शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उल्हासनगरातील ६ इमारतींमधील शेकडो नागरिक होणार बेघर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:42 IST

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिका संरचनात्मक ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिका संरचनात्मक अभियंता पॅनलने केले. स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या ८४ पैकी ६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या असून या इमारतींमधील नागरिकांना इमारत खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

उल्हासनगरात गेल्या महिन्यात इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून १० वर्षे जुन्या १५०० इमारतींना नोटीस देऊन स्ट्रक्टरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सुचविले. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून आजपर्यंत नोटिसा दिलेल्या इमारतींपैकी एकाही इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल महापालिकेला सादर झाला नाही, हे उघड झाले. मात्र, महापालिकेने घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेच्या संरचनात्मक अभियंता पॅनलने केले. स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या ८४ पैकी ६ इमारती सरंचनात्मक अभियंता पॅनलने अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या.

महापालिका संरचनात्मक अभियंता पॅनलने ज्या ६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या, त्या इमारती खाली करा, अशा नोटिसा नागरिकांना देऊन वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या धोकादायक इमारतींमधील नागरिकांना, इमारत दुरुस्ती करून इमारतीमध्ये जाण्याचे सांगण्यात आले, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर, इतर ४९ धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट एका आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे शिंपी म्हणाले. अतिधोकादायक इमारती घोषित केल्या. त्या इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला जाणार असून इमारतींमधील बेघर होणाऱ्या शेकडो नागरिकांची पर्यायी व्यवस्था करण्याचे संकेत दिले. तसेच १० वर्षे जुन्या इमारतीला नोटिसा देऊन स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेला सादर करणे गरजेचे आहे.

----------

शासनाच्या समितीकडे डोळे

शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारती नियमित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. तसेच एक समिती स्थापन केली असून समिती १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. यातून सकारात्मक निर्णय येईल, अशी आशा शहरवासीयांना आहे.