शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध उठविल्यानंतर दाेन महिन्यांत गुन्ह्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

भिवंडी : काेराेनाकाळात सर्वच व्यवहार ठप्प असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटले हाेते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हेगारीत अचानक वाढ झाली ...

भिवंडी : काेराेनाकाळात सर्वच व्यवहार ठप्प असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटले हाेते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हेगारीत अचानक वाढ झाली आहे. लॉकडाऊनकाळात कोरोना नियमांचे उल्लंघनाचे गुन्हे वगळता गंभीर गुन्ह्यांची नाेंद झाली नव्हती. भिवंडी परिमंडळ २ अंतर्गत नारपोली, कोनगाव, शांतीनगर, निजामपुरा, भिवंडी शहर व भोईवाडा ही पाेलीस ठाणी आहेत. दुसऱ्या लाटेनंतर लसीकरण सुरू झाल्याने व कोरोना नियंत्रणात आल्यानंतर निर्बंध शिथिल झाले. त्यानंतर जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यांत गुन्ह्यांत पुन्हा वाढ झाली आहे. जुलैमध्ये ३०५ गुन्हे, तर ऑगस्ट २०२१ मध्ये २५७ अशा ५६२ गुन्हे नाेंदवले गेले. यातील अनेक गुन्ह्यांची उकलही पाेलिसांनी केली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर २०२० या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांत १,१३३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०२० पासून काेराेनाची पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले हाेते. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्यांच्या काळात भिवंडीतील परिमंडळ २ अंतर्गत पाेलीस ठाण्यांत ६४७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, तर जानेवारी २०२१ ते जून २०२१ या कालावधीत राज्यात दुसरा लॉकडाऊन करण्यात आला. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये १,४३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली हाेती.

भिवंडीतील विविध पोलीस ठाण्यांत वाहनचोरी, मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भिवंडी परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस पथक तैनात केल्याने अनेक दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या व या चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्याचबरोबर मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांचीही गंभीर दखल घेत मोबाइल चोरट्यांच्याही मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरीचे मोबाइलही हस्तगत केले असून शुक्रवारी शांतीनगर या एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभर मोबाइल चव्हाण यांच्या उपस्थितीत नागरिकांना परत करण्यात आले आहेत.