शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पाणी साचणाऱ्या ठिकाणांसह धरणाखालील गावांसह डोंगरमाथ्यांवर न गेलेलेच बरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अतिवृष्टीचा कहर पाहता जीवित व वित्तहानी वाढताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : अतिवृष्टीचा कहर पाहता जीवित व वित्तहानी वाढताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने जिल्ह्यातील शहरांसह निवासी भागात तब्बल ६७ ठिकाणी पाणी साचले. यामुळे पाच हजार ५०० कुटुंबांचे १८ ठिकाणी सुरक्षित स्थलांतर केले. कळवा, मुंब्य्राजवळीत झोपडपट्टीच्या ठिकाणांहून शहापूरच्या कसारा येथील डोंगरमाथ्यावरील गावपाडे आदी ठिकठिकाणी होणाऱ्या भूस्खलनामुळे जीवित व वित्तहानी होत आहे. शहरातील गटारे, नदी-नाल्यांच्या पुरात वाहून गेल्याने, घरात पाणी शिरून हानी होत आहे. अशा धोक्याच्या ठिकाणांची खबरदारी घेत त्या ठिकाणी न गेलेलेच बरे असे जाणकारांकडून ऐकायला मिळत आहे.

जिल्ह्यासह कोकणातील काही गावांवर डोंगरमाथ्यावरील भूस्खलन होऊन गावपाडे दिसेनासे झाली. माणसे गाडली गेली. शहरातील ठिकठिकाणची गटारे, नाल्यांच्या प्रवाहात माणसे वाहून गेली. पर्यटनाच्या ठिकाणी जीवघेणे अपघात वाढले. धरणांखालील नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे गावांना धोका संभवण्याच्या दृष्टीने सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. घाटमाथ्यासह डोंगरावरील दरडी कोसळून जिल्ह्यातील अपघात आता नकोसे झाले आहेत. या संकटांना वेळीच आवर घालण्यासाठी अतिवृष्टीदरम्यान धोक्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे आवश्यक झाले आहे. यामुळे जिवावर बेतणार नाही आणि संकट टाळण्यास मदतच होणार आहे.

‌ नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर तालुक्यातील शहरांमध्ये व निवासी भागात आणि झोपडपट्ट्यांमध्ये नदी-नाल्याचे व पावसाचे पाणी शिरले होते. जिल्ह्यातील या निवासी भागांसह सखल भागांच्या ६७ ठिकाणी दिवस-रात्र एनडीआरएफ तुकड्यांनी जीव वाचविले आहेत. यामध्ये भिवंडीत, कल्याण, दिवा, टिटवाळा अंबरनाथला, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आदी ठिकाणी बोटींच्या साहाय्याने रहिवाशांना सुखरूप स्थळी हलविले. रात्रभर १०० एसटी बस तैनात करून उंबरमाळी, वासिंद, खडवली परिसरातील अडकलेल्या चार हजारांहून रेल्वे प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यात आले आहे.