शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर भाजीपाल्याला महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

ठाणे : अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर सर्वच ठिकाणी वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पालेभाजीमध्ये मेथी, कांदापातीचे दर वाढले असून फळभाजीमध्ये ...

ठाणे : अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर सर्वच ठिकाणी वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पालेभाजीमध्ये मेथी, कांदापातीचे दर वाढले असून फळभाजीमध्ये गवार, पडवळ, मटार शिराळेने शतक ओलांडले असल्याचे बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. तसेच, कांदादेखील किलोमागे पाच रुपयांनी महागला आहे.

पालेभाजीचे नाव आधीचे दर। आताचे दर

कोथिंबीर : २५ रु.. जुडी। ४० रु. जुडी

मेथी : ५० रु. जुडी ५०रु. जुडी

शेपू : ५० ते ६० रु. जुडी। २० रु. जुडी

चवळी : १५ ते २० रु. जुडी। ३० रु. जुडी

कांदापात : २० रु. जुडी। ३० रु. जुडी

लालमाठ। २० रु. जुडी। २५ ते ३० रु. जुडी

चवळी। १५ ते २० रु. जुडी १५ ते २० रु. जुडी

पालक १५ ते २० रु. जुडी। २० ते २५ रु. जुडी

------------------------------------------

फळभाजीचे नाव आधीचे दर। आताचे दर

वांगी ८० रु. किलो । १०० रु. किलो

भेंडी। १०० रु. किलो। १०० रु. किलो

फ्लॉवर ८० रु. किलो। ८० रु. किलो

कोबी। ८० रु. किलो। ८० रु. किलो

फरसबी। १०० रु. किलो। १६० रु. किलो

शिराळे। १०० रु. किलो। १४० रु. किलो

मटार। १०० रु. किलो। १४० रु. किलो

पडवळ। ८० रु. किलो। १४० रु. किलो

टमाटा। ४० रु. किलो। ४० रु. किलो

लालभोपळा। ६० ते ७० रु. किलो। ६० ते ७० रु. किलो

गवार। ८० रु. किलो। १४० रु. किलो

------------------------------------------

कांदा पाच रुपयांनी महागला आहे. कांदा सध्या होलसेलमध्ये २२ ते २४ रु. किलो, तर किरकोळमध्ये ३० ते ३५ रु. किलोने विकले जात आहेत. आधी कांदा होलसेलमध्ये १७ ते २० रु. किलो आणि किरकोळमध्ये २५ ते ३० रु. किलोने मिळत होते.

------–-----------------------------

पावसाळा सुरू झाला की, कांद्याची आवक कमी होते. सध्या पण तीच परिस्थिती आहे. बाजारात कांदा कमी प्रमाणात येत असल्याने आवक मंदावली आहे आणि दर वाढत आहेत. कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कांद्याची आवक कमी केली आहे. कांद्याचे दर आणखी वाढण्याच्या अपेक्षेत ते आहेत.

- संदीप चौधरी, कांद्याचे होलसेल, किरकोळ व्यापारी

--------------------------------------------

पावसामुळे भाज्या महाग होतात. साध्य मेथी आणि कांदापात जास्त महाग आहे.

- संभाजी खेडेकर, पालेभाज्यांचे विक्रेते

------------------------------------

वळव्याच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. म्हणून त्यांचे दर वाढले आहेत. सध्या ग्राहकांचा पालेभाजी, फ्लॉवर, कोबी या भाज्यांवर भर आहे. महाग झालेल्या भाज्यांना अत्यल्प मागणी आहे.

- सीमा शेलार, फळभाज्या विक्रेत्या

--------------------------------------

भाज्या महाग झाल्याने सध्या कडधान्याच खाल्ले जात आहेत. भाज्यांच्या तुलनेत कडधान्य स्वस्त आहेत.

- सुभद्रा गायकवाड, गृहिणी

सध्या भाज्या महाग आहेत त्यामुळे महागड्या भाज्यांना सध्या बाजूला सारत आम्ही वरणावर जास्त भर देत आहोत.

- शुभांगी मोरे, गृहिणी