शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

रेल्वे अपघातांतील मृतांच्या वारसांना वर्षानुवर्षे भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:30 IST

अपघात दावा प्राधिकरणाचा निषेध : कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत तीन महिन्यांत ७४ अपघात

डोंबिवली : रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईची रक्कम मिळण्यास सहा वर्षे वाट पाहावी लागत असून रेल्वेच्या कार्यपद्धतीचा प्रवासी महासंघाने निषेध केला आहे. पात्र कुटुंबांना न्याय देण्यासाठी वाडीबंदर व मस्जिद येथील रेल्वे अपघात दावा प्राधिकरणाचे कामकाज गतिमान करण्याची मागणी शनिवारी महासंघाने केली आहे, अन्यथा महासंघ उग्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वेगाने संरक्षक उपाययोजना कराव्यात. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी ते ३१ मार्च या तीन महिन्यांच्या काळात विविध ठिकाणच्या रेल्वे अपघातात सुमारे ७४ नागरिकांचे बळी गेल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. अन्य ठिकाणीही अशा घटनांत वाढ झाल्याचे दिसते. गाडीच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणे, प्रवाशांची गर्दी व बेजबाबदारपणे रेल्वे रुळ ओलांडणे या कारणाने हे अपघात झाल्याची माहिती शेलार यांना रेल्वे सूत्रांनी दिली. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे क्षेत्रात रेल्वे अपघात व काही प्रमाणात आत्महत्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यामुळे लोहमार्ग पोलिसांवर कामाचा ताण वाढल्याने ते त्रस्त झाले आहेत. त्यामुळे यावर उपाययाेजनांची मागणी हाेत आहे.आर्थिक संकटामुळे आत्महत्यांत वाढकोरोना व लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक संकटामुळे धावत्या गाडीसमोर झोकून आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निरीक्षण लोहमार्ग पोलीस व मोटरमन आणि लोकोपायलट यांनी नोंदवल्याची माहितीही त्यांना मिळाली असल्याचे शेलार म्हणाले. त्यामुळे वाढते अपघात हे गंभीर असून यावर राज्य शासन, रेल्वे प्रशासन यांनी एकत्रित तोडगा काढण्याची गरज आहे. त्यावर प्रतिबंध घालावा व त्या उपाययोजनांसाठी प्रवासी महासंघ सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे