शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मनोरुग्णालयात ओलावल्या कडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:31 IST

राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात महिला-पुरुष रुग्णांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या वेळी महिला रुग्णांनी ‘विठाई’ संस्थेच्या सदस्यांना राखी बांधल्यानंतर दिलेली मिठाई स्वत: न खाता ‘आधी तुम्ही खा’ म्हणत भावाला मान देणे, कपाळावर टिळा लावण्याचा, ओवाळण्याचा आनंद अनुभवला आणि भेटायला न आलेल्या भावाच्या आठवणींत अनेकींच्या डोळ्यांचा अश्रूंनी ताबा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात महिला-पुरुष रुग्णांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या वेळी महिला रुग्णांनी ‘विठाई’ संस्थेच्या सदस्यांना राखी बांधल्यानंतर दिलेली मिठाई स्वत: न खाता ‘आधी तुम्ही खा’ म्हणत भावाला मान देणे, कपाळावर टिळा लावण्याचा, ओवाळण्याचा आनंद अनुभवला आणि भेटायला न आलेल्या भावाच्या आठवणींत अनेकींच्या डोळ्यांचा अश्रूंनी ताबा घेतला.आपल्या बहीणभावाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या महिला-पुरुष मनोरुग्णांनी या सणाचा आनंद विठाई प्रतिष्ठानसोबत साजरा केला. ‘विठाई’चे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांच्या पुढाकाराने दरवर्षी हा उपक्र म राबवला जातो. यंदाचे संस्थेचे १३ वे वर्ष होते. सुरुवातीला मनोरुग्णांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यात कोणी गाणे गायले, तर कोणी नृत्य सादर केले. या वेळी महिला मनोरुग्णांनी प्रतिष्ठानच्या पुरुष पदाधिकारी, सदस्यांना तर प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांनी पुरुष मनोरुग्णांना राखी बांधली.आमचा भाऊ असूनही इथे येत नाही, मग यांनाच आम्ही राखी बांधतो. हेच आमचे भाऊ. आमच्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात. त्यामुळे खूप छान वाटतं, अशा भावना एका महिलेने व्यक्त केल्या.घरचे कोणी येत नाही, माझी बहीणही नाही, असे राखी बांधून घेताना भावुक होऊन एक पुरुष मनोरुग्ण प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांना सांगत होता. या वेळी ते बहीण म्हणून त्यांच्या पायादेखील पडले. या मनोरुग्णांना संस्थेतर्फे मिठाईचे वाटप केले. एका ५५ वर्षांच्या महिलेने प्रतिष्ठानच्या सदस्याला राखी बांधल्यानंतर त्यांना मिठाई दिली. त्या वेळी ती मिठाई स्वत: न खाता ‘आधी तुम्ही खा’ असे म्हणत त्या सदस्याला खाऊ घातली. कपाळावर टिळा लावताना, ओवाळणी करताना आणि राखी बांधताना या महिलांच्या चेहºयावर विलक्षण आनंद होता.भविष्यात येणाºया सणाच्या दिवशी सगळेच जण घरी असाल, अशी भावना चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.तुम्ही बरे होऊन घरी गेलात, तरी आम्ही तुमच्या घरी येऊन राखी बांधून घेऊ, असे प्रतिष्ठानचे सदस्य रत्नदीप पटेल म्हणाले. संस्थेचे विक्रांत महाडिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या वेळी मनोरुग्णालयाच्या परिचारिका छाया घोलप, स्मिता चव्हाण, प्रतिष्ठानचे तुषार सावंत, भूषण शेलार, शरद बिराजदार व इतर उपस्थित होते.