शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

झोपडीधारकांचा पालिकेवर मोर्चा

By admin | Updated: May 6, 2017 05:45 IST

भाजपा नगरसेवकाने झोपडीधारकांच्या विविध मागण्यांसह पालिकेने राजकीय दबावाखाली झोपड्यांवर सुरू केलेली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : भाजपा नगरसेवकाने झोपडीधारकांच्या विविध मागण्यांसह पालिकेने राजकीय दबावाखाली झोपड्यांवर सुरू केलेली कारवाई थांबवण्यासाठी शुक्रवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. पालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यात काशीगाव येथील दाचकुलपाडा, मीनाक्षीनगर, माशाचापाडा आदी भागांतील बेकायदा झोपड्यांचा समावेश आहे. या झोपड्या काही स्थानिक राजकीय मंडळींकडूनच वसवण्यात येत असल्याने पालिकेतील काही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. काही वर्षांपूर्वी याच परिसरातील हजारो बेकायदा झोपड्यांवर पालिकेने केलेल्या कारवाईप्रकरणी त्या वेळचे भाजपा पदाधिकारी व नगरसेवक अनिल भोसले यांच्यासह काही व्यक्तींवर काशिमीरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यंदाही बेकायदा झोपड्यांवर पालिका राजकीय दबावापोटी कारवाई करत असल्याचा आरोप भोसले यांनी केला. या वेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर थेट आरोप करून त्यांच्याच दबावामुळे पालिका झोपड्यांवर कारवाई करत असल्याचा दावा केला आहे. राजकीय दबावापोटी झोपड्यांवर होणारी कारवाई प्रशासनाने त्वरित थांबवावी. तसेच येथील अनेक घरांना पाण्याची सोय नसल्याने स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरात रस्त्यांची सोय नाही. बीएसयूपीची योजना रखडली असून ती त्वरित पूर्ण करून नागरिकांना घरे द्यावीत. येथील आदिवासीपाड्यात दवाखान्याची सोय नसल्याने रुग्णांना पायपीट करून शहरात यावे लागते. या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून प्रशासन केवळ झोपड्यांनाच लक्ष्य करीत असल्याचा आरोप भोसले यांनी केला. कारवाई थांबवून प्रशासनाने तेथील रहिवाशांना पायाभूत सुविधा लवकरात लवकर पुरवाव्यात, या मागणीचे निवेदन आयुक्त डॉ. नरेश गीते यांना दिले. त्यावर, आयुक्तांनी पालिका दबावाखाली कारवाई करीत नसून सर्वच बेकायदा बांधकामांवर कारवाई करीत आहे. झोपड्यांबाबत आदेश मिळाल्यानंतरच कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. भोसले यांची राजकीय स्टंटबाजी अनिल भोसले यांच्या आरोपाचे खंडन करताना शिवसेनेचे उपशहरप्रमुख शंकर वीरकर म्हणाले, नगरसेवक भोसले यांनी थेट आमदार प्रताप सरनाईक यांचा कारवाईशी संबंध लावला असून त्यांची ती राजकीय स्टंटबाजी आहे. स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासह आपला राजकीय भाव वाढवण्यासाठी ते केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.