शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कल्याण, डोंबिवली, दिव्यात वीज सक्षमीकरण

By admin | Updated: July 11, 2016 02:05 IST

कल्याण-डोंबिवली आणि दिवा भागातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी या भागात १०० कोटींची कामे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली

ठाणे : कल्याण-डोंबिवली आणि दिवा भागातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी या भागात १०० कोटींची कामे करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २५ कोटी उपलब्ध करून देण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत.ग्रामीण भागांमध्ये पथदिव्यांच्या बिलांचा भार शासनाने उचलावा, असा जीआर असताना अंबरनाथ आणि कल्याणच्या ग्रामीण भागांमध्ये पथदिव्यांची जोडणी कापण्यात आल्याचे शिंदे यांनी या वेळी निदर्शनास आणले. ज्या ठिकाणी पथदिव्यांची आवश्यकता आहे, तिथे तातडीने ते उभारण्याचे आदेशही ऊर्जामंत्र्यांनी दिले. दिव्यामध्ये ४५ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांनी या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ठाण्यापुढील या संपूर्ण परिसरातील वीजसमस्या सोडवण्यासाठी ७ जुलै रोजी कल्याण येथे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना दिले. अंबरनाथ येथील पाले विद्युत उपकेंद्राकरिता एमआयडीसीकडून जीआयएस योजनेंतर्गत ६ हेक्टर जागा तातडीने हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला असून उल्हासनगर येथील लाललोई स्विचिंग स्टेशनकरिता ऊर्जा विभागाच्या नवीन धोरणानुसार आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश बावनकुळे यांनी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांना दिले. दिवा येथे स्विचिंग स्टेशनची आवश्यकता असल्याने ठाणे महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास ते बांधण्याची तयारी ऊर्जामंत्र्यांनी दाखवली. तसेच, वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन खारेगाव येथे स्वतंत्र विभाग करण्यासही त्यांनी तत्त्वत: मंजुरी देऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. दिव्यासाठी स्वतंत्र उपविभाग निर्माण करण्याच्या मागणीचाही सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)