शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मोक्कांतर्गत वॉन्टेड आरोपीला कळवा पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 22:34 IST

उल्हासनगर येथील संदीप उतेकर यांचे २०१६ मध्ये निलेश यादव याच्यासह पाच ते सहा जणांच्या टोळक्याने अपहरण करुन त्यांच्याकडून १७ लाखांची रोकड लुटली होती. याच प्रकरणात मोक्कांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या यादवला आता कळवा पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे अपहरण करुन केली होती १७ लाखांची लूट मध्यवर्ती पोलिसांच्या केले स्वाधीन सहा जणांच्या टोळीतील चौघांना याआधीच अटक

ठाणे: उल्हासनगर येथील एका रहिवाशाचे अपहरण करुन त्याच्याकडून १७ लाख रुपयांची रोकड उकळणाऱ्या टोळीचा म्होरक्या निलेश यादव (२३, रा. पौंडपाडा, कळवा, ठाणे) याला कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. तो मोक्कांतर्गत गुन्हयातही वॉन्टेड होता. त्याला आता मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.उल्हासनगर येथील संदीप उतेकर यांचे २०१६ मध्ये यादव याच्यासह पाच ते सहा जणांच्या टोळक्याने अपहरण करुन त्यांच्याकडून १७ लाखांची रोकड लुटली होती. याच प्रकरणामध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दरोडा आणि अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता. यातील चौघा आरोपींना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यापैकी यादव आणि त्याच्या साथीदार मात्र गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत होते. यादव याच्या टोळीवर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अर्थात मोक्कांतर्गतही मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली होती. तेंव्हापासून वॉन्टेड असलेला यादव हा कळव्यातील पौंडपाडा येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त एस. एस. बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बागडे यांच्यासह उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस नाईक संदीप महाडीक आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष ढेबे आदींच्या पथकाने दत्तवाडी, कळवा येथून १७ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिल्यानंतर त्याला मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती बागडे यांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस