शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

सुरेश म्हात्रे पक्षात आल्यास काॅंग्रेसची ताकद वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

भिवंडी : शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा ...

भिवंडी : शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पक्ष सदस्य पदाबरोबरच ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे दिले. म्हात्रे यांच्या राजीनाम्यानंतर ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पक्षप्रवेशाबाबत म्हात्रे यांनी आपली अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला राजीनामा दिला असल्याने त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

भाजपचे खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून ते जिल्ह्याच्या राजकारणात ओळखले जातात. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे यांनी जाहीर बंड पुकारले होते. त्यामुळे सेना भाजप युतीच्या विरोधात काम केल्यामुळे शिवसेना पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती. त्यावेळी कारवाई झाली तरी बेहत्तर. पण कपिल पाटील यांना निवडणुकीत मदत करणार नाही, अशी भूमिका सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. २०१९ मध्ये काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश टावरे यांना म्हात्रे यांच्या राजकीय मदतीचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे काँग्रेसला भिवंडी लोकसभा मतदारसंघावर पाणी फेरावे लागले. भाजपकडे असलेली भिवंडी लोकसभा खेचण्यासाठी म्हात्रे यांना आपल्या गोटात घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

म्हात्रे यांच्या भूमिकेकडे लक्ष

भिवंडी लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदार जास्त आहेत. या मतदारांचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा कल जास्त असतो. त्यातच भिवंडी ग्रामीण भागात म्हात्रे यांना मानणारा वर्ग मोठा असून भिवंडी लोकसभेत असलेल्या भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण या मतदारसंघात म्हात्रे यांचा चांगला दबदबा आहे. शहरातील मुस्लीम मतदार व ग्रामीण भागात असलेला म्हात्रे यांचा चाहता वर्ग या सर्वांचाच फायदा सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये गेल्यास काँग्रेस पक्षाला होणार आहे. काँग्रेस नेतेही याबाबत सकारात्मक आहेत. काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते सध्या त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकंदरीत सुरेश म्हात्रे यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. म्हात्रे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे.