शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

अनलॉकनंतर भाजीपाल्याला महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

ठाणे : अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर सर्वच ठिकाणी वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पालेभाजीमध्ये मेथी, कांदापातीचे दर वाढले असून फळभाजीमध्ये ...

ठाणे : अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर सर्वच ठिकाणी वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पालेभाजीमध्ये मेथी, कांदापातीचे दर वाढले असून फळभाजीमध्ये गवार, पडवळ, मटार शिराळेने शतक ओलांडले असल्याचे बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. तसेच, कांदादेखील किलोमागे पाच रुपयांनी महागला आहे.

पालेभाजीचे नाव आधीचे दर। आताचे दर

कोथिंबीर : २५ रु.. जुडी। ४० रु. जुडी

मेथी : ५० रु. जुडी ५०रु. जुडी

शेपू : ५० ते ६० रु. जुडी। २० रु. जुडी

चवळी : १५ ते २० रु. जुडी। ३० रु. जुडी

कांदापात : २० रु. जुडी। ३० रु. जुडी

लालमाठ। २० रु. जुडी। २५ ते ३० रु. जुडी

चवळी। १५ ते २० रु. जुडी १५ ते २० रु. जुडी

पालक १५ ते २० रु. जुडी। २० ते २५ रु. जुडी

------------------------------------------

फळभाजीचे नाव आधीचे दर। आताचे दर

वांगी ८० रु. किलो । १०० रु. किलो

भेंडी। १०० रु. किलो। १०० रु. किलो

फ्लॉवर ८० रु. किलो। ८० रु. किलो

कोबी। ८० रु. किलो। ८० रु. किलो

फरसबी। १०० रु. किलो। १६० रु. किलो

शिराळे। १०० रु. किलो। १४० रु. किलो

मटार। १०० रु. किलो। १४० रु. किलो

पडवळ। ८० रु. किलो। १४० रु. किलो

टमाटा। ४० रु. किलो। ४० रु. किलो

लालभोपळा। ६० ते ७० रु. किलो। ६० ते ७० रु. किलो

गवार। ८० रु. किलो। १४० रु. किलो

------------------------------------------

कांदा पाच रुपयांनी महागला आहे. कांदा सध्या होलसेलमध्ये २२ ते २४ रु. किलो, तर किरकोळमध्ये ३० ते ३५ रु. किलोने विकले जात आहेत. आधी कांदा होलसेलमध्ये १७ ते २० रु. किलो आणि किरकोळमध्ये २५ ते ३० रु. किलोने मिळत होते.

------–-----------------------------

पावसाळा सुरू झाला की, कांद्याची आवक कमी होते. सध्या पण तीच परिस्थिती आहे. बाजारात कांदा कमी प्रमाणात येत असल्याने आवक मंदावली आहे आणि दर वाढत आहेत. कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कांद्याची आवक कमी केली आहे. कांद्याचे दर आणखी वाढण्याच्या अपेक्षेत ते आहेत.

- संदीप चौधरी, कांद्याचे होलसेल, किरकोळ व्यापारी

--------------------------------------------

पावसामुळे भाज्या महाग होतात. साध्य मेथी आणि कांदापात जास्त महाग आहे.

- संभाजी खेडेकर, पालेभाज्यांचे विक्रेते

------------------------------------

वळव्याच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. म्हणून त्यांचे दर वाढले आहेत. सध्या ग्राहकांचा पालेभाजी, फ्लॉवर, कोबी या भाज्यांवर भर आहे. महाग झालेल्या भाज्यांना अत्यल्प मागणी आहे.

- सीमा शेलार, फळभाज्या विक्रेत्या

--------------------------------------

भाज्या महाग झाल्याने सध्या कडधान्याच खाल्ले जात आहेत. भाज्यांच्या तुलनेत कडधान्य स्वस्त आहेत.

- सुभद्रा गायकवाड, गृहिणी

सध्या भाज्या महाग आहेत त्यामुळे महागड्या भाज्यांना सध्या बाजूला सारत आम्ही वरणावर जास्त भर देत आहोत.

- शुभांगी मोरे, गृहिणी