शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

बोअरवेलचे पाणी आजाराला निमंत्रण

By admin | Updated: February 15, 2016 02:59 IST

शहरवासीयांची पाणीटंचाईवेळी तहान भागविणाऱ्या बोअरवेल व हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नसून ते आजाराला निमंत्रण देणारे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे

सदानंद नाईक, उल्हासनगरशहरवासीयांची पाणीटंचाईवेळी तहान भागविणाऱ्या बोअरवेल व हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नसून ते आजाराला निमंत्रण देणारे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पालिका प्रत्येक हातपंप व बोअरवेलवर तसे सूचनाफलक लावणार असून भांडी व कपडे धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग करण्याचे आवाहन पाणीपुरवठा सभापती ज्योती गायकवाड यांनी केले आहे.उल्हासनगर महापालिकेकडे स्वत:ची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीच्या लहरीपणाचा फटका पाणीपुरवठ्याला बसून शहरातील विविध विभागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पालिका पाणीपुरवठा विभागाच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये ४५० हातपंप व बोअरवेल यापैकी १२५ बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच उपलब्ध असलेल्या विहिरींची दुरुस्ती व डागडुजी अद्यापही केली नसल्याची माहिती त्यांनी दिली.शहरातील भूगर्भ पाणीसाठ्याचे सर्वेक्षण करण्यात आले नसून हातपंप व बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली. ३० टक्के पाणीकपातीचा फटका शहराला बसून पाणीटंचाई भागातील नागरिक नाइलाजाने हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. हे पाणी पिण्यास वापरल्यास गंभीर आजाराला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा डॉक्टर संघटनेने दिला आहे. पालिकेने अद्यापही त्या ठिकाणी ‘पिण्याअयोग्य पाणी’ असे सूचनाफलक लावले नसल्याचा आरोप सभापती यांनी केला आहे.जीन्स कारखाने परिसरात डेड वॉटर कॅम्प नं-५ गायकवाडपाडा, कैलास कॉलनी, जयजनता कॉलनी, स्वामी शांतिप्रकाश आश्रम परिसरांत हजारो जीन्स वॉश कारखाने आहेत. परिसरातील बोअरवेल व हातपंपांना काळसर पाणी येत आहे. हे डेड पाणी असल्याचा आरोप तज्ज्ञ करीत आहेत. असे पाणी पिण्यासह वापरण्यास पालिकेने बंदी आणून नवीन बोअरवेल खोदण्यास निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.लघुपाटबंधारे विभागाला साकडेमहापालिकेकडे एमआयडीसीव्यतिरिक्त दुसरा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने ३० टक्कयांपेक्षा जास्त पाणीकपात करू नये, असे साकडे पाणीपुरवठा विभागाच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. सोनावणे यांच्याकडे घातले आहे. तसे निवेदनही दिले आहे. उल्हास नदीची पाणीपातळी कमी झाल्यास उल्हासनगरसह कल्याण, ठाणे, भिवंडी, भार्इंदर व ग्रामीण परिसरांत पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले आहे. टँकरचा घोळ कायम शहरातील टंचाईग्रस्त भागांत पालिका टँकरमार्फत पाणीपुरवठा करते. टँकर ठेकेदाराची मुदत संपून दोन वर्षे लोटले तरी पालिका नवीन निविदा काढत नसल्याचा आरोप सभापतींनी केला आहे. नवीन ठेकेदार नेमल्यास टँकर ठेकेदाराची मक्तेदारी संपुष्टात येऊन झोपडपट्टी भागाला नियमित पाणीपुरवठा होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.