शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

वाढवणचे भिजत घोंगडे

By admin | Updated: August 20, 2016 04:32 IST

वाढवण बंदर उभारण्यावरून वर्षभरापासून वाद सुरू आहेत. यावर तोडगा काढण्यासाठीच मुख्यमंत्री आणि संघर्ष समिती यांची शुक्रवारी (१९ आॅगस्ट) होणारी बैठक रद्द झाल्याची

डहाणू : वाढवण बंदर उभारण्यावरून वर्षभरापासून वाद सुरू आहेत. यावर तोडगा काढण्यासाठीच मुख्यमंत्री आणि संघर्ष समिती यांची शुक्रवारी (१९ आॅगस्ट) होणारी बैठक रद्द झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्याने आता हा प्रश्न असाच प्रलंबित राहणार आहे. एकीकडे हे बंदर उभारण्याची शासनाची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे या बंदराला विरोध करण्यासाठी वाढवण परिसरातील २५ ते ३० गावातील लोक आक्रमक झाले असून त्यांनी बंदराविरोधात प्राणपणाने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी बैठक रद्द केल्याने बंदर विरोधक आणि येथील जनता अधिकच आक्रमक होऊन ते मुख्यमंत्र्यानी येथे येऊन चर्चा करावी अशी आमची मागणी असल्याचे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी संगितले.वर्षभरा पासून वाढवण बंदर उभारणीचा प्रश्न धगधगत असून या बंदरामुळे शेतकरी, डायमेकर्स,बागायतदार, मच्छीमार यांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. एका बाजूला तारापुर अणुशक्ती केंद्र तर दुसऱ्या बाजूला रसायनिक कारखाने असलेली एमआयडीसी तसेच औष्णिक विद्युत केंद्र आणि केवळ ३५० किमी अंतरावरील कराची बंदरामुळे राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीनेही हा भाग फार महत्त्वाचा आहे. हे बंदर झाल्यास भूकंप वादळे यांना आमंत्रण देऊन नैसिर्गक आपत्ती ओढवून घेतल्यासारखे होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावांचे विस्थापन त्याच बरोबर रेल्वे, चौपदरी रस्त्यासाठी तसेच कर्मचारी वसाहत गोडाऊनसाठी जमीन संपादन केल्यास इथला शेतकरी देशोधडीला लागेल. येथील समुद्र हा माशांनी समृद्ध आहे. माशांचे प्रजोत्पादन होणारे हे एकमेव ठिकाण आहे. लॉब्टर (शिवंड) हा दुर्मिळ मासा याच ठिकाणी मिळतो. पण बंदर झाल्यास हे नैसर्गिक वैभव नष्ट होण्याी भीती आहे. त्यामुळे येथील सर्व समाज आक्र मक होऊन या बंदराला विरोध करीत आहेत. शिवाय, बंदरासाठी गावांचे देखील विस्थापन होणार आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता बाधितांचे पुनर्वसन योग्य रित्या होत नाही. परिणामी, ग्रामस्थ भलतेच आक्रमक झाले आहेत.