शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतीसाठी सव्वा कोटी रुपयांच्या सिंचन विहिरी मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खरीप पिकाच्या उत्पादनासह रब्बीचे पीकदेखील घेणे शक्य व्हावे, यासाठी दुबार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खरीप पिकाच्या उत्पादनासह रब्बीचे पीकदेखील घेणे शक्य व्हावे, यासाठी दुबार पीक उत्पादनावर भर दिला जात आहे. त्यानुसार सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे (एमआरईजीएस) शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर केल्या जात आहेत. ठाणे जिल्ह्यात यंदा ४७ विहिरी हाती घेण्यात आल्या. त्यापैकी एक कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या ४३ विहिरींना मंजुरी देऊन कामे केली जात आहेत.

विहिरीचे पाणी बारमाही मिळावे, विहिरी कधीही कोरड्या पडू नयेत, यासाठी बळीराजा कडकडीत उन्हात विहिरी खोदतो. या कालावधीत विहिरीला लागलेले पाणी कितीही कडक उन्हाळा पडला तरी आटण्याची शक्यता नसते. त्यामुळे या कडकडीत उन्हाळ्यात म्हणजे चैत्र, वैशाखाच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांकडून विहिरीची कामे हाती घेतली जातात. त्यांच्या या कामास एमजी नरेगा म्हणजे एमआरईजीएसद्वारे शासनाकडून अर्थसाहाय्य करण्यात येत आहे. एका विहिरीसाठी तीन लाख रुपये खर्चाची तरतूद आहे.

या वर्षी जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी अवघ्या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीच्या कामासाठी ४७ प्रस्ताव दिले आहेत. यामध्ये भिवंडीच्या दोन शेतकऱ्यांसह शहापूर तालुक्यातील ४५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या तीन तालुक्यांतील एकाही शेतकऱ्याने सिंचन विहिरींच्या कामासाठी प्रस्ताव दिला नसल्याचे एमजी नरेगा कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कल्याण आणि अंबरनाथ या दोन तालुक्यांत आता शेती कमीकमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मुरबाड तालुक्यातूनही या सिंचन विहिरीच्या कामांसाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव प्राप्त झालेले नसल्याचे आढळून आले आहे.

कल्याण, अंबरनाथच्या शेतकऱ्यांसाठी २०१६ मध्ये तब्बल १० ते १२ विहिरींना मान्यता आहे. त्यासाठी समृद्ध महाराष्ट्र योजनेचा निधी पडून आहे. त्यांनी सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव करणे अपेक्षित असतानाही शेतकऱ्यांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. मुरबाड तालुक्यातूनही शेतकऱ्यांनी या सिंचन विहिरींच्या कामासाठी प्रस्ताव दिले नाहीत. या तीन तालुक्यांव्यतिरिक्त शहापूर तालुक्यातून ४५ प्रस्ताव आले असता त्यातील ४१ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. उर्वरित चार प्रस्तावांनाही लवकरच मान्यता मिळणार आहे. भिवंडी तालुक्यातून दोन प्रस्ताव शेतकऱ्यांनी दिले असता त्यास तत्काळ मंजुरी देण्यात आली.