शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उल्हासनगरातील ६ इमारतींमधील शेकडो नागरिक होणार बेघर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:42 IST

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिका संरचनात्मक ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिका संरचनात्मक अभियंता पॅनलने केले. स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या ८४ पैकी ६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या असून या इमारतींमधील नागरिकांना इमारत खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

उल्हासनगरात गेल्या महिन्यात इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून १० वर्षे जुन्या १५०० इमारतींना नोटीस देऊन स्ट्रक्टरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सुचविले. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून आजपर्यंत नोटिसा दिलेल्या इमारतींपैकी एकाही इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल महापालिकेला सादर झाला नाही, हे उघड झाले. मात्र, महापालिकेने घोषित केलेल्या १३३ पैकी ८४ धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेच्या संरचनात्मक अभियंता पॅनलने केले. स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या ८४ पैकी ६ इमारती सरंचनात्मक अभियंता पॅनलने अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या.

महापालिका संरचनात्मक अभियंता पॅनलने ज्या ६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या, त्या इमारती खाली करा, अशा नोटिसा नागरिकांना देऊन वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या धोकादायक इमारतींमधील नागरिकांना, इमारत दुरुस्ती करून इमारतीमध्ये जाण्याचे सांगण्यात आले, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर, इतर ४९ धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट एका आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे शिंपी म्हणाले. अतिधोकादायक इमारती घोषित केल्या. त्या इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला जाणार असून इमारतींमधील बेघर होणाऱ्या शेकडो नागरिकांची पर्यायी व्यवस्था करण्याचे संकेत दिले. तसेच १० वर्षे जुन्या इमारतीला नोटिसा देऊन स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेला सादर करणे गरजेचे आहे.

----------

शासनाच्या समितीकडे डोळे

शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारती नियमित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. तसेच एक समिती स्थापन केली असून समिती १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. यातून सकारात्मक निर्णय येईल, अशी आशा शहरवासीयांना आहे.