शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीधारकांचा पालिकेवर मोर्चा

By admin | Updated: May 6, 2017 05:45 IST

भाजपा नगरसेवकाने झोपडीधारकांच्या विविध मागण्यांसह पालिकेने राजकीय दबावाखाली झोपड्यांवर सुरू केलेली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : भाजपा नगरसेवकाने झोपडीधारकांच्या विविध मागण्यांसह पालिकेने राजकीय दबावाखाली झोपड्यांवर सुरू केलेली कारवाई थांबवण्यासाठी शुक्रवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. पालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यात काशीगाव येथील दाचकुलपाडा, मीनाक्षीनगर, माशाचापाडा आदी भागांतील बेकायदा झोपड्यांचा समावेश आहे. या झोपड्या काही स्थानिक राजकीय मंडळींकडूनच वसवण्यात येत असल्याने पालिकेतील काही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. काही वर्षांपूर्वी याच परिसरातील हजारो बेकायदा झोपड्यांवर पालिकेने केलेल्या कारवाईप्रकरणी त्या वेळचे भाजपा पदाधिकारी व नगरसेवक अनिल भोसले यांच्यासह काही व्यक्तींवर काशिमीरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यंदाही बेकायदा झोपड्यांवर पालिका राजकीय दबावापोटी कारवाई करत असल्याचा आरोप भोसले यांनी केला. या वेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर थेट आरोप करून त्यांच्याच दबावामुळे पालिका झोपड्यांवर कारवाई करत असल्याचा दावा केला आहे. राजकीय दबावापोटी झोपड्यांवर होणारी कारवाई प्रशासनाने त्वरित थांबवावी. तसेच येथील अनेक घरांना पाण्याची सोय नसल्याने स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरात रस्त्यांची सोय नाही. बीएसयूपीची योजना रखडली असून ती त्वरित पूर्ण करून नागरिकांना घरे द्यावीत. येथील आदिवासीपाड्यात दवाखान्याची सोय नसल्याने रुग्णांना पायपीट करून शहरात यावे लागते. या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून प्रशासन केवळ झोपड्यांनाच लक्ष्य करीत असल्याचा आरोप भोसले यांनी केला. कारवाई थांबवून प्रशासनाने तेथील रहिवाशांना पायाभूत सुविधा लवकरात लवकर पुरवाव्यात, या मागणीचे निवेदन आयुक्त डॉ. नरेश गीते यांना दिले. त्यावर, आयुक्तांनी पालिका दबावाखाली कारवाई करीत नसून सर्वच बेकायदा बांधकामांवर कारवाई करीत आहे. झोपड्यांबाबत आदेश मिळाल्यानंतरच कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले. भोसले यांची राजकीय स्टंटबाजी अनिल भोसले यांच्या आरोपाचे खंडन करताना शिवसेनेचे उपशहरप्रमुख शंकर वीरकर म्हणाले, नगरसेवक भोसले यांनी थेट आमदार प्रताप सरनाईक यांचा कारवाईशी संबंध लावला असून त्यांची ती राजकीय स्टंटबाजी आहे. स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासह आपला राजकीय भाव वाढवण्यासाठी ते केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.