शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

निर्बंध उठविल्यानंतर दाेन महिन्यांत गुन्ह्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

भिवंडी : काेराेनाकाळात सर्वच व्यवहार ठप्प असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटले हाेते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हेगारीत अचानक वाढ झाली ...

भिवंडी : काेराेनाकाळात सर्वच व्यवहार ठप्प असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटले हाेते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हेगारीत अचानक वाढ झाली आहे. लॉकडाऊनकाळात कोरोना नियमांचे उल्लंघनाचे गुन्हे वगळता गंभीर गुन्ह्यांची नाेंद झाली नव्हती. भिवंडी परिमंडळ २ अंतर्गत नारपोली, कोनगाव, शांतीनगर, निजामपुरा, भिवंडी शहर व भोईवाडा ही पाेलीस ठाणी आहेत. दुसऱ्या लाटेनंतर लसीकरण सुरू झाल्याने व कोरोना नियंत्रणात आल्यानंतर निर्बंध शिथिल झाले. त्यानंतर जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यांत गुन्ह्यांत पुन्हा वाढ झाली आहे. जुलैमध्ये ३०५ गुन्हे, तर ऑगस्ट २०२१ मध्ये २५७ अशा ५६२ गुन्हे नाेंदवले गेले. यातील अनेक गुन्ह्यांची उकलही पाेलिसांनी केली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर २०२० या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांत १,१३३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०२० पासून काेराेनाची पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले हाेते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्यांच्या काळात भिवंडीतील परिमंडळ २ अंतर्गत पाेलीस ठाण्यांत ६४७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, तर जानेवारी २०२१ ते जून २०२१ या कालावधीत राज्यात दुसरा लॉकडाऊन करण्यात आला. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये १,४३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली हाेती.

भिवंडीतील विविध पोलीस ठाण्यांत वाहनचोरी, मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भिवंडी परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस पथक तैनात केल्याने अनेक दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या व या चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्याचबरोबर मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांचीही गंभीर दखल घेत मोबाइल चोरट्यांच्याही मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरीचे मोबाइलही हस्तगत केले असून शुक्रवारी शांतीनगर या एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभर मोबाइल चव्हाण यांच्या उपस्थितीत नागरिकांना परत करण्यात आले आहेत.