शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

झोपड्या पुन्हा झाल्या टॅक्स फ्री

By admin | Updated: February 7, 2017 04:01 IST

राज्य सरकार २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत असले, तरी यंदाच्या वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका

राजू काळे , भाईंदरराज्य सरकार २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत असले, तरी यंदाच्या वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका डोळ््यासमोर ठेवून मीरा-भाईंदर पालिकेने सर्वच झोपड्यांना मालमत्ता कराच्या कक्षात आणण्याचा निर्णय घेत त्यांना सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एकीकडे सुविधा पुरव्या गेल्या, पण बेकायदा झोपड्यांना कर आकारता येणार नाही, असा निर्णय झाल्याने या झोपड्या टॅक्स फ्री झाल्या आहेत.शहरात १३ हजार २२२ झोपड्या आहेत. २००० नंतरच्या सुमारे सहा हजार झोपड्या आहेत. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये या सर्व झोपड्यांना कराच्या जाळ््यात आणण्याचे ठरले. त्यासाठी कर विभागाने त्यांचे सर्व्हेक्षण केले. त्यानंतर त्यातील साधारण सहा हजार झोपड्या अनधिकृत ठरल्याने त्यांना पायाभूत सुविधा देण्यास पालिकेने मनाई केली. निवडणुकीच्या शेवटच्या वर्षात ‘व्होट बँक’ गणल्या गेलेल्या या झोपड्यांना पायाभूत सुविधा द्या. त्यांच्याकडून कर वसूल करा, अशी मागणी राजकीय नेत्यांनी केली. त्यासाठी आंदोलने झाली. त्यानुसार या झोपड्यांना केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालये पुरवण्यात आली. सार्वजनिक नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली. बहुतांश झोपड्या पालिकेच्या नागरी सुविधा भूखंडावर तर काही केंद्र व राज्य सरकारच्या जागांवर वसल्या आहेत. प्रशासन एका बाजुला या झोपड्या हटवून भूखंड मोकळे करण्याचे सूतोवाच करीत आहे, तर दुसऱ्या बाजुला राजकीय दबावामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे झोपड्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्यातून पालिकेच्या नागरी सुविधांवर ताणही वाढतो आहे. पक्क्या घरांचे आमिषपालिकेने १९९५ पूर्वीच्या झोपड्यांना बीएसयुपी योजनेत सामावून घेतले आहे. उर्वरित झोपड्यांना तत्कालीन आघाडी सरकारच्या राजीव गांधी आवास योजनेंतर्गत सामावून घेण्यासाठी सर्व्हेक्षण सुरु केले. युती सरकारने ही योजना रद्द करून प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आणली आहे. यामुळे झोपडीधारकांना पक्की घरे मिळण्याची खात्री राजकीय मंडळींकडून दिली जात आहे. त्यासाठी पालिकेनेही आवश्यक कागदपत्रांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. घरांचा वायदा पक्का होत असल्याने २००८ नंतरच्या झोपड्यांना दुप्पट तर त्यापूर्वीच्या झोपड्यांना साधाणत: ३५ पैसे प्रती चौरस फूट दराप्रमाणे कर आकारणीचा निर्णय घेण्यात आला. काही झोपड्या पक्क्या तर काहींचे काँक्रिटीकरण झाल्याने महासभेच्या ठरावानुसार त्यांना दर लागू होण्याची शक्यता आहे. २०११ मध्ये ही करआकारणी थांबवण्यात आली होती, तर गेल्यावर्षी पुन्हा ती सुरू करण्याच्या हाचलाली होऊ लागल्या. या घोळात गेल्या अडीच वर्षांत पालिकेचा सुमारे सात कोटींचा महसुल बुडाला.