शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

अतिधोकादायक इमारतींसाठी मार्गदर्शक तत्त्वे

By admin | Updated: August 7, 2015 23:02 IST

धोकादायक इमारती रिकाम्या करणे, रिकाम्या करून त्या पाडणे, पाडण्यात आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी, त्यातील भोगवटादार, मालकांचे अधिकार संरक्षित करणे

ठाणे : धोकादायक इमारती रिकाम्या करणे, रिकाम्या करून त्या पाडणे, पाडण्यात आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी, त्यातील भोगवटादार, मालकांचे अधिकार संरक्षित करणे, याबाबत कायद्याच्या तरतुदी, वेळोवेळी शासनाने दिलेले आदेश आणि न्यायालयाने दिलेले निर्णय या पार्श्वभूमीवर अधिक स्पष्टता आणि दिशादर्शक मार्गदर्शक तत्त्वे ठाणे महापालिकेने तयार केली आहेत. त्यानुसार, ज्या इमारती धोकादायक, अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत, त्या इमारतींचा पाणी, वीजपुरवठा तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका हद्दीत कोसळणाऱ्या इमारतींचा धोका लक्षात घेऊन तसेच धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती खाली करताना किंवा निष्कासित करताना निर्माण होणाऱ्या अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीत एकसूत्रता आणण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. त्यानुसार, सर्व पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त यांनी आपापल्या प्रभाग समितीमधील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्याबाबतची सर्व कायदेशीर प्रक्रि या पूर्ण केल्यानंतर दरवर्षी १५ जानेवारीपर्यंत त्याची यादी वर्तमानपत्रांत, प्रभाग कार्यालयांमधील नोटीस बोर्डवर तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. धोकादायक म्हणून घोषित केलेली इमारत सर्व कायदेशीर प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर रिकामी करणे, स्ट्रक्चरल आॅडिटच्या अहवालानुसार इमारत दुरु स्तीयोग्य असेल, दुरु स्तीयोग्य नसेल, तरीही इमारत खाली करणे बंधनकारक राहणार आहे. ज्या इमारती राहण्यायोग्य नाहीत किंवा दुरु स्तीयोग्य नाहीत, असा संरचनात्मक अहवाल असल्यास त्या तत्काळ खाली करून त्या तोडण्याची तरतूद या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, ज्या इमारती दुरु स्तीयोग्य आहेत, अशा इमारतींना पदनिर्देशित अधिकारी यांनी दुरु स्तीची परवानगी दिल्यानंतर ३ महिन्यांत दुरु स्ती करून बांधकाम सुरक्षित प्रमाणपत्र देणे, ही संबंधित मालक व भोगवटादार यांची जबाबदारी असेल. तथापि, धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतीचा स्ट्रक्चरल अहवाल १५ दिवसांत संबंधित मालकाने, भोगवटादाराने सादर न केल्यास ती इमारत धोकादायक घोषित करूनकार्यवाही करण्यात येणार आहे. ज्या धोकादायक इमारती रिक्त करणार आहेत, अशा इमारतींचा पाणी, वीज, पाइप गॅस, एलपीजी गॅसपुरवठा तत्काळ खंडित होणार आहे.