शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतीसाठी सव्वा कोटी रुपयांच्या सिंचन विहिरी मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खरीप पिकाच्या उत्पादनासह रब्बीचे पीकदेखील घेणे शक्य व्हावे, यासाठी दुबार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खरीप पिकाच्या उत्पादनासह रब्बीचे पीकदेखील घेणे शक्य व्हावे, यासाठी दुबार पीक उत्पादनावर भर दिला जात आहे. त्यानुसार सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे (एमआरईजीएस) शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर केल्या जात आहेत. ठाणे जिल्ह्यात यंदा ४७ विहिरी हाती घेण्यात आल्या. त्यापैकी एक कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या ४३ विहिरींना मंजुरी देऊन कामे केली जात आहेत.

विहिरीचे पाणी बारमाही मिळावे, विहिरी कधीही कोरड्या पडू नयेत, यासाठी बळीराजा कडकडीत उन्हात विहिरी खोदतो. या कालावधीत विहिरीला लागलेले पाणी कितीही कडक उन्हाळा पडला तरी आटण्याची शक्यता नसते. त्यामुळे या कडकडीत उन्हाळ्यात म्हणजे चैत्र, वैशाखाच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांकडून विहिरीची कामे हाती घेतली जातात. त्यांच्या या कामास एमजी नरेगा म्हणजे एमआरईजीएसद्वारे शासनाकडून अर्थसाहाय्य करण्यात येत आहे. एका विहिरीसाठी तीन लाख रुपये खर्चाची तरतूद आहे.

या वर्षी जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी अवघ्या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीच्या कामासाठी ४७ प्रस्ताव दिले आहेत. यामध्ये भिवंडीच्या दोन शेतकऱ्यांसह शहापूर तालुक्यातील ४५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या तीन तालुक्यांतील एकाही शेतकऱ्याने सिंचन विहिरींच्या कामासाठी प्रस्ताव दिला नसल्याचे एमजी नरेगा कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कल्याण आणि अंबरनाथ या दोन तालुक्यांत आता शेती कमीकमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मुरबाड तालुक्यातूनही या सिंचन विहिरीच्या कामांसाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव प्राप्त झालेले नसल्याचे आढळून आले आहे.

कल्याण, अंबरनाथच्या शेतकऱ्यांसाठी २०१६ मध्ये तब्बल १० ते १२ विहिरींना मान्यता आहे. त्यासाठी समृद्ध महाराष्ट्र योजनेचा निधी पडून आहे. त्यांनी सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव करणे अपेक्षित असतानाही शेतकऱ्यांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. मुरबाड तालुक्यातूनही शेतकऱ्यांनी या सिंचन विहिरींच्या कामासाठी प्रस्ताव दिले नाहीत. या तीन तालुक्यांव्यतिरिक्त शहापूर तालुक्यातून ४५ प्रस्ताव आले असता त्यातील ४१ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. उर्वरित चार प्रस्तावांनाही लवकरच मान्यता मिळणार आहे. भिवंडी तालुक्यातून दोन प्रस्ताव शेतकऱ्यांनी दिले असता त्यास तत्काळ मंजुरी देण्यात आली.