शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

शक्य नसेल तर पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST

ठाणे : कळव्याला होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून महापालिकेने एमआयडीसीकडे, तर एमआयडीसीने महापालिकेकडे बोट दाखविल्याने संतप्त झालेल्या गृहनिर्माणमंत्री ...

ठाणे : कळव्याला होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून महापालिकेने एमआयडीसीकडे, तर एमआयडीसीने महापालिकेकडे बोट दाखविल्याने संतप्त झालेल्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही प्राधिकरणांना खडेबोल सुनावले. त्यातही ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या असहकार्यावरून तुम्हाला काम करता येणे शक्य नसेल तर खासगीकरण करा, परंतु कळवेकरांना पाणी द्या, असे खडेबोल सुनावले.

कळव्यातील नागरिकांना गेले काही दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधीनींही आव्हाड यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर यासंदर्भात शुक्रवारी आव्हाड यांनी शासकीय विश्रामगृहात एमआयडीसी, तसेच महापालिका यांसह आणि कळवा-मुंब्रा परिसरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.

सध्या कळवा परिसराला केवळ २३ एमएलडी पाण्याच्या पुरवठा होत असून, तो अपुरा पडत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कळवासाठी ३५ एमएलडी पाणीपुरवठ्यास मान्यता असताना केवळ २३ एमएलडीच पुरवठा का केला जातो, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली. पाणीपुरवठा कमी असल्याने कळवावासीयांना पाणीटंचाई जाणवत असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मात्र जलवाहिन्या २५ ते ३० वर्षे जुन्या असल्याने त्या वारंवार फुटत असल्याचे सांगितले. तसेच बदलापूर येथील धरणापासून कल्याण फाट्यापर्यंत लाईन जोडण्याचे काम पूर्ण होत आले असून, केवळ दीड किमीचे काम राहिले आहे. ते चार ते पाच महिन्यांत झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे ठाणे महापालिकेने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अखेर तुम्हाला शक्य नसेल तर खासगीकरण करा म्हणजे त्यातून पाणी व्यवस्थित मिळेल, त्यातून महापालिकेची वसुलीदेखील अधिक होईल असे खडेबोल सुनावले.