शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खड्ड्यांतून कुंभ यात्रेकरूंचा प्रवास

By admin | Updated: August 10, 2015 23:10 IST

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, महामार्गांवरील खड्डे पाहता या हजारो कोटी रुपयांचा खर्च

कसारा : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, महामार्गांवरील खड्डे पाहता या हजारो कोटी रुपयांचा खर्च कोणी, कुठे व कसा केला, याबाबत सध्या संशय व्यक्त होत आहे.कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर, सर्वतीर्थ टाकेद, कावनई या तीर्थांसह नाशिकलगतच्या महत्त्वाच्या रेल्वे महामार्गावर भाविकांची गैरसोय अथवा काही प्रसंग उद्भवू नये, यासाठी कसारा रेल्वे स्थानक, मुंबई-नाशिक महामार्ग, घोटी-सिन्नर (सर्वतीर्थ टाकेदफाटा), घोटी-कावनई, नाशिक-त्र्यंबकेश्वर या भागांतील रस्ते सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी शासनाची आहे. या संबंधित शासनाने त्यात्या कार्यक्षेत्रातील सा.बां. विभाग, नॅशनल हाय वे अ‍ॅथॉरिटी, रेल्वे प्रशासन यांना भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले होते. परिणामी, सद्य:स्थितीत कुंभमेळा सुरू होऊन महिना उलटला तरीदेखील कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही. मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर वडपा (भिवंडी) ते नाशिकपर्यंत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांबाबत गॅमन इंडिया या ठेकेदार कंपनीला अनेकदा तक्रारी केल्या, परंतु कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. नाशिक-घोटी येथून सर्वतीर्थ टाकेदकडे अथवा शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोटी, कावनई रस्त्यांवरदेखील खड्ड्यांचे साम्राज्य जैसे थे आहे. तीर्थक्षेत्री जाणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने हजारो भाविक, त्यातच बाहेरच्या राज्यांतून येणारे भाविक प्रशासनास शिव्यांची लाखोली वाहत आहेत. कसारा स्थानकाबाहेर रस्त्यावर रात्रीच्या वेळी असलेला अंधार, बस स्टॅण्ड, टॅक्सी स्टॅण्ड नसल्याने प्रवाशांची होणारी फरफट आजही कायम आहे....फक्त पोलीस प्रशासन सज्जकुंभमेळ्यात कायदा-सुव्यवस्था, भाविक सुरक्षा याकरिता पोलीस प्रशासन मात्र अ‍ॅलर्ट आहे. नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या कसारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, प्रवासी भाविक सुरक्षित राहावे, यासाठी ठाणे (ग्रा.) पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, नाशिक (ग्रा.) पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव पिंगट, प्रभारी अधिकारी अजय वसावे, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी कसारा रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था कार्यरत केली. चेक पोस्ट, संशयित प्रवासी यांची झाडाझडती सुरू केली. त्यामुळे रेल्वे प्रवासी, वाहनचालक, प्रवासी सुरक्षित आहेत.रेल्वे पोलीस (जीआरपी) प्रशासनाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कनकरत्नम, मधुकर पांडे, रेश्मा अंबुरे यांनीदेखील कसारा रेल्वे स्थानकाची पाहणी करून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आखली. मात्र, भाविकांच्या सोयीसुविधांसाठी पोलीस यंत्रणावगळता सर्वच शासकीय यंत्रणा डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प बसली आहे. जर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, हा सवाल जैसे थे आहे.(वार्ताहर)