शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

कळवा-मुंब्रा हाच अडथळा

By admin | Updated: January 5, 2017 05:53 IST

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ठाणे शहरात आघाडी तर कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढती, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्रपक्ष काँग्रेसला दिला असला

अजित मांडके, ठाणेठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ठाणे शहरात आघाडी तर कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढती, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्रपक्ष काँग्रेसला दिला असला तरी या दोन्ही पक्षांची भिस्त ही कळवा-मुंब्रा या परिसरावर असल्याने हाच मुद्दा आघाडी होण्यात अडसर ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामधील स्थानिक नेत्यांना युती हवी असली तरी सत्तेपासून दूर असलेली मंडळी स्वबळाची भाषा करीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून देखील आघाडीबाबत चाचपणी सुरु झाली आहे. ठाण्यातील काँग्रेसचे संघटन कमकुवत असून एकच चेहरा मतदारांपुढे नाही. अनेक नगरसेवकांनी यापूर्वीच शिवसेना अथवा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे गटनेते राजण किणे यांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांपासून काँग्रेसला फुटीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादीची स्थिती काँग्रेसपेक्षा बरीच चांगली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या पक्षाचा चेहरा बनले आहेत. ठाण्यात त्यांचीही चांगलीच पडझड झाली आहे. कोपरी, शहरातील काही भागातील नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये यापूर्वीच प्रवेश केला आहे. उमेदवारांचा शोध दोन्ही पक्ष घेत असले तरी काँग्रेसने उमेदवारांकरिता चक्क वृत्तपत्रात जाहीरात दिली होती. सद्य राजकीय परिस्थिती आणि नगरपालिका निवडणुकींचा लागलेला निकाल पाहूनच ठाण्यात दोन्ही काँग्रेसनी आघाडीचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मात्र आघाडी केवळ ठाणे शहरापुरती मर्यादीत ठेवायची आणि कळवा, मुंंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतीचा विचार राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्त होत आहे. कळव्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. कळवा, मुंब्य्रातून ३६ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. त्यामुळेच यामध्ये अधिकाधिक जागा आपल्याकडे असाव्यात, अशी दोन्ही पक्षांची इच्छा आहे. शिष्टाईचे शरद पवार यांचे संकेतठाणे : मुंब्रा पारसिक रेतीबंदर येथे चौपाटी उभी करण्याच्या निर्णयाचे शरद पवार यांनी बुधवारी स्वागत करतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी याबाबत संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले. मुंब्रा येथे चौपाटी उभी करण्याकरिता अतिक्रमणांवर कारवाई करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध केल्याने विधान परिषदेत सभापतींनी कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी रेतीबंदरचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही, असे वक्तव्य केल्याने महापालिकेच्या महासभेत कारवाईचे समर्थन करणारा ठराव एकमताने मंजूर झाला होता. त्याला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाने राजीनामे देण्यास भाग पाडले. त्याचबरोबर आयुक्तांविरुद्ध आणि ठरावाच्या सूचक-अनुमोदकांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी चौपाटी उभी करण्याचे स्वागत करतानाच तेथे ५० वर्षांपासून राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या लोकांचे जवळच असलेल्या रिकाम्या भूखंडावर पुनर्वसन करावे. याबाबत मी स्वत: आयुक्त जयस्वाल यांच्याशी संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले.मुंब्य्रात रस्ते, पिण्याचे पाणी अशा प्रमुख समस्या आहे. आम्ही सत्तेत नसलो तरीही ठाणे पालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव बनवून दिल्लीत पाठवू. (प्रतिनिधी)