शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

बोअरवेलचे पाणी आजाराला निमंत्रण

By admin | Updated: February 15, 2016 02:59 IST

शहरवासीयांची पाणीटंचाईवेळी तहान भागविणाऱ्या बोअरवेल व हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नसून ते आजाराला निमंत्रण देणारे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे

सदानंद नाईक, उल्हासनगरशहरवासीयांची पाणीटंचाईवेळी तहान भागविणाऱ्या बोअरवेल व हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नसून ते आजाराला निमंत्रण देणारे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पालिका प्रत्येक हातपंप व बोअरवेलवर तसे सूचनाफलक लावणार असून भांडी व कपडे धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग करण्याचे आवाहन पाणीपुरवठा सभापती ज्योती गायकवाड यांनी केले आहे.उल्हासनगर महापालिकेकडे स्वत:ची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीच्या लहरीपणाचा फटका पाणीपुरवठ्याला बसून शहरातील विविध विभागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पालिका पाणीपुरवठा विभागाच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये ४५० हातपंप व बोअरवेल यापैकी १२५ बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच उपलब्ध असलेल्या विहिरींची दुरुस्ती व डागडुजी अद्यापही केली नसल्याची माहिती त्यांनी दिली.शहरातील भूगर्भ पाणीसाठ्याचे सर्वेक्षण करण्यात आले नसून हातपंप व बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली. ३० टक्के पाणीकपातीचा फटका शहराला बसून पाणीटंचाई भागातील नागरिक नाइलाजाने हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. हे पाणी पिण्यास वापरल्यास गंभीर आजाराला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा डॉक्टर संघटनेने दिला आहे. पालिकेने अद्यापही त्या ठिकाणी ‘पिण्याअयोग्य पाणी’ असे सूचनाफलक लावले नसल्याचा आरोप सभापती यांनी केला आहे.जीन्स कारखाने परिसरात डेड वॉटर कॅम्प नं-५ गायकवाडपाडा, कैलास कॉलनी, जयजनता कॉलनी, स्वामी शांतिप्रकाश आश्रम परिसरांत हजारो जीन्स वॉश कारखाने आहेत. परिसरातील बोअरवेल व हातपंपांना काळसर पाणी येत आहे. हे डेड पाणी असल्याचा आरोप तज्ज्ञ करीत आहेत. असे पाणी पिण्यासह वापरण्यास पालिकेने बंदी आणून नवीन बोअरवेल खोदण्यास निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.लघुपाटबंधारे विभागाला साकडेमहापालिकेकडे एमआयडीसीव्यतिरिक्त दुसरा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने ३० टक्कयांपेक्षा जास्त पाणीकपात करू नये, असे साकडे पाणीपुरवठा विभागाच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. सोनावणे यांच्याकडे घातले आहे. तसे निवेदनही दिले आहे. उल्हास नदीची पाणीपातळी कमी झाल्यास उल्हासनगरसह कल्याण, ठाणे, भिवंडी, भार्इंदर व ग्रामीण परिसरांत पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले आहे. टँकरचा घोळ कायम शहरातील टंचाईग्रस्त भागांत पालिका टँकरमार्फत पाणीपुरवठा करते. टँकर ठेकेदाराची मुदत संपून दोन वर्षे लोटले तरी पालिका नवीन निविदा काढत नसल्याचा आरोप सभापतींनी केला आहे. नवीन ठेकेदार नेमल्यास टँकर ठेकेदाराची मक्तेदारी संपुष्टात येऊन झोपडपट्टी भागाला नियमित पाणीपुरवठा होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.