शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सरकार बुडवलं की गावांच्या समस्या मार्गी लावतो - किसन कथोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ तालुका भारतीय जनता पक्षामार्फत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक अंबेशीव इथे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथ तालुका भारतीय जनता पक्षामार्फत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक अंबेशीव इथे पार पडली. ग्रामीण भागातील रखडलेल्या समस्यांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी राज्यातील सरकारवर टीका करीत हे सरकार बुडविल्यानंतरच मतदार संघातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या अनेक पॅनलचा पराभव झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागात भाजपला बळकटी यावी, यासाठी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण भागात असलेल्या लहान-मोठ्या गावांमधील रखडलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. मुरबाड विधानसभा मतदार संघातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून, वालिवली येथील उल्हास नदीवरील पुलाची नव्याने बांधणी होणार आहे. तसेच आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी कशी असावी, यावर आमदार कथोरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

कार्यकर्त्यांमुळे ग्रामीण भागात भाजप वाढलेलीच आहे. भाजपची विचारसरणी मतदारसंघात रुजविण्यात आली आहे. आता ग्रामीण भागात नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या विद्यमान सरकारला बुडवल्यानंतर मार्गी लावणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. या बैठकीला अंबरनाथ तालुका भाजपचे अध्यक्ष राजेश पाटील, हेमंत भोईर, शिवाजी कथोरे, कृष्णा शिंदे, भगवान पाटेकर, राजेश पाटेकर यांच्यासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.