शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

अनलॉकनंतर भाजीपाल्याला महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

ठाणे : अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर सर्वच ठिकाणी वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पालेभाजीमध्ये मेथी, कांदापातीचे दर वाढले असून फळभाजीमध्ये ...

ठाणे : अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर सर्वच ठिकाणी वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पालेभाजीमध्ये मेथी, कांदापातीचे दर वाढले असून फळभाजीमध्ये गवार, पडवळ, मटार शिराळेने शतक ओलांडले असल्याचे बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. तसेच, कांदादेखील किलोमागे पाच रुपयांनी महागला आहे.

पालेभाजीचे नाव आधीचे दर। आताचे दर

कोथिंबीर : २५ रु.. जुडी। ४० रु. जुडी

मेथी : ५० रु. जुडी ५०रु. जुडी

शेपू : ५० ते ६० रु. जुडी। २० रु. जुडी

चवळी : १५ ते २० रु. जुडी। ३० रु. जुडी

कांदापात : २० रु. जुडी। ३० रु. जुडी

लालमाठ। २० रु. जुडी। २५ ते ३० रु. जुडी

चवळी। १५ ते २० रु. जुडी १५ ते २० रु. जुडी

पालक १५ ते २० रु. जुडी। २० ते २५ रु. जुडी

------------------------------------------

फळभाजीचे नाव आधीचे दर। आताचे दर

वांगी ८० रु. किलो । १०० रु. किलो

भेंडी। १०० रु. किलो। १०० रु. किलो

फ्लॉवर ८० रु. किलो। ८० रु. किलो

कोबी। ८० रु. किलो। ८० रु. किलो

फरसबी। १०० रु. किलो। १६० रु. किलो

शिराळे। १०० रु. किलो। १४० रु. किलो

मटार। १०० रु. किलो। १४० रु. किलो

पडवळ। ८० रु. किलो। १४० रु. किलो

टमाटा। ४० रु. किलो। ४० रु. किलो

लालभोपळा। ६० ते ७० रु. किलो। ६० ते ७० रु. किलो

गवार। ८० रु. किलो। १४० रु. किलो

------------------------------------------

कांदा पाच रुपयांनी महागला आहे. कांदा सध्या होलसेलमध्ये २२ ते २४ रु. किलो, तर किरकोळमध्ये ३० ते ३५ रु. किलोने विकले जात आहेत. आधी कांदा होलसेलमध्ये १७ ते २० रु. किलो आणि किरकोळमध्ये २५ ते ३० रु. किलोने मिळत होते.

------–-----------------------------

पावसाळा सुरू झाला की, कांद्याची आवक कमी होते. सध्या पण तीच परिस्थिती आहे. बाजारात कांदा कमी प्रमाणात येत असल्याने आवक मंदावली आहे आणि दर वाढत आहेत. कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कांद्याची आवक कमी केली आहे. कांद्याचे दर आणखी वाढण्याच्या अपेक्षेत ते आहेत.

- संदीप चौधरी, कांद्याचे होलसेल, किरकोळ व्यापारी

--------------------------------------------

पावसामुळे भाज्या महाग होतात. साध्य मेथी आणि कांदापात जास्त महाग आहे.

- संभाजी खेडेकर, पालेभाज्यांचे विक्रेते

------------------------------------

वळव्याच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. म्हणून त्यांचे दर वाढले आहेत. सध्या ग्राहकांचा पालेभाजी, फ्लॉवर, कोबी या भाज्यांवर भर आहे. महाग झालेल्या भाज्यांना अत्यल्प मागणी आहे.

- सीमा शेलार, फळभाज्या विक्रेत्या

--------------------------------------

भाज्या महाग झाल्याने सध्या कडधान्याच खाल्ले जात आहेत. भाज्यांच्या तुलनेत कडधान्य स्वस्त आहेत.

- सुभद्रा गायकवाड, गृहिणी

सध्या भाज्या महाग आहेत त्यामुळे महागड्या भाज्यांना सध्या बाजूला सारत आम्ही वरणावर जास्त भर देत आहोत.

- शुभांगी मोरे, गृहिणी