शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मीरा भाईंदर शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ५०० कोटींचे कर्ज घेण्यास पालिकेला शासना कडून मंजुरी 

By धीरज परब | Updated: November 18, 2022 11:53 IST

मीरा भाईंदर मधील सर्वच मुख्य रस्ते काँक्रीटचे कारण्यासाठी महापालिके कडे पुरेसा निधी नसल्याने बँक ऑफ बडोदा कडून ५०० कोटींचे कर्ज घेण्यास पालिकेला गुरुवारी राज्य शासनाने मंजूर दिली आहे . 

मीरारोड -

मीरा भाईंदर मधील सर्वच मुख्य रस्ते काँक्रीटचे कारण्यासाठी महापालिके कडे पुरेसा निधी नसल्याने बँक ऑफ बडोदा कडून ५०० कोटींचे कर्ज घेण्यास पालिकेला गुरुवारी राज्य शासनाने मंजूर दिली आहे . 

मीरा भाईंदर शहराच्या भौगोलिक रचनेमध्ये २ बाजूस खाडया, १ बाजूस समुद्र तर एका बाजूस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.  जेणेकरून पावसाळयात शहरात पाणी साचते . लोकसंख्ये प्रमाणेच रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाणही वाढते आहे. वाढती वाहतूक व साचणारे पाणी यामुळे रस्ते वारंवार खराब होत असल्याने वाहतूक कोंडी होऊन वेळ व इंधनाचा अपव्यय मोठया प्रमाणात होत असल्याने रस्ते टिकाऊ व खड्डेमुक्त होण्यासाठी रस्त्यांचे क्राँकिटीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे शासनाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी १७ नोव्हेम्बर रोजी काढलेल्या सदर कर्ज मंजुरी निर्णयात नमूद आहे.

रस्ते क्राँक्रिटीकरणासाठी मोठया प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता क्राँकिटीकरण पालिका निधीतून करणे शक्य नाही .  महासभेने  सप्टेंबर २०२१ मध्ये ४५ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ९०४.६७ कोटीच्या खर्चास मान्यता देताना खाजगी व शासकीय वित्तिय संस्थाकडून कर्ज घेण्यासाठी शासन परवानगी मिळावी म्हणून ठराव केला होता . त्या नुसार आयुक्त दिलीप ढोले यांनी रस्ते कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्यास शासनाची मान्यता देण्याचे प्रस्तावित केले होते . 

शहरातील दोन्ही आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन यांनी रस्ते काँक्रीटचे व्हावेत यासाठी शासनाने ५०० कोटींच्या कर्ज उभारणीसाठी परवानगी द्यावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी केली होती . मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने महिन्याभरा पूर्वी दोन्ही आमदारां सह अधिकाऱ्यांची बैठक लावून कर्ज उभारणीस मंजुरी देण्याचे निर्देश दिले होते . 

त्या अनुषंगाने शासनाने मीरा भाईंदर महापालिकेला काँक्रीट रस्ते बांधण्यासाठी बँक ऑफ बडोदा कडून ५०० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास अटी व शर्ती च्या अधीन राहून मंजुरी दिली आहे . ५०० कोटींचे कर्ज उभारण्यास शासनाने नाहरकत दिली असली तरी कर्ज परतफेडीची हमी शासनाने घेतलेली नाही . आवश्यकते नुसार कर्जाची रक्कम घ्यायची असून तो पैसा केवळ काँक्रीट रस्त्यांवरच खर्च करायचा आहे . कर्ज निधीतून उभारण्यात येणारे रस्ते अन्य कारणास्तव परत खोदण्यात येणार नाहीत याची दक्षता आयुक्तांनी घ्यायची आहे .  कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्ष इतका ठरविण्यात आला असून मुदतीत कर्जाची परतफेड होईल याची जबाबदारी पालिकेची आहे .  कोणत्याही बाबतीत सदर कर्ज परतफेड करावयाचा कालावधी ६० वर्षांपेक्षा जास्त असणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे . 

कर्जफेडीसाठी महानगरपालिकेच्या उत्पन्न स्तोत्रांचा आढावा घेऊन उत्पन वाढीसाठी कार्यवाही करणे तसेच कर्ज निवारण निधी स्थापन करणे पालिकेला बंधनकारक राहणार आहे . तर ५०० कोटींच्या कर्जा साठी बँकेने वार्षिक सुमारे सव्वा आठ टक्के व्याज घेण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले .