शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कळवा-मुंब्रा हाच अडथळा

By admin | Updated: January 5, 2017 05:53 IST

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ठाणे शहरात आघाडी तर कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढती, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्रपक्ष काँग्रेसला दिला असला

अजित मांडके, ठाणेठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ठाणे शहरात आघाडी तर कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढती, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्रपक्ष काँग्रेसला दिला असला तरी या दोन्ही पक्षांची भिस्त ही कळवा-मुंब्रा या परिसरावर असल्याने हाच मुद्दा आघाडी होण्यात अडसर ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामधील स्थानिक नेत्यांना युती हवी असली तरी सत्तेपासून दूर असलेली मंडळी स्वबळाची भाषा करीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून देखील आघाडीबाबत चाचपणी सुरु झाली आहे. ठाण्यातील काँग्रेसचे संघटन कमकुवत असून एकच चेहरा मतदारांपुढे नाही. अनेक नगरसेवकांनी यापूर्वीच शिवसेना अथवा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे गटनेते राजण किणे यांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांपासून काँग्रेसला फुटीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादीची स्थिती काँग्रेसपेक्षा बरीच चांगली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या पक्षाचा चेहरा बनले आहेत. ठाण्यात त्यांचीही चांगलीच पडझड झाली आहे. कोपरी, शहरातील काही भागातील नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये यापूर्वीच प्रवेश केला आहे. उमेदवारांचा शोध दोन्ही पक्ष घेत असले तरी काँग्रेसने उमेदवारांकरिता चक्क वृत्तपत्रात जाहीरात दिली होती. सद्य राजकीय परिस्थिती आणि नगरपालिका निवडणुकींचा लागलेला निकाल पाहूनच ठाण्यात दोन्ही काँग्रेसनी आघाडीचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मात्र आघाडी केवळ ठाणे शहरापुरती मर्यादीत ठेवायची आणि कळवा, मुंंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतीचा विचार राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्त होत आहे. कळव्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. कळवा, मुंब्य्रातून ३६ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. त्यामुळेच यामध्ये अधिकाधिक जागा आपल्याकडे असाव्यात, अशी दोन्ही पक्षांची इच्छा आहे. शिष्टाईचे शरद पवार यांचे संकेतठाणे : मुंब्रा पारसिक रेतीबंदर येथे चौपाटी उभी करण्याच्या निर्णयाचे शरद पवार यांनी बुधवारी स्वागत करतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी याबाबत संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले. मुंब्रा येथे चौपाटी उभी करण्याकरिता अतिक्रमणांवर कारवाई करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध केल्याने विधान परिषदेत सभापतींनी कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी रेतीबंदरचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही, असे वक्तव्य केल्याने महापालिकेच्या महासभेत कारवाईचे समर्थन करणारा ठराव एकमताने मंजूर झाला होता. त्याला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाने राजीनामे देण्यास भाग पाडले. त्याचबरोबर आयुक्तांविरुद्ध आणि ठरावाच्या सूचक-अनुमोदकांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी चौपाटी उभी करण्याचे स्वागत करतानाच तेथे ५० वर्षांपासून राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या लोकांचे जवळच असलेल्या रिकाम्या भूखंडावर पुनर्वसन करावे. याबाबत मी स्वत: आयुक्त जयस्वाल यांच्याशी संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले.मुंब्य्रात रस्ते, पिण्याचे पाणी अशा प्रमुख समस्या आहे. आम्ही सत्तेत नसलो तरीही ठाणे पालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव बनवून दिल्लीत पाठवू. (प्रतिनिधी)