शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

तौक्ते वादळाचा शेतीमालालाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

कल्याण : तौक्ते वादळाचा फटका शेतीमालासही बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) मंग‌ळवारी ४० टक्के कमी शेतीमालाची ...

कल्याण : तौक्ते वादळाचा फटका शेतीमालासही बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) मंग‌ळवारी ४० टक्के कमी शेतीमालाची आवक झाली. त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतीमाल विकण्यास व्यापाऱ्यांना अडचणी आल्या. त्यामुळे फारसा मालही विकला गेला नाही.

एपीएमसीत सोमवारी तीन हजार २५४ क्विंटल फळे आणि भाजीपाला आला होता. सोमवारी आलेल्या वादळामुळे मंगळवारी पहाटे बाजारात केवळ एक हजार २३४ क्विंटल फळे आणि भाजीपाला आला. एपीएमसीत पुणे, जुन्नर, नाशिक तसेच गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून शेतीमाल येतो. वादळामुळे शेतीमालाची वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो मंगळवारी पहाटेपर्यंत कल्याणमध्ये पोहोचू शकले नाहीत. कांदा, बटाट्याची वाहतूक करणारे टेम्पो, ट्रक सोमवारी गुजरात आणि राजस्थानमधून आले होते. मात्र, मंगळवारी वादळामुळे शेतीमालाची आवक झाली नाही. फळे, भाजीपाल्याप्रमाणेच कांद्याची ९६० क्विंटल, बटाट्याची एक हजार ६३५ क्विंटल, तर अन्नधान्याची एक हजार ६६० क्विंटल आवक झाली आहे. तसेच सोमवारी कांद्याची दोन हजार ६५८ क्विंटल, बटाट्याची एक हजार ३६० आणि अन्नधान्याची ९७४ क्विंटल आवक झाली होती.

कोरोनाकाळात केवळ अत्यावश्यक बाब म्हणून कल्याण एपीएमसीतील बाजार सुरू आहे. केवळ ५० टक्के क्षमतेनेच गाळे सुरू ठेवून बाजार चालविला जातो. तसेच दर रविवारी एपीएमसी बंद ठेवली जाते. कोरोनामुळे बाजारातील व्यापाऱ्यांना फटका सहन करावा लागत असताना, आता ‘तौक्ते’चाही फटका बाजार समितीला सहन करावा लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

-------

तौक्ते वादळी वाऱ्याचा फटका बाजार समितीला बसला आहे. बाजार समितीत शेतीमालाची आवक ४० टक्के कमी झाली आहे. त्यात बाजार समितीचा वीजपुरवठा खंडित असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार करता आलेला नाही. फार कमी प्रमाणात मालाला उठाव होता.

- श्यामकांत चौधरी,

सचिव, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती

----------------------