शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

उल्हासनगरातील शेकडो नागरिक होणार बेघर! धोकादायक १३३ पैकी ८४ इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 20:37 IST

Ulhasnagar : उल्हासनगरात गेल्या महिन्यात इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पाश्वभूमीवर, महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून १० वर्ष जुन्या तब्बल १५०० इमारतींना नोटीस देऊन स्ट्रॅक्टरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सुचविले.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिका संरचनात्मक अभियंता पॅनेलने केले. स्ट्रॅक्टरल ऑडिट झालेल्या ८४ पैकी ६ इमारती अतीधोकादायक म्हणून घोषित केल्या असून इमारतीमधील नागरिकांना इमारत खाली करण्याच्या नोटिसा दिल्या, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. 

उल्हासनगरात गेल्या महिन्यात इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पाश्वभूमीवर, महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून १० वर्ष जुन्या तब्बल १५०० इमारतींना नोटीस देऊन स्ट्रॅक्टरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सुचविले. याप्रकारणी शहरात एकच खळबळ उडाली असून आजपर्यंत नोटिसा दिलेल्या इमारातींपैकी एकाही इमारतींचा स्ट्रॅक्टरल ऑडिटचा अहवाल महापालिकेला सादर झाला नाही. हे उघड झाले. मात्र महापालिकेने घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ धोकादायक इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिकेच्या संरचनात्मक अभियंता पॅनलने केले. स्ट्रॅक्टरल ऑडिट झालेल्या ८४ पैकी ६ इमारती सरंचनात्मक अभियंता पॅनेलने अतिधोकादायक म्हणून घोषित केले. 

महापालिका सरंचनात्मक अभियंता पॅनेलने ज्या ६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या. त्या इमारती खाली करा. अशा नोटिसा नागरिकांना देऊन वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. स्ट्रॅक्टरल ऑडिट झालेल्या धोकादायक इमारती मधील नागरिकांना, इमारत दुरुस्ती करून इमारती मध्ये जाण्याचे सांगण्यात आले, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर इतर ४९ धोकादायक इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट एका आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे शिंपी म्हणाले. 

अतिधोकादायक इमारती घोषित केल्या. त्या इमारतीचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला जाणार असून इमारतीमधील बेघर होणाऱ्या शेकडो नागरिकांचे पर्यायी व्यवस्था करण्याचे संकेत दिले. तसेच १० वर्ष जुन्या इमारतीला नोटिसा देऊन स्ट्रॅक्टरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. त्यांनी स्ट्रॅक्टरल ऑडिट महापालिकेला सादर करणे गरजेचे आहे. 

शासनाच्या समितीकडे डोळेशहरातील अनाधिकृत व धोकादायक इमारती नियमित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. तसेच एक समिती स्थापन केली असून समिती १५ दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे. यातून सकारात्मक निर्णय येईल. अशी आशा शहरवासीयांना लागली असून त्याकडे सर्वांचे डोळे लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर