शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

बोअरवेलचे पाणी आजाराला निमंत्रण

By admin | Updated: February 15, 2016 02:59 IST

शहरवासीयांची पाणीटंचाईवेळी तहान भागविणाऱ्या बोअरवेल व हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नसून ते आजाराला निमंत्रण देणारे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे

सदानंद नाईक, उल्हासनगरशहरवासीयांची पाणीटंचाईवेळी तहान भागविणाऱ्या बोअरवेल व हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नसून ते आजाराला निमंत्रण देणारे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पालिका प्रत्येक हातपंप व बोअरवेलवर तसे सूचनाफलक लावणार असून भांडी व कपडे धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग करण्याचे आवाहन पाणीपुरवठा सभापती ज्योती गायकवाड यांनी केले आहे.उल्हासनगर महापालिकेकडे स्वत:ची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीच्या लहरीपणाचा फटका पाणीपुरवठ्याला बसून शहरातील विविध विभागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पालिका पाणीपुरवठा विभागाच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये ४५० हातपंप व बोअरवेल यापैकी १२५ बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच उपलब्ध असलेल्या विहिरींची दुरुस्ती व डागडुजी अद्यापही केली नसल्याची माहिती त्यांनी दिली.शहरातील भूगर्भ पाणीसाठ्याचे सर्वेक्षण करण्यात आले नसून हातपंप व बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली. ३० टक्के पाणीकपातीचा फटका शहराला बसून पाणीटंचाई भागातील नागरिक नाइलाजाने हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. हे पाणी पिण्यास वापरल्यास गंभीर आजाराला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा डॉक्टर संघटनेने दिला आहे. पालिकेने अद्यापही त्या ठिकाणी ‘पिण्याअयोग्य पाणी’ असे सूचनाफलक लावले नसल्याचा आरोप सभापती यांनी केला आहे.जीन्स कारखाने परिसरात डेड वॉटर कॅम्प नं-५ गायकवाडपाडा, कैलास कॉलनी, जयजनता कॉलनी, स्वामी शांतिप्रकाश आश्रम परिसरांत हजारो जीन्स वॉश कारखाने आहेत. परिसरातील बोअरवेल व हातपंपांना काळसर पाणी येत आहे. हे डेड पाणी असल्याचा आरोप तज्ज्ञ करीत आहेत. असे पाणी पिण्यासह वापरण्यास पालिकेने बंदी आणून नवीन बोअरवेल खोदण्यास निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.लघुपाटबंधारे विभागाला साकडेमहापालिकेकडे एमआयडीसीव्यतिरिक्त दुसरा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने ३० टक्कयांपेक्षा जास्त पाणीकपात करू नये, असे साकडे पाणीपुरवठा विभागाच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. सोनावणे यांच्याकडे घातले आहे. तसे निवेदनही दिले आहे. उल्हास नदीची पाणीपातळी कमी झाल्यास उल्हासनगरसह कल्याण, ठाणे, भिवंडी, भार्इंदर व ग्रामीण परिसरांत पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले आहे. टँकरचा घोळ कायम शहरातील टंचाईग्रस्त भागांत पालिका टँकरमार्फत पाणीपुरवठा करते. टँकर ठेकेदाराची मुदत संपून दोन वर्षे लोटले तरी पालिका नवीन निविदा काढत नसल्याचा आरोप सभापतींनी केला आहे. नवीन ठेकेदार नेमल्यास टँकर ठेकेदाराची मक्तेदारी संपुष्टात येऊन झोपडपट्टी भागाला नियमित पाणीपुरवठा होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.