शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

नगराध्यक्षांनाच मिळाले झुकते माप

By admin | Updated: February 21, 2017 05:36 IST

कामांसाठी निधीचे वाटप करतांना पक्षपात झाल्याचा मुद्दा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उघड केला.

अंबरनाथ : कामांसाठी निधीचे वाटप करतांना पक्षपात झाल्याचा मुद्दा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उघड केला. एवढेच नव्हे, तर नगराध्यक्षांच्या प्रभागातच सर्वाधिक कामे करण्यात आल्याचे निदर्शनास आणण्यात आले आणि ही अतिरिक्त कामे रद्द करण्याची मागणी काँग्रेस नगरसेवकांनी उचलून धरली. काँग्रेसने हा मुद्दा उघड करताच शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपाने देखील या कार्यपध्दतीला सभागृहात कडाडून विरोध केला. सत्ताधारी आणि विरोधकच विरोधात उभे ठाकल्याने नगराध्यक्षांची कोंडी झाली.अंबरनाथ नगर परिषदेची आर्थिक स्थिती भक्कम नसल्याने आणि आधीच्या कामांची देणी शिल्लक असल्याने अनेक नगरसेवकांना गेल्या दोन वर्षात ४० लाखांच्या वर कामे मिळालेली नाहीत. एवढ्या निधीत प्रभागात किती कामे करायची असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे. पालिकेने प्रत्येक नगरसेवकाला सर्वसाधारण सभेसाठी १५ लाख आणि स्थायी समितीच्या सभेसाठी प्रत्येकी ३ लाखांचे विषय घेण्याचे निश्चित करून दिले. मात्र स्थायी समितीचे सर्वाधिकार नगराध्यक्षांकडे असल्याने या समितीमध्ये आर्थिक विषय घेतांना प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या ३ लाखांचा एकच विषय घेण्यात आला. पक्षाचे गटनेते, सभापती, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांच्या प्रभागात मात्र काही ठिकाणी दोन, तर काही ठिकाणी तीन-तीन विषय टाकले. नगराध्यक्षांनी स्वत:च्या प्रभागात प्रत्येकी तीन लाखांचे चार विषय मंजूर करुन घेतले. शहराच्या महत्वाच्या कामांमध्येही पाच लाखांचे दोन विषय मंजूर करुन घेतले. प्रत्येक नगरसेवकासाठी तीन लाख आणि नगराध्यक्षांच्या प्रभागात २२ लाखांचे विषय आल्याने या संदर्भात काँग्रेसचे नगरसेवक उमेश पाटील यांनी अक्षेप नोंदविला. निधी नाही, अशी ओरड करत असतांना नगराध्यक्ष मात्र आपल्या प्रभागात सर्वाधिक निधीचा वापर करत असल्याच आरोप पाटील यांनी केला. जे रस्ते सुस्थितीत आहे त्याच रस्त्यांसाठी १० लाखांचा खर्च मंजूर करुन घेतल्याने त्यांनी त्यालाही आक्षेप घेतला. शहरात निधी नसतांना देखील याच सभेत झेब्रा क्रॉसिंगसाठी १० लाख आणि रस्त्यांवर रिफ्लेक्टर बसविण्यासाठी १० लाख असा २० लाखांच्या निधीचा चुराडा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. हे सर्व विषय स्थायी समितीने मंजूर केले असले, तरी या कामांच्या निविदा न काढण्याचे आणि ही कामे वार्षिक मंजूर दराने करू नये, अशी मागणी पाटील यांनी सभागृहात केली. काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप नोंदविल्यावर सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका वृषाली पाटील, भाजपाच्या नगरसेविका अनिता भोईर आणि भरत फुलोरे यांनीही या चुकीच्या कामांवर आक्षेप नोंदविला. भाजपाचे गटनेते तुळशीराम चौधरी यांनी हे अतिरिक्त विषय रद्द करण्याची मागणी सभागृहात केली. तसेच यापुढे पक्षपातीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)‘जिल्हाप्रमुख ठरवतात’सभागृहातील या गोंधळाच्या स्थितीला उत्तर देतांना नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांच्या तोंडून ‘सभेचा अजेंडा हा आमचे जिल्हाप्रमुख तयार करतात’ असे वाक्य निघाले. त्यावरून संपूर्ण सभागृहाने पुन्हा नगराध्यक्षांना लक्ष केले. सभेचा अजेंडा तयार करण्याचे अधिकार हे नगराध्यक्षांना असतांना ते जिल्हाप्रमुख कसे करतात यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला. सर्वच नगरसेवकांनी हे शब्द मागे घेण्याची मागणी उचलून धरली. अखेर मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्यावर सभागृहातील वातावरण पूर्ववत झाले.