शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ५ दिवसात ‘बारवी’त क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

बदलापूर : गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात धरणाच्या ...

बदलापूर : गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात धरणाच्या एकूण क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास हे बारवी धरण लवकरच भरून जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे.

२० जुलै रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. बारवी धरण क्षेत्रातदेखील चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे २० जुलै रोजी धरणात ४८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला होता. तर २० जुलैनंतर सलग पाच दिवस मुसळधार पाऊस झाल्याने बारवी धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या एकूण क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा गेल्या पाच दिवसात निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसात पावसाने धरण क्षेत्रात अशीच दमदार हजेरी लावली, तर बारवी धरण १०० टक्के भरण्यास वेळ लागणार नसल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

२० जुलै रोजी बारवी धरणात ४८ टक्के पाणीसाठा होता. पाच दिवसानंतर म्हणजेच २४ जुलै रोजी धरणात ६८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात वीस टक्के धरण भरल्याने ठाणे जिल्ह्यासाठी ही बाब समाधानाची ठरणार आहेत. धरणाची पाण्याची क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर एवढी असून आजच्या घडीला २३० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.

----------------------