शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांवर ‘रोखली’ बंदूक

By admin | Updated: August 30, 2016 02:50 IST

कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि रेल्वे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे

कल्याण : कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दिवसेंदिवस वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि रेल्वे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारपासून तेथे बंदूकधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे स्कायवॉक व स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दोन दिवसांपूर्वी पश्चिमेला रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या महिला फेरीवाल्यांचा माल रेल्वे महिला सुरक्षा बलाच्या विशेष स्कॉडने उचलून पोलीस ठाण्यात आणला. त्यामुळे चिडलेल्या फेरीवाल्यांनी जाब विचारण्यासाठी कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी त्यांनी विशेष स्कॉडमधील दोन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तर, दुर्गा तिवारी, शुभम मिश्रा, दिनेश व अन्य काहीजण त्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच त्यांचा हात पिळून त्यांना मारहाणही केली. हा प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारात घडल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वे सुरक्षा बलाचे अन्य कर्मचारी त्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी दुर्गा आणि शुभम यांना अटक केली. मात्र, दिनेश व साथीदार तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस आयुक्तांची कल्याण स्थानकाला भेट कल्याण : रेल्वे महिला सुरक्षा बलाच्या विशेष स्कॉडमधील दोन महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत फेरीवाले अंगावर धावून गेल्याच्या घटनेची गंभीर दखल रेल्वे सुरक्षा बलाचे मुंबई पोलीस आयुक्त सचिन बलोदे यांनी घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी कल्याण रेल्वेस्थानकाला भेट देत दिली. यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानक, पादचारी पूल व स्थानक परिसरात एकही फेरीवाला बसता कामा नये, अशी सक्त ताकीद रेल्वे पोलीस बलातील सर्व कर्मचाऱ्यांना दिली. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत देण्यासाठी रेल्वेचे सर्व विभागांतील अधिकारी सहकार्य करतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख के.के. मिश्राही उपस्थित होते. दरम्यान, बलोदे यांच्या दौऱ्यामुळे संपूर्ण स्थानक परिसर आणि रेल्वे पादचारी पुलावर एकही फेरीवाला नव्हता.महापालिका, रेल्वेचे पोलीस तैनातफेरीवाल्यांकडून होणारे हल्ले आणि दादागिरी मोडीत काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने १० पोलीस व १० विशेष सुरक्षा कर्मचारी नेमले आहेत. रात्री दुप्पट कर्मचारी नेमले जात आहेत. रेल्वेनेही रेल्वे सुरक्षा बलातील पिस्तूलधारी दोन महिला व चार पुरु ष कल्याण रेल्वेस्थानक परिसरात तैनात केले आहेत.कल्याणमध्ये फेरीवाल्यांकडून रेल्वे महिला पोलिसांना मारहाण झाली होती. या घटनेची दखल घेत रेल्वेने आज पूल फेरीवालामुक्त केला आहे. रेल्वे व पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवले पाहिजे. तरच, आम्हाला निर्धास्तपणे स्कायवॉकवरून चालता येईल.- दीपक गुप्ता, प्रवासीसर्वसामान्य नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पादचारी पूल बांधला आहे. मात्र, हा पूल प्रवाशांसाठी नाही तर फेरीवाल्यांसाठीच असल्याचे पाहायला मिळते. आज रेल्वेचे मोठे साहेब येणार म्हणून फेरीवाले गायब झाल्याचे समजले. त्यामुळे या साहेबांचे प्रथम धन्यवाद. त्यांनी आठवड्यातून २ ते ३ वेळा तरी स्थानकाला भेट द्यावी, जेणेकरून हा पादचारी पूल नागरिकांना अशाच प्रकारे मोकळा मिळेल.- नेहा मिरजकर, प्रवासी