शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पाणी साचणाऱ्या ठिकाणांसह धरणाखालील गावांसह डोंगरमाथ्यांवर न गेलेलेच बरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अतिवृष्टीचा कहर पाहता जीवित व वित्तहानी वाढताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : अतिवृष्टीचा कहर पाहता जीवित व वित्तहानी वाढताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने जिल्ह्यातील शहरांसह निवासी भागात तब्बल ६७ ठिकाणी पाणी साचले. यामुळे पाच हजार ५०० कुटुंबांचे १८ ठिकाणी सुरक्षित स्थलांतर केले. कळवा, मुंब्य्राजवळीत झोपडपट्टीच्या ठिकाणांहून शहापूरच्या कसारा येथील डोंगरमाथ्यावरील गावपाडे आदी ठिकठिकाणी होणाऱ्या भूस्खलनामुळे जीवित व वित्तहानी होत आहे. शहरातील गटारे, नदी-नाल्यांच्या पुरात वाहून गेल्याने, घरात पाणी शिरून हानी होत आहे. अशा धोक्याच्या ठिकाणांची खबरदारी घेत त्या ठिकाणी न गेलेलेच बरे असे जाणकारांकडून ऐकायला मिळत आहे.

जिल्ह्यासह कोकणातील काही गावांवर डोंगरमाथ्यावरील भूस्खलन होऊन गावपाडे दिसेनासे झाली. माणसे गाडली गेली. शहरातील ठिकठिकाणची गटारे, नाल्यांच्या प्रवाहात माणसे वाहून गेली. पर्यटनाच्या ठिकाणी जीवघेणे अपघात वाढले. धरणांखालील नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे गावांना धोका संभवण्याच्या दृष्टीने सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. घाटमाथ्यासह डोंगरावरील दरडी कोसळून जिल्ह्यातील अपघात आता नकोसे झाले आहेत. या संकटांना वेळीच आवर घालण्यासाठी अतिवृष्टीदरम्यान धोक्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे आवश्यक झाले आहे. यामुळे जिवावर बेतणार नाही आणि संकट टाळण्यास मदतच होणार आहे.

‌ नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर तालुक्यातील शहरांमध्ये व निवासी भागात आणि झोपडपट्ट्यांमध्ये नदी-नाल्याचे व पावसाचे पाणी शिरले होते. जिल्ह्यातील या निवासी भागांसह सखल भागांच्या ६७ ठिकाणी दिवस-रात्र एनडीआरएफ तुकड्यांनी जीव वाचविले आहेत. यामध्ये भिवंडीत, कल्याण, दिवा, टिटवाळा अंबरनाथला, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आदी ठिकाणी बोटींच्या साहाय्याने रहिवाशांना सुखरूप स्थळी हलविले. रात्रभर १०० एसटी बस तैनात करून उंबरमाळी, वासिंद, खडवली परिसरातील अडकलेल्या चार हजारांहून रेल्वे प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यात आले आहे.