शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

उपायुक्तांमार्फत होणार चौकशी

By admin | Updated: September 9, 2016 03:03 IST

कल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाची पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे

जितेंद्र कालेकर, ठाणेकल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाची पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. तसेच याबाबतचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असून यातील आरोपींची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणातील राजकीय दबावाचाही त्यांनी इन्कार केला.गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे आणि कल्याण या भागांत पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्याला बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्या पार्श्वभूमीवर सिंग यांच्याशी बातचीत केली, त्यावेळी त्यांनी वरील शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. वाढत्या हल्ल्यांसंदर्भात पोलीस आता आपली काय भूमिका घेणार आहेत, असे विचारले असता ते म्हणाले की, पोलिसांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. हल्ले करणारी व्यक्ती कोणीही असो, तिच्यावर कडक कारवाई केली जाईल. यापुढे असे हल्ले झाले तर भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ अन्वये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी राज्य शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हल्लेखोरांना जास्तीतजास्त शिक्षा होणार आहे, परिणामी त्यांच्यावर जरब बसेल, असा दावाही त्यांनी केला.कल्याण प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याचाही त्यांनी इन्कार केला. असा दबाव आला असता तर कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न करणे) या कलमाखाली गुन्हा दाखल झाला नसता आणि आरोपींना थेट १५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली नसती. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. उलटपक्षी या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली असून थेट पोलीस उपायुक्तांमार्फतच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले. जनमानसातील पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी पोलिसांमध्ये नेहमीच वेगवेगळे उपक्रम, रिफ्रेशमेंट कोर्स, पोलीस रायझिंग डे निमित्त विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेतले जातात. याशिवाय, पोलिसांच्या कार्यप्रणालीची ओळख करून दिली जाते. तसेच गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढवणे, फिर्यादीला सौजन्याची वागणूक द्यावी, यासाठीही प्रत्येक गुन्हे आढावा बैठकीत सूचना करण्यात येत असतात. ही प्रक्रिया हल्ले झाल्यानंतर नाही तर यापूर्वीपासूनच सुरू असल्याचेही ते म्हणाले. हल्ल्यांमागे नागरिकांमधील पोलिसांवरचा रोष, लाचखोरी किंवा फिर्यादीला पोलीस ठाण्यात सौजन्याची वागणूक न मिळणे अशीही काही कारणे असल्याकडे सिंग यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्याचा साफ इन्कार केला. ठाण्यात नितीन कंपनीजवळ एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याने वाहतुकीचे नियम तोडले होते. त्यामुळे तिने कारवाईसाठी त्याला थांबण्याचा इशारा केल्यानंतर त्याने तिला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. यात लाचखोरी किंवा फिर्यादीला सौजन्यपूर्ण वागणूक न देण्याचा कुठेही प्रश्नच येत नाही. जेथे पोलिसांवर हल्ले झाले, तिथे ते वैयक्तिक कारणातून झाले आहेत. नागरिकांमधील वाढते नैराश्य किंवा इतर कोणती कारणे यामागे आहेत, याचा मात्र बारकाईने अभ्यास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.असा रोष असता तर पोलिसांच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोर्चे काढले नसते. मुंब्रा, कल्याण आणि ठाण्यातही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोर्चे काढले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.