शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

कंपन्यांतील कामगारांच्या संख्येबाबत सरकार अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 01:37 IST

कल्याण-डोंबिवलीतील कंपन्यांमधील कामगारांची माहिती वा संख्या कल्याण येथील सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची बाब जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या तपशिलात उघडकीस आली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कंपन्यांमधील कामगारांची माहिती वा संख्या कल्याण येथील सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची बाब जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या तपशिलात उघडकीस आली आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी त्यांना अपिलात जाण्याचा सल्ला संबंधित कार्यालयाने दिला आहे.मेट्रोपॉलिटन एक्झिकेम कंपनीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर अतिधोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी निवासी विभागातील नागरिकांकडून करण्यात आली. त्यावर एमआयडीसी ही नागरी वस्ती वसण्यापूर्वीपासून आहे. तसेच कंपन्या स्थलांतरित केल्यास लाखो कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती कंपनी मालकांनी व्यक्त केली.डोंबिवलीतील फेज-१ व २ मध्ये एकूण ३५० पेक्षा जास्त कंपन्या आहे. त्यात अभियांत्रिकी, औषध उत्पादन, कापड उद्योग प्रक्रिया, रासायनिक उत्पादन आदींचा समावेश आहे. या कंपन्यांत नेमके किती कामगार आहेत, याची माहिती नलावडे यांनी माहिती अधिकारात मागितली होती. मात्र, अशा प्रकारची माहिती कल्याणच्या सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ‘मेट्रोपॉलिटन’मध्ये कायमस्वरूपी २०० कामगार, तर कंत्राटी ११० कामगार असे एकूण ३१० कामगार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे.याबाबत सहायक कामगार आयुक्तालय कार्यालयाने सांगितले की, ‘कंपन्यांना परवानगी विविध विभागांकडून दिली जाते. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची परवानगी ही एमआयडीसीकडून दिली जाते. काही प्रश्न असल्यास कंपन्यांना भेटी दिल्या जातात. त्यावेळीच तेथे किती कामगार काम करतात, याची माहिती घेतली जाते. त्यासाठी विशेष पाहणी करून सगळा डाटा घेतला जात नाही. कामगारांना किमान वेतन मिळत नसेल, थकीत देणी मिळत नसतील, तर त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाते. त्यानुसार, कारवाई केली जाते. मात्र, कामगारांची संख्या किती, याचा तपशील आमच्याकडे नाही.’सहायक कामगार आयुक्तालय कार्यालयाकडे बांधकाम व्यवसायात किती कंत्राटी कामगार आहेत, त्याची नोंदणी केली जाते. मात्र, कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांची नोंदणी केली जात नाही. कंत्राटींना किमान वेतन न देता राबवले जाते. परंतु, याबाबत तक्रार आल्याशिवाय हे कार्यालय जागे होत नाही, असे नलावडे म्हणाले.>...तर कुटुंबाला आर्थिक मदत कशी करणार?अतिधोकादायक ‘मेट्रोपॉलिटन’ला लागलेल्या भीषण आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, अशा प्रकारची जीवघेणी दुर्घटना घडल्यास त्यात कंत्राटी कामगारांचे बळी गेल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत कशाच्या आधारे मिळणार? कारण, सहायक कामगार आयुक्तांकडे कंपनीतील कामगारांची नोंदच नाही, याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले आहे. या माहितीसाठी अपिलात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.