काँग्रेसभिवंडी ग्रामीण ८५,५४२ ४२,४७३शहापूर ५३,२७० ४९,८०९भिवंडी पश्चिम ४२,३९८ ६१,८९५भिवंडी पूर्व ४०,१०३ ५९,३९४कल्याण पश्चिम ९७,०१७ ३५,६३५मुरबाड ९२,४२२ ५२,२४६>भिवंडी लोकसभा २०१९मतदारसंघ भाजप काँग्रेसभिवंडी ग्रामीण १,१५,५६१ ५३,६६९शहापूर ६७,९०७ ५३,५२०भिवंडी पश्चिम ५२,८५६ ७८,३७६भिवंडी पूर्व ४७,०१८ ७०,८२५कल्याण पश्चिम १,१७,४४० ४९,३०५मुरबाड १,२५,२५० ६०,८९६>भिवंडी लोकसभा मतदारसंघातीलमतमोजणीनंतर भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा एक लाख ५५ हजारांनी विजय झाला आणि काँगे्रसचे उमेदवार सुरेश टावरे यांचा पराभव झाला. मोदीलाट नसताना हा विजय झाला, तरी या निवडणुकीवर मोदींचा प्रभाव असल्याचे नाकारून चालणार नाही. गेल्या निवडणुकीत मोदीलाटेत पाटील हे एक लाख नऊ मतांनी निवडून आले होते. त्यामध्ये ४६ हजारांची वाढ झाली.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019