शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

उपेक्षितांची गळचेपी अजून किती काळ ?

By admin | Updated: November 14, 2016 03:51 IST

बेकायदेशीर फेरीवाले रस्ते-फुटपाथ व्यापतात, पण कारवाई होत नाही. अनधिकृत बांधकामे फोफावतात, पण त्यांना पालिका सोयीसुविधा व संरक्षण देते.

बेकायदेशीर फेरीवाले रस्ते-फुटपाथ व्यापतात, पण कारवाई होत नाही. अनधिकृत बांधकामे फोफावतात, पण त्यांना पालिका सोयीसुविधा व संरक्षण देते. मात्र, ज्या अंध-अपंग तसेच चर्मकारांना स्वावलंबी व सक्षम करण्याची गरज आहे, त्यांना उदरनिर्वाहासाठी स्टॉलचे परवाने देण्यास वर्षानुवर्षे छळवणूक सुरू आहे. न्यायालय व शासनाचे आदेश असूनही त्यांचा हक्क नाकारला जात आहे. पालिकेतील सत्ताधारी व प्रशासन स्वार्थी होतेच, पण आता संवेदनाहीन व बधिर झाल्याचे हे लक्षण आहे, असे अंध-अपंगांनी म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अंध व अपंगांबद्दल विशिष्ट दिनाच्या दिवशी केवळ पोकळ सहानुभूती दाखवली जाते. मात्र, त्यांना स्टॉलचे परवाने देण्यास टाळाटाळ केली जाते. सुरुवातीला त्यांना पीसीओ दिले गेले. मोबाइल व इंटरनेटमुळे ते कालबाह्य झाले. साहजिकच त्यांना रोजगाराचा अन्य पर्याय देणे गरजेचे आहे. चर्मकार समाज आजही अशिक्षित व मागासलेला आहे. पिढ्यान्पिढ्या ते आपला गटई कामाचा पारंपरिक व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवत आहेत. अनेकांकडे जातीचे पुरावे नसले तरी गटईकामाखेरीज दुसरे काम करीत नाहीत. रस्त्यात जात असताना चप्पल तुटल्यावर भल्याभल्यांना गटई कामगारांची आठवण होते. गटईकाम हीदेखील समाजाची गरज आहे. नगर परिषद काळात १४९ चर्मकारांना गटई स्टॉलचा परवाना दिला होता. महापालिका झाल्यावर आॅगस्ट २००४ मध्ये महासभेने गटई स्टॉल, अंध-अपंग व दूधविक्रीच्या स्टॉलसाठी नवे धोरण निश्चित केले. त्या धोरणात किती अंतरावर स्टॉल असावा, यापासून अनेक अटीशर्ती मंजूर केल्या गेल्या. पालिकेच्या या धोरणास शासनानेदेखील हिरवा कंदिल दाखवला. जून २००५ मध्ये शासनाची मंजुरी मिळाली व पालिकेने शहरात गटईकामाचे नवीन ४९ परवाने दिले. त्यानंतर, आजतागायत पालिकेने नवीन परवाने दिलेच नाहीत. ज्यांना परवाने दिले, त्यांना नूतनीकरणासाठी अडवले जाते. नूतनीकरण न झालेले स्टॉल अनधिकृत ठरवून मोडण्याचा सपाटा प्रशासनाने लावला. शासनाच्या समाजकल्याण खात्याने दिलेले लोखंडी स्टॉलदेखील पालिकेने भुईसपाट केले. स्वत: आमदार, महापौर चर्मकारांच्या स्टॉलवर कारवाई करा, या मागणीसाठी रस्त्यावर बसले. अंध-अपंगांच्या स्टॉलबाबतही पालिकेचे धोरण वेगळे नाही. फुटकळ कारणे पुढे करून त्यांचे स्टॉल उचलले गेले. काही ठिकाणी तर बिल्डर वा अन्य धनदांडग्यांच्या फायद्यासाठी परवाने असलेले स्टॉल बळाचा वापर करून हटवण्यात आले. यामुळे अनेकांची रोजीरोटी उद्ध्वस्त झाली. समाजातील उपेक्षित घटकांची काळजी घेण्याची ‘मन की बात’ केली जाते. मात्र, प्रत्यक्षात पालिका स्तरावर ‘धन की बात’ची चलती सुरू आहे. उपेक्षितांच्या सहनशीलतेचा अंत पाहायचा व त्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला तर त्यांच्यावर दमनशक्तीचा वापर करायचा, हे अजून किती काळ सुरू राहणार, हाच सवाल आहे.