शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षितांची गळचेपी अजून किती काळ ?

By admin | Updated: November 14, 2016 03:51 IST

बेकायदेशीर फेरीवाले रस्ते-फुटपाथ व्यापतात, पण कारवाई होत नाही. अनधिकृत बांधकामे फोफावतात, पण त्यांना पालिका सोयीसुविधा व संरक्षण देते.

बेकायदेशीर फेरीवाले रस्ते-फुटपाथ व्यापतात, पण कारवाई होत नाही. अनधिकृत बांधकामे फोफावतात, पण त्यांना पालिका सोयीसुविधा व संरक्षण देते. मात्र, ज्या अंध-अपंग तसेच चर्मकारांना स्वावलंबी व सक्षम करण्याची गरज आहे, त्यांना उदरनिर्वाहासाठी स्टॉलचे परवाने देण्यास वर्षानुवर्षे छळवणूक सुरू आहे. न्यायालय व शासनाचे आदेश असूनही त्यांचा हक्क नाकारला जात आहे. पालिकेतील सत्ताधारी व प्रशासन स्वार्थी होतेच, पण आता संवेदनाहीन व बधिर झाल्याचे हे लक्षण आहे, असे अंध-अपंगांनी म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अंध व अपंगांबद्दल विशिष्ट दिनाच्या दिवशी केवळ पोकळ सहानुभूती दाखवली जाते. मात्र, त्यांना स्टॉलचे परवाने देण्यास टाळाटाळ केली जाते. सुरुवातीला त्यांना पीसीओ दिले गेले. मोबाइल व इंटरनेटमुळे ते कालबाह्य झाले. साहजिकच त्यांना रोजगाराचा अन्य पर्याय देणे गरजेचे आहे. चर्मकार समाज आजही अशिक्षित व मागासलेला आहे. पिढ्यान्पिढ्या ते आपला गटई कामाचा पारंपरिक व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवत आहेत. अनेकांकडे जातीचे पुरावे नसले तरी गटईकामाखेरीज दुसरे काम करीत नाहीत. रस्त्यात जात असताना चप्पल तुटल्यावर भल्याभल्यांना गटई कामगारांची आठवण होते. गटईकाम हीदेखील समाजाची गरज आहे. नगर परिषद काळात १४९ चर्मकारांना गटई स्टॉलचा परवाना दिला होता. महापालिका झाल्यावर आॅगस्ट २००४ मध्ये महासभेने गटई स्टॉल, अंध-अपंग व दूधविक्रीच्या स्टॉलसाठी नवे धोरण निश्चित केले. त्या धोरणात किती अंतरावर स्टॉल असावा, यापासून अनेक अटीशर्ती मंजूर केल्या गेल्या. पालिकेच्या या धोरणास शासनानेदेखील हिरवा कंदिल दाखवला. जून २००५ मध्ये शासनाची मंजुरी मिळाली व पालिकेने शहरात गटईकामाचे नवीन ४९ परवाने दिले. त्यानंतर, आजतागायत पालिकेने नवीन परवाने दिलेच नाहीत. ज्यांना परवाने दिले, त्यांना नूतनीकरणासाठी अडवले जाते. नूतनीकरण न झालेले स्टॉल अनधिकृत ठरवून मोडण्याचा सपाटा प्रशासनाने लावला. शासनाच्या समाजकल्याण खात्याने दिलेले लोखंडी स्टॉलदेखील पालिकेने भुईसपाट केले. स्वत: आमदार, महापौर चर्मकारांच्या स्टॉलवर कारवाई करा, या मागणीसाठी रस्त्यावर बसले. अंध-अपंगांच्या स्टॉलबाबतही पालिकेचे धोरण वेगळे नाही. फुटकळ कारणे पुढे करून त्यांचे स्टॉल उचलले गेले. काही ठिकाणी तर बिल्डर वा अन्य धनदांडग्यांच्या फायद्यासाठी परवाने असलेले स्टॉल बळाचा वापर करून हटवण्यात आले. यामुळे अनेकांची रोजीरोटी उद्ध्वस्त झाली. समाजातील उपेक्षित घटकांची काळजी घेण्याची ‘मन की बात’ केली जाते. मात्र, प्रत्यक्षात पालिका स्तरावर ‘धन की बात’ची चलती सुरू आहे. उपेक्षितांच्या सहनशीलतेचा अंत पाहायचा व त्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला तर त्यांच्यावर दमनशक्तीचा वापर करायचा, हे अजून किती काळ सुरू राहणार, हाच सवाल आहे.