शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

बोगस डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या समित्यांचीच तोतयागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्याचे झपाट्याने नागरीकरण होऊन दाटीवाटीने लोक झोपडपट्टी परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांचे अज्ञान लक्षात घेऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्याचे झपाट्याने नागरीकरण होऊन दाटीवाटीने लोक झोपडपट्टी परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांचे अज्ञान लक्षात घेऊन ठिकठिकाणी बोगस डॉक्टरांनी गल्लीबोळात दवाखाने थाटले आहेत. त्यांनी मनमानी करून येथील रुग्णांच्या जिवाशी खेळ चालवलेला आहे. कडक कारवाई करून त्यांची मनमानी थांबवण्यासाठी सक्रिय असलेल्या या समित्यांकडूनच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात सहा महापालिका क्षेत्रात या बोगस डॉक्टरांची प्रॅक्टीस जोरात सुरू आहे; पण त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या समित्यांना मात्र या डॉक्टरांचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे दिसत आहे. गरिबी आणि अज्ञानाचा, गैरसमजाचा या बोगस डॉक्टरांकडून गैरफायदा घेतला जातो. रुग्ण गंभीर म्हणजे शेवटच्या घटका मोजत नाही, तोपर्यंत ते त्यांना अन्य रुग्णालयात पाठवत नाहीत, तोपर्यंत आपले बिलरुपी आर्थिक मीटर सुरू ठेवून त्यांची लूट करीत असल्याचे वास्तव काही जाणकारांनी कथन केले आहे. या बोगस डॉक्टरांकडून बऱ्याचदा रुग्ण दगावतोही; पण त्याची कोठे पुकार होऊ दिली जात नसल्याचे अनुभवही ऐकायला मिळत आहेत.

-------

१) जिल्ह्यातील अधिकृत रुग्णालये - १०६ रुग्णालये, दवाखाने. यापैकी कल्याणला नऊ रुग्णालये, दवाखाने आहेत. भिवंडीला ५२, अंबरनाथला तीन, शहापूरला २७ आणि मुरबाडला १५ दवाखाने व रुग्णालये अधिकृत आहेत.

२) वर्षभरात बोगस डॉक्टरांवर कारवाई - एप्रिलमध्ये अंबरनाथला एका बोगस डॉक्टरवर कारवाई झाली.

३) चार तालुक्यांत एकही कारवाई नाही- कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या चार तालुक्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई झालेली नाही.

४) तालुका समितीत कोण कोण असते? - बोगस डॉक्टर शोधमोहीम समितीमध्ये गटविकास अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदींचा समावेश आहे.

५) जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा कोट-

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यांपैकी अंबरनाथ तालुक्यात एका बोगस डॉक्टरचा शोध घेऊन कारवाई केली आहे. तालुकास्तरावरील सक्रिय शोध मोहीम समितीकडून बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जात आहे.

- डॉ. मनिष रेंघेए जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे.