शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

टीव्हीकडे दुर्लक्ष केल्याने नाटकांना आर्थिक फटका

By admin | Updated: November 27, 2015 02:09 IST

टीव्ही मालिकांमुळे नाटकाचे आर्थिक नुकसान झाले, ही नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केलेली टीका मान्य करण्यास छोट्या पडद्यावरील मालिकांशी संबंधित जाणकार तयार नाहीत

ठाणे : टीव्ही मालिकांमुळे नाटकाचे आर्थिक नुकसान झाले, ही नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी केलेली टीका मान्य करण्यास छोट्या पडद्यावरील मालिकांशी संबंधित जाणकार तयार नाहीत. उलटपक्षी, नाटकांनी टीव्ही माध्यमाचा आपल्या विकासासाठी फायदा करून घ्यायला हवा होता. त्यांनी तो न केल्यामुळेच नाटकांना आर्थिक फटका बसला, अशी भावना टीव्हीशी संबंधित जाणकरांनी व्यक्त केली. अनेक सकस व दर्जेदार टीव्ही मालिकांच्या निर्मितीशी निकटचा संबंध राहिलेले नितीन वैद्य म्हणाले की, मालिकांमुळे नाटकांचे अर्थकारण बिघडलेले नाही. मराठी चित्रपटाला अगोदर प्रेक्षक येत नव्हते, आता प्रेक्षक यायला लागलेत. मराठी चित्रपटांचे अर्थकारण सुधारले. त्याचे कारण मराठी चित्रपटाने टीव्ही माध्यमाचा आपल्या प्रमोशनकरिता वापर केला. त्याचप्रमाणे मराठी नाटकांनी टीव्ही माध्यमाचा योग्य वापर केला व प्रेक्षक आपल्याकडे वळवले तर आपोआप त्यांचेही अर्थकारण सुधारेल. आपल्याकडे सशक्त नाटकाची परंपरा आहे. रंगभूमी व साहित्य सशक्त आहे आणि त्याच्यातूनच टेलिव्हिजनचा हा व्याप उभा राहिला आहे. त्याचा फायदा नाटकाला झाला आहे. त्यामुळे नाटक आणि टेलिव्हिजन ही स्पर्धा नाही. उलट, मालिका आणि टेलिव्हिजनला आपले स्पर्धक किंवा मारक आहे असे न बघता ते माध्यम नाटकाला पूरक कसे करून घेता येईल, असा विचार केला पाहिजे.माध्यमांवर ठपका ठेवणे योग्य नाही. टीव्हीवर नाटकांचे प्रोमेज दाखविले, कोणत्या भागांत कोणते प्रयोग होणार आहेत, ते दाखविले. तर प्रेक्षक टीव्हीचा प्रेक्षक नाटकांकडे येईल. गंगाराम गवाणकर हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाव आहे. आम्हाला नाटकांबद्दल प्रचंड आस्था आहे. माझी गवाणकरांवर कोणतीही टीका नाही, त्यांची नाराजी मी समजू शकतो. आपण नकारात्मक विचार करण्याऐवजी या नव्या माध्यमाला नाटकासाठी पूरक कसे बनविता, येईल याचा विचार करायला हवा. छोट्या पडद्यावरील आघाडीचे नाव असलेले उदय सबनीस म्हणाले की, मला व्यक्तिगत गवाणकरांचे मत मान्य नाही. मात्र गवाणकरांच्या मतावर माझी ही प्रतिक्रिया नाही. मराठी नाटकांचे अर्थकारण हे मुळातच कमी श्रेणीचे आहे. हिंदी, गुजराती नाटकांची तिकिटे दोन ते अडीच हजारांची असतात. आपल्याकडे ३०० रुपयांचे तिकीट केले तरी प्रेक्षकांचा विरोध असतो. जसे इतर खर्च वाढतात, तसे तिकिटाचे दर वाढायला हवे. त्यामुळे नाटकांचे अर्थकारण बिघडायला मालिका कारणीभूत आहे, असे वाटत नाही. मराठी प्रेक्षक सहजपणे एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन २०० रुपयांचे तिकीट काढतो आणि तिकडच्या खाद्यपदार्थांवर ३०० ते ५०० रुपये खर्च करू शकतो. तो मराठी नाटक चांगले पैसे देऊन का बघू शकत नाही. मुळात नाटक जर चांगले असेल, कलाकारांचा संच चांगला असेल, त्याची जाहिरात चांगली असेल तर नाटक चालायला हरकत नाही. टेलिव्हिजन आले तेव्हा याचा परिणाम मराठी चित्रपट, नाटकांवर होईल, अशी ओरड झाली. मात्र तसे झाले नाही. मालिका आणि नाटक हे वेगळे आहेत. अर्थकारण ही खूप वेगळी गोष्ट आहे. नाटक ही खूप वेगळी कला आहे, ती लाइव्ह परफॉर्म केली जाते. त्याचा वेगळा आनंद आहे. मल्टिप्लेक्सचा प्रेक्षक नाटकांकडे कसा वळेल, हे बघितले तर हा प्रश्न निर्माण होणार नाही. (प्रतिनिधी)