शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

तौक्ते वादळाचा शेतीमालालाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

कल्याण : तौक्ते वादळाचा फटका शेतीमालासही बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) मंग‌ळवारी ४० टक्के कमी शेतीमालाची ...

कल्याण : तौक्ते वादळाचा फटका शेतीमालासही बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) मंग‌ळवारी ४० टक्के कमी शेतीमालाची आवक झाली. त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतीमाल विकण्यास व्यापाऱ्यांना अडचणी आल्या. त्यामुळे फारसा मालही विकला गेला नाही.

एपीएमसीत सोमवारी तीन हजार २५४ क्विंटल फळे आणि भाजीपाला आला होता. सोमवारी आलेल्या वादळामुळे मंगळवारी पहाटे बाजारात केवळ एक हजार २३४ क्विंटल फळे आणि भाजीपाला आला. एपीएमसीत पुणे, जुन्नर, नाशिक तसेच गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून शेतीमाल येतो. वादळामुळे शेतीमालाची वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो मंगळवारी पहाटेपर्यंत कल्याणमध्ये पोहोचू शकले नाहीत. कांदा, बटाट्याची वाहतूक करणारे टेम्पो, ट्रक सोमवारी गुजरात आणि राजस्थानमधून आले होते. मात्र, मंगळवारी वादळामुळे शेतीमालाची आवक झाली नाही. फळे, भाजीपाल्याप्रमाणेच कांद्याची ९६० क्विंटल, बटाट्याची एक हजार ६३५ क्विंटल, तर अन्नधान्याची एक हजार ६६० क्विंटल आवक झाली आहे. तसेच सोमवारी कांद्याची दोन हजार ६५८ क्विंटल, बटाट्याची एक हजार ३६० आणि अन्नधान्याची ९७४ क्विंटल आवक झाली होती.

कोरोनाकाळात केवळ अत्यावश्यक बाब म्हणून कल्याण एपीएमसीतील बाजार सुरू आहे. केवळ ५० टक्के क्षमतेनेच गाळे सुरू ठेवून बाजार चालविला जातो. तसेच दर रविवारी एपीएमसी बंद ठेवली जाते. कोरोनामुळे बाजारातील व्यापाऱ्यांना फटका सहन करावा लागत असताना, आता ‘तौक्ते’चाही फटका बाजार समितीला सहन करावा लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

-------

तौक्ते वादळी वाऱ्याचा फटका बाजार समितीला बसला आहे. बाजार समितीत शेतीमालाची आवक ४० टक्के कमी झाली आहे. त्यात बाजार समितीचा वीजपुरवठा खंडित असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार करता आलेला नाही. फार कमी प्रमाणात मालाला उठाव होता.

- श्यामकांत चौधरी,

सचिव, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती

----------------------