शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीकडे दुर्लक्ष केल्याने नाटकांना आर्थिक फटका

By admin | Updated: November 27, 2015 02:09 IST

टीव्ही मालिकांमुळे नाटकाचे आर्थिक नुकसान झाले, ही नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केलेली टीका मान्य करण्यास छोट्या पडद्यावरील मालिकांशी संबंधित जाणकार तयार नाहीत

ठाणे : टीव्ही मालिकांमुळे नाटकाचे आर्थिक नुकसान झाले, ही नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केलेली टीका मान्य करण्यास छोट्या पडद्यावरील मालिकांशी संबंधित जाणकार तयार नाहीत. उलटपक्षी, नाटकांनी टीव्ही माध्यमाचा आपल्या विकासासाठी फायदा करून घ्यायला हवा होता. त्यांनी तो न केल्यामुळेच नाटकांना आर्थिक फटका बसला, अशी भावना टीव्हीशी संबंधित जाणकरांनी व्यक्त केली. अनेक सकस व दर्जेदार टीव्ही मालिकांच्या निर्मितीशी निकटचा संबंध राहिलेले नितीन वैद्य म्हणाले की, मालिकांमुळे नाटकांचे अर्थकारण बिघडलेले नाही. मराठी चित्रपटाला अगोदर प्रेक्षक येत नव्हते, आता प्रेक्षक यायला लागलेत. मराठी चित्रपटांचे अर्थकारण सुधारले. त्याचे कारण मराठी चित्रपटाने टीव्ही माध्यमाचा आपल्या प्रमोशनकरिता वापर केला. त्याचप्रमाणे मराठी नाटकांनी टीव्ही माध्यमाचा योग्य वापर केला व प्रेक्षक आपल्याकडे वळवले तर आपोआप त्यांचेही अर्थकारण सुधारेल. आपल्याकडे सशक्त नाटकाची परंपरा आहे. रंगभूमी व साहित्य सशक्त आहे आणि त्याच्यातूनच टेलिव्हिजनचा हा व्याप उभा राहिला आहे. त्याचा फायदा नाटकाला झाला आहे. त्यामुळे नाटक आणि टेलिव्हिजन ही स्पर्धा नाही. उलट, मालिका आणि टेलिव्हिजनला आपले स्पर्धक किंवा मारक आहे असे न बघता ते माध्यम नाटकाला पूरक कसे करून घेता येईल, असा विचार केला पाहिजे.माध्यमांवर ठपका ठेवणे योग्य नाही. टीव्हीवर नाटकांचे प्रोमेज दाखविले, कोणत्या भागांत कोणते प्रयोग होणार आहेत, ते दाखविले. तर प्रेक्षक टीव्हीचा प्रेक्षक नाटकांकडे येईल. गंगाराम गवाणकर हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाव आहे. आम्हाला नाटकांबद्दल प्रचंड आस्था आहे. माझी गवाणकरांवर कोणतीही टीका नाही, त्यांची नाराजी मी समजू शकतो. आपण नकारात्मक विचार करण्याऐवजी या नव्या माध्यमाला नाटकासाठी पूरक कसे बनविता, येईल याचा विचार करायला हवा. छोट्या पडद्यावरील आघाडीचे नाव असलेले उदय सबनीस म्हणाले की, मला व्यक्तिगत गवाणकरांचे मत मान्य नाही. मात्र गवाणकरांच्या मतावर माझी ही प्रतिक्रिया नाही. मराठी नाटकांचे अर्थकारण हे मुळातच कमी श्रेणीचे आहे. हिंदी, गुजराती नाटकांची तिकिटे दोन ते अडीच हजारांची असतात. आपल्याकडे ३०० रुपयांचे तिकीट केले तरी प्रेक्षकांचा विरोध असतो. जसे इतर खर्च वाढतात, तसे तिकिटाचे दर वाढायला हवे. त्यामुळे नाटकांचे अर्थकारण बिघडायला मालिका कारणीभूत आहे, असे वाटत नाही. मराठी प्रेक्षक सहजपणे एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन २०० रुपयांचे तिकीट काढतो आणि तिकडच्या खाद्यपदार्थांवर ३०० ते ५०० रुपये खर्च करू शकतो. तो मराठी नाटक चांगले पैसे देऊन का बघू शकत नाही. मुळात नाटक जर चांगले असेल, कलाकारांचा संच चांगला असेल, त्याची जाहिरात चांगली असेल तर नाटक चालायला हरकत नाही. टेलिव्हिजन आले तेव्हा याचा परिणाम मराठी चित्रपट, नाटकांवर होईल, अशी ओरड झाली. मात्र तसे झाले नाही. मालिका आणि नाटक हे वेगळे आहेत. अर्थकारण ही खूप वेगळी गोष्ट आहे. नाटक ही खूप वेगळी कला आहे, ती लाइव्ह परफॉर्म केली जाते. त्याचा वेगळा आनंद आहे. मल्टिप्लेक्सचा प्रेक्षक नाटकांकडे कसा वळेल, हे बघितले तर हा प्रश्न निर्माण होणार नाही. (प्रतिनिधी)