शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नगरसेवकांची पदे रद्द करणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:48 IST

भाजप आमदार : ...मग हरकती, सूचना मागवल्या कशासाठी?

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीतील १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आयुक्तांचा निर्णय चुकीचा आहे. महापालिकेतून सर्वच्या सर्व २७ गावे वगळण्याची मागणी असताना केवळ १८ गावे वगळली आहेत. हरकती, सूचना मागविल्या असताना घाईघाईत राज्य सरकारने गावे वगळण्याचा निर्णय का घेतला? सरकारला मनमानी करून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवायची आहे का? मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याने आम्हा लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता असे निर्णय तातडीने घेतले जात आहेत, असा हल्लाबोल कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.केडीएमसीतून २७ पैकी १८ गावे वगळण्यात आल्याने या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे परिपत्रक संबंधित नगरसेवकांना पाठवले आहे. त्यामुळे गायकवाड यांनी नाराजी व्यक्तकेली आहे.जूनमध्ये २७ गावांसंदर्भात हरकती, सूचना मागवल्या होत्या. जी नऊ गावे महापालिकेत ठेवली आहेत, त्याला स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्रांचा विरोध आहे. २७ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन व्हावी, अशी सर्वांची मागणी आहे. त्यामुळे याबाबत अनेकांनी हरकती, सूचना नोंदविल्या आहेत. स्थानिक आमदार म्हणून मी देखील हरकत आणि सूचना मांडली आहे. परंतु, त्यावर कोणतीही सुनावणी न होताच ही गावे वगळण्याची कृती राज्य सरकारने केली आहे. जर गावे वगळायचीच होती तर हरकती, सूचना का मागविल्या, असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.नऊ गावे महापालिकेत ठेवण्यासंदर्भात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. राज्य सरकाने एकप्रकारे मनमानी चालविली असून यात भूमिपुत्रांवर मोठा अन्याय होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.महापालिकेच्या हद्दीतील जी १८ गावे वगळली, त्या गावांमधील नगरसेवकांचे पद रद्द केले आहे. कायद्यातील तरतुदीप्रमाणे नगरसेवकपदासाठी नाव मतदारयादीत असले पाहिजे. परंतु, कार्यक्षेत्रातून ती गावे बाहेर गेल्याने संबंधित नगरसेवक प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे पद रद्द केले आहे. सध्या तरी १८ गावांमध्ये महापालिका सेवा देत आहे. ज्यावेळेला त्या गावांमध्ये नगर परिषद स्थापन होईल, तेव्हा राज्य सरकार ज्या सूचना करेल, त्याप्रमाणे कार्यवाही होईल.- डॉ. विजय सूर्यवंशी,आयुक्त, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका