शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

उल्हासनगरातील शेकडो नागरिक होणार बेघर! धोकादायक १३३ पैकी ८४ इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 20:37 IST

Ulhasnagar : उल्हासनगरात गेल्या महिन्यात इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पाश्वभूमीवर, महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून १० वर्ष जुन्या तब्बल १५०० इमारतींना नोटीस देऊन स्ट्रॅक्टरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सुचविले.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिका संरचनात्मक अभियंता पॅनेलने केले. स्ट्रॅक्टरल ऑडिट झालेल्या ८४ पैकी ६ इमारती अतीधोकादायक म्हणून घोषित केल्या असून इमारतीमधील नागरिकांना इमारत खाली करण्याच्या नोटिसा दिल्या, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. 

उल्हासनगरात गेल्या महिन्यात इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पाश्वभूमीवर, महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून १० वर्ष जुन्या तब्बल १५०० इमारतींना नोटीस देऊन स्ट्रॅक्टरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सुचविले. याप्रकारणी शहरात एकच खळबळ उडाली असून आजपर्यंत नोटिसा दिलेल्या इमारातींपैकी एकाही इमारतींचा स्ट्रॅक्टरल ऑडिटचा अहवाल महापालिकेला सादर झाला नाही. हे उघड झाले. मात्र महापालिकेने घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ धोकादायक इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिकेच्या संरचनात्मक अभियंता पॅनलने केले. स्ट्रॅक्टरल ऑडिट झालेल्या ८४ पैकी ६ इमारती सरंचनात्मक अभियंता पॅनेलने अतिधोकादायक म्हणून घोषित केले. 

महापालिका सरंचनात्मक अभियंता पॅनेलने ज्या ६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या. त्या इमारती खाली करा. अशा नोटिसा नागरिकांना देऊन वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. स्ट्रॅक्टरल ऑडिट झालेल्या धोकादायक इमारती मधील नागरिकांना, इमारत दुरुस्ती करून इमारती मध्ये जाण्याचे सांगण्यात आले, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर इतर ४९ धोकादायक इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट एका आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे शिंपी म्हणाले. 

अतिधोकादायक इमारती घोषित केल्या. त्या इमारतीचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला जाणार असून इमारतीमधील बेघर होणाऱ्या शेकडो नागरिकांचे पर्यायी व्यवस्था करण्याचे संकेत दिले. तसेच १० वर्ष जुन्या इमारतीला नोटिसा देऊन स्ट्रॅक्टरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. त्यांनी स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिकेला सादर करणे गरजेचे आहे. 

शासनाच्या समितीकडे डोळेशहरातील अनाधिकृत व धोकादायक इमारती नियमित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. तसेच एक समिती स्थापन केली असून समिती १५ दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे. यातून सकारात्मक निर्णय येईल. अशी आशा शहरवासीयांना लागली असून त्याकडे सर्वांचे डोळे लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर