शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

शक्य नसेल तर पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST

ठाणे : कळव्याला होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून महापालिकेने एमआयडीसीकडे, तर एमआयडीसीने महापालिकेकडे बोट दाखविल्याने संतप्त झालेल्या गृहनिर्माणमंत्री ...

ठाणे : कळव्याला होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून महापालिकेने एमआयडीसीकडे, तर एमआयडीसीने महापालिकेकडे बोट दाखविल्याने संतप्त झालेल्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही प्राधिकरणांना खडेबोल सुनावले. त्यातही ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या असहकार्यावरून तुम्हाला काम करता येणे शक्य नसेल तर खासगीकरण करा, परंतु कळवेकरांना पाणी द्या, असे खडेबोल सुनावले.

कळव्यातील नागरिकांना गेले काही दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधीनींही आव्हाड यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर यासंदर्भात शुक्रवारी आव्हाड यांनी शासकीय विश्रामगृहात एमआयडीसी, तसेच महापालिका यांसह आणि कळवा-मुंब्रा परिसरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.

सध्या कळवा परिसराला केवळ २३ एमएलडी पाण्याच्या पुरवठा होत असून, तो अपुरा पडत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कळवासाठी ३५ एमएलडी पाणीपुरवठ्यास मान्यता असताना केवळ २३ एमएलडीच पुरवठा का केला जातो, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली. पाणीपुरवठा कमी असल्याने कळवावासीयांना पाणीटंचाई जाणवत असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मात्र जलवाहिन्या २५ ते ३० वर्षे जुन्या असल्याने त्या वारंवार फुटत असल्याचे सांगितले. तसेच बदलापूर येथील धरणापासून कल्याण फाट्यापर्यंत लाईन जोडण्याचे काम पूर्ण होत आले असून, केवळ दीड किमीचे काम राहिले आहे. ते चार ते पाच महिन्यांत झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे ठाणे महापालिकेने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अखेर तुम्हाला शक्य नसेल तर खासगीकरण करा म्हणजे त्यातून पाणी व्यवस्थित मिळेल, त्यातून महापालिकेची वसुलीदेखील अधिक होईल असे खडेबोल सुनावले.