शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

निर्बंध उठविल्यानंतर दाेन महिन्यांत गुन्ह्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

भिवंडी : काेराेनाकाळात सर्वच व्यवहार ठप्प असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटले हाेते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हेगारीत अचानक वाढ झाली ...

भिवंडी : काेराेनाकाळात सर्वच व्यवहार ठप्प असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटले हाेते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हेगारीत अचानक वाढ झाली आहे. लॉकडाऊनकाळात कोरोना नियमांचे उल्लंघनाचे गुन्हे वगळता गंभीर गुन्ह्यांची नाेंद झाली नव्हती. भिवंडी परिमंडळ २ अंतर्गत नारपोली, कोनगाव, शांतीनगर, निजामपुरा, भिवंडी शहर व भोईवाडा ही पाेलीस ठाणी आहेत. दुसऱ्या लाटेनंतर लसीकरण सुरू झाल्याने व कोरोना नियंत्रणात आल्यानंतर निर्बंध शिथिल झाले. त्यानंतर जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यांत गुन्ह्यांत पुन्हा वाढ झाली आहे. जुलैमध्ये ३०५ गुन्हे, तर ऑगस्ट २०२१ मध्ये २५७ अशा ५६२ गुन्हे नाेंदवले गेले. यातील अनेक गुन्ह्यांची उकलही पाेलिसांनी केली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर २०२० या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांत १,१३३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०२० पासून काेराेनाची पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले हाेते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्यांच्या काळात भिवंडीतील परिमंडळ २ अंतर्गत पाेलीस ठाण्यांत ६४७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, तर जानेवारी २०२१ ते जून २०२१ या कालावधीत राज्यात दुसरा लॉकडाऊन करण्यात आला. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये १,४३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली हाेती.

भिवंडीतील विविध पोलीस ठाण्यांत वाहनचोरी, मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भिवंडी परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस पथक तैनात केल्याने अनेक दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या व या चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्याचबरोबर मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांचीही गंभीर दखल घेत मोबाइल चोरट्यांच्याही मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरीचे मोबाइलही हस्तगत केले असून शुक्रवारी शांतीनगर या एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभर मोबाइल चव्हाण यांच्या उपस्थितीत नागरिकांना परत करण्यात आले आहेत.