शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शक्य नसेल तर पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST

ठाणे : कळव्याला होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून महापालिकेने एमआयडीसीकडे, तर एमआयडीसीने महापालिकेकडे बोट दाखविल्याने संतप्त झालेल्या गृहनिर्माणमंत्री ...

ठाणे : कळव्याला होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून महापालिकेने एमआयडीसीकडे, तर एमआयडीसीने महापालिकेकडे बोट दाखविल्याने संतप्त झालेल्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही प्राधिकरणांना खडेबोल सुनावले. त्यातही ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या असहकार्यावरून तुम्हाला काम करता येणे शक्य नसेल तर खासगीकरण करा, परंतु कळवेकरांना पाणी द्या, असे खडेबोल सुनावले.

कळव्यातील नागरिकांना गेले काही दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधीनींही आव्हाड यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर यासंदर्भात शुक्रवारी आव्हाड यांनी शासकीय विश्रामगृहात एमआयडीसी, तसेच महापालिका यांसह आणि कळवा-मुंब्रा परिसरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.

सध्या कळवा परिसराला केवळ २३ एमएलडी पाण्याच्या पुरवठा होत असून, तो अपुरा पडत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कळवासाठी ३५ एमएलडी पाणीपुरवठ्यास मान्यता असताना केवळ २३ एमएलडीच पुरवठा का केला जातो, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली. पाणीपुरवठा कमी असल्याने कळवावासीयांना पाणीटंचाई जाणवत असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मात्र जलवाहिन्या २५ ते ३० वर्षे जुन्या असल्याने त्या वारंवार फुटत असल्याचे सांगितले. तसेच बदलापूर येथील धरणापासून कल्याण फाट्यापर्यंत लाईन जोडण्याचे काम पूर्ण होत आले असून, केवळ दीड किमीचे काम राहिले आहे. ते चार ते पाच महिन्यांत झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे ठाणे महापालिकेने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अखेर तुम्हाला शक्य नसेल तर खासगीकरण करा म्हणजे त्यातून पाणी व्यवस्थित मिळेल, त्यातून महापालिकेची वसुलीदेखील अधिक होईल असे खडेबोल सुनावले.